शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

शहरातील अतिक्रमणे ेहटविणार-पालकमंत्री

By admin | Updated: January 28, 2015 14:11 IST

मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल. तसे आदेशही जिल्हाधिकार्‍यांना दिल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिंगोली : /शहरात /मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल. तसे आदेशही जिल्हाधिकार्‍यांना दिल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी आ.तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे भाजपा जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, बी. डी. बांगर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सांगितले, येथे विकासासाठी मोठा वाव आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आगामी काळात विकासकामे गतीने कशी करता येतील, यावर कटाक्ष राहील. मागील दोन दिवसांत पोलिस वसाहत, पोलिस अधीक्षक कार्यालय, जलेश्‍वर तलाव, चिरागशहा तलाव आदीची पाहणी केली. त्यात या तलावांची खोली वाढविणे व सुशोभिकरण केल्यास सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही ही स्थळे विकसित करता येतील. औंढा व नर्सी नामदेवचाही याच पद्धतीने विकास करण्यासाठी प्रयत्न आहेत. पीक विमा मिळण्यात ज्या निकषांच्या अडचणी आहेत, त्या प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या भेटी घेवून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील अतिक्रमणांचा मुद्दाही लवकरच निकाली काढण्यात येईल, असे ते म्हणाले. डीपीसीत अनेक विभागांना दिलेला निधी अपुरा असतो त्यामुळे तो ते परत करतात, त्याचे पुनर्विनियोजन करावे लागते. मात्र ज्या योजनांना निधीची गरज आहे, त्यांना अपुरा निधी दिला जातो, याबाबत विचारले असता त्याबाबत आगामी काळात लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. शहरात ठिकठिकाणी मांसविक्रीचे दुकाने असल्याने त्यांना नेमून दिलेल्या जागीच व्यवसाय करण्यास भागा पाडा, असे सांगितले.

 ■ या भागाचा सिंचनाचा मोठा प्रश्न आहे. मोठय़ा धरणांतून जिल्ह्याचे हक्काचे पाणी मिळावे, अशी भूमिका आहे. ती पूर्ण करण्यासाठी लवकरच जलसंपदामंत्र्यांना हिंगोलीच्या दौर्‍यावर आणून परिस्थिती अवगत करून दिली जाईल, अे पालकमंत्री म्हणाले. ४/शासकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्यासाठीही प्रयत्न केले जातील. जे डॉक्टर खाजगी व्यवसायाकडेच अधिक लक्ष देतात, त्यांना शासकीय सेवेतून मुक्त करून नव्याने पदे भरण्याची कारवाई करण्याचा इशाराही दिला.