शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:43 IST

स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे.

हिंगोली : स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. आगामी काळात दहा कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.हिंगोली नगरपालिका क्षेत्रात मागील दोन ते अडीच वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी धडपड केली जात आहे.पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी सगळ्यांनीच यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे यापूर्वीही नगरपालिकेने तीन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. आता पुन्हा गुणांकनानुसार रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. गतवर्षी ३९ व्या क्रमांकावर असलेली हिंगोली पालिका यावेळी पश्चिम झोनमध्ये १00२ शहरांशी स्पर्धा करीत २९ व्या क्रमांकावर आली आहे.स्वच्छतेत ठेवलेल्या सातत्यामुळे तीनदा केंद्रीय पथकाने तपासणी केल्यानंतरही हे यश मिळाले आहे. शहरातील विविध भागात जवळपास ३५ पेक्षा जास्त सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. याशिवाय शहरात नियमितपणे घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार आता बंदच झाल्यात जमा आहेत.तर सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या ठेवून त्यांचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय डम्पिंग ग्राऊंड व अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीही राबविण्यात येत आहे. त्यामुळे गुणांकन सुधारले आहे. हे अभियान सुरु करताना अनेक यंत्रणांकडून सीएसआरच्या माध्यमातून गोरगरिबांना कचरा कुंड्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे स्वच्छतेत सातत्य राखण्यात यश मिळाले आहे. भविष्यात शहराला शासनाकडून १0 कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याचीही शक्यता आहे.

मेहनतीचे फळहिंगोली शहराचा चेहरा बदलत आहे. त्यासाठी सभागृहातील सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्याचे फळ म्हणून पालिका स्वच्छतेत अग्रेसर राहिल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले.सातत्य राखलेहिंगोली शहरातील स्वच्छतेसाठी विविध उपक्रम आखले. जनतेच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न झाला. तर सातत्य राखता आल्याने हे यश मिळाल्याचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण म्हणाले.सामूहिक यशहिंगोलीकरांनी या उपक्रमास चांगली साथ दिली. पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी सांघिक काम केले. त्यामुळे मराठवाड्यात प्रथम येण्याचा मान मिळाला, असे मुख्याधिकारी रामदास पाटील म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान