शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:43 IST

स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे.

हिंगोली : स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. आगामी काळात दहा कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.हिंगोली नगरपालिका क्षेत्रात मागील दोन ते अडीच वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी धडपड केली जात आहे.पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी सगळ्यांनीच यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे यापूर्वीही नगरपालिकेने तीन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. आता पुन्हा गुणांकनानुसार रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. गतवर्षी ३९ व्या क्रमांकावर असलेली हिंगोली पालिका यावेळी पश्चिम झोनमध्ये १00२ शहरांशी स्पर्धा करीत २९ व्या क्रमांकावर आली आहे.स्वच्छतेत ठेवलेल्या सातत्यामुळे तीनदा केंद्रीय पथकाने तपासणी केल्यानंतरही हे यश मिळाले आहे. शहरातील विविध भागात जवळपास ३५ पेक्षा जास्त सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. याशिवाय शहरात नियमितपणे घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार आता बंदच झाल्यात जमा आहेत.तर सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या ठेवून त्यांचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय डम्पिंग ग्राऊंड व अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीही राबविण्यात येत आहे. त्यामुळे गुणांकन सुधारले आहे. हे अभियान सुरु करताना अनेक यंत्रणांकडून सीएसआरच्या माध्यमातून गोरगरिबांना कचरा कुंड्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे स्वच्छतेत सातत्य राखण्यात यश मिळाले आहे. भविष्यात शहराला शासनाकडून १0 कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याचीही शक्यता आहे.

मेहनतीचे फळहिंगोली शहराचा चेहरा बदलत आहे. त्यासाठी सभागृहातील सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्याचे फळ म्हणून पालिका स्वच्छतेत अग्रेसर राहिल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले.सातत्य राखलेहिंगोली शहरातील स्वच्छतेसाठी विविध उपक्रम आखले. जनतेच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न झाला. तर सातत्य राखता आल्याने हे यश मिळाल्याचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण म्हणाले.सामूहिक यशहिंगोलीकरांनी या उपक्रमास चांगली साथ दिली. पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी सांघिक काम केले. त्यामुळे मराठवाड्यात प्रथम येण्याचा मान मिळाला, असे मुख्याधिकारी रामदास पाटील म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान