शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:43 IST

स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे.

हिंगोली : स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. आगामी काळात दहा कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.हिंगोली नगरपालिका क्षेत्रात मागील दोन ते अडीच वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी धडपड केली जात आहे.पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी सगळ्यांनीच यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे यापूर्वीही नगरपालिकेने तीन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. आता पुन्हा गुणांकनानुसार रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. गतवर्षी ३९ व्या क्रमांकावर असलेली हिंगोली पालिका यावेळी पश्चिम झोनमध्ये १00२ शहरांशी स्पर्धा करीत २९ व्या क्रमांकावर आली आहे.स्वच्छतेत ठेवलेल्या सातत्यामुळे तीनदा केंद्रीय पथकाने तपासणी केल्यानंतरही हे यश मिळाले आहे. शहरातील विविध भागात जवळपास ३५ पेक्षा जास्त सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. याशिवाय शहरात नियमितपणे घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार आता बंदच झाल्यात जमा आहेत.तर सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या ठेवून त्यांचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय डम्पिंग ग्राऊंड व अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीही राबविण्यात येत आहे. त्यामुळे गुणांकन सुधारले आहे. हे अभियान सुरु करताना अनेक यंत्रणांकडून सीएसआरच्या माध्यमातून गोरगरिबांना कचरा कुंड्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे स्वच्छतेत सातत्य राखण्यात यश मिळाले आहे. भविष्यात शहराला शासनाकडून १0 कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याचीही शक्यता आहे.

मेहनतीचे फळहिंगोली शहराचा चेहरा बदलत आहे. त्यासाठी सभागृहातील सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्याचे फळ म्हणून पालिका स्वच्छतेत अग्रेसर राहिल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले.सातत्य राखलेहिंगोली शहरातील स्वच्छतेसाठी विविध उपक्रम आखले. जनतेच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न झाला. तर सातत्य राखता आल्याने हे यश मिळाल्याचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण म्हणाले.सामूहिक यशहिंगोलीकरांनी या उपक्रमास चांगली साथ दिली. पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी सांघिक काम केले. त्यामुळे मराठवाड्यात प्रथम येण्याचा मान मिळाला, असे मुख्याधिकारी रामदास पाटील म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान