शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अन् राजकीय शांतता पसरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:28 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.लोकसभा निवडणुकीला सहा महिने राहिले. ही निवडणूक लढणाऱ्यांनी मैदानात उतरणे साहजिक आहे. मात्र विधानस इच्छुकांनीच त्या आधी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने मोठी गोची निर्माण झाली होती. लोकसभेचे घोडे बाजूलाच अन् ही मंडळीच उतावीळपणा करून चर्चेत येत होती. त्यात आताच निवडणुका नसल्याने धसमुसळेपणा वाढीस गेल्याने वातावरणही तंगले होते. एक-दोन मतदारसंघातील ठरावीक मंडळीच या रणांगणात आधीच उतरल्याचे दिसत होते. मात्र आता लोकसभा असो वा विधानसभा. कोणत्याही निवडणुकीसाठीचा पुढारी घराबाहेरही पडत नसल्याचे दिसत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे काँग्रेसमध्ये चैतन्य आले असले तरीही या पक्षाने पाहिजे तेवढ्या प्रमाणात मरगळ झटकली नाही. खा.राजीव सातव आले की, अ‍ॅक्टिव्ह होणारा हा पक्ष त्यांच्या दिल्ली दौºयात निपचित पडून राहतो. या पक्षात अनेकांना विधानसभेचे वेध लागल्याने ही मंडळी तेवढी चर्चेत येण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र जनमाणसात जावून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न स्पर्धेपुरताच उरल्याचे दिसत आहे. भाजप तर सत्ताधारी असल्याने त्यांनी नेतेमंडळी जमा करून ठेवली. मध्यंतरी सीएम चषकाच्या निमित्ताने या मंडळींनी लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यातही काही जणांचाच पुढाकार होता. जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांची भ्रमंती तेवढाच पक्षाचा कार्यक्रम असतो. राष्ट्रवादीची वरिष्ठ नेतेमंडळी कमालीची कामाला लागल्याचा साक्षात्कार हिंगोली जिल्ह्यालाही होत आहे. दर आठ दिवसाला कुणीतरी वरिष्ठ नेता येतो. स्थानिकांना कामाला लावतो. शिवसेनेत तर लोकसभा उमेदवाराचा शोधच संपणार नसल्याचे दिसत असून त्यांना ही जागा लढायची की नाही? असा संभ्रम निर्माण होण्याइतपत परिस्थिती गंभीर आहे.मध्यंतरी कळमनुरीचे काँग्रेस आ.संतोष टारफे व सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यात रंगलेल्या कलगीतुºयामुळे चर्चेत असलेली सेना आता पुन्हा थंड पडल्यात जमा आहे. एकंदर जिल्ह्यातील प्रमुख पक्षांसारखीच इतरांचीही स्थिती आहे. इतरही कोणी मैदानात उतरणार असल्याचे संकेत देत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण