शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

अन् राजकीय शांतता पसरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:28 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.लोकसभा निवडणुकीला सहा महिने राहिले. ही निवडणूक लढणाऱ्यांनी मैदानात उतरणे साहजिक आहे. मात्र विधानस इच्छुकांनीच त्या आधी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने मोठी गोची निर्माण झाली होती. लोकसभेचे घोडे बाजूलाच अन् ही मंडळीच उतावीळपणा करून चर्चेत येत होती. त्यात आताच निवडणुका नसल्याने धसमुसळेपणा वाढीस गेल्याने वातावरणही तंगले होते. एक-दोन मतदारसंघातील ठरावीक मंडळीच या रणांगणात आधीच उतरल्याचे दिसत होते. मात्र आता लोकसभा असो वा विधानसभा. कोणत्याही निवडणुकीसाठीचा पुढारी घराबाहेरही पडत नसल्याचे दिसत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे काँग्रेसमध्ये चैतन्य आले असले तरीही या पक्षाने पाहिजे तेवढ्या प्रमाणात मरगळ झटकली नाही. खा.राजीव सातव आले की, अ‍ॅक्टिव्ह होणारा हा पक्ष त्यांच्या दिल्ली दौºयात निपचित पडून राहतो. या पक्षात अनेकांना विधानसभेचे वेध लागल्याने ही मंडळी तेवढी चर्चेत येण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र जनमाणसात जावून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न स्पर्धेपुरताच उरल्याचे दिसत आहे. भाजप तर सत्ताधारी असल्याने त्यांनी नेतेमंडळी जमा करून ठेवली. मध्यंतरी सीएम चषकाच्या निमित्ताने या मंडळींनी लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यातही काही जणांचाच पुढाकार होता. जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांची भ्रमंती तेवढाच पक्षाचा कार्यक्रम असतो. राष्ट्रवादीची वरिष्ठ नेतेमंडळी कमालीची कामाला लागल्याचा साक्षात्कार हिंगोली जिल्ह्यालाही होत आहे. दर आठ दिवसाला कुणीतरी वरिष्ठ नेता येतो. स्थानिकांना कामाला लावतो. शिवसेनेत तर लोकसभा उमेदवाराचा शोधच संपणार नसल्याचे दिसत असून त्यांना ही जागा लढायची की नाही? असा संभ्रम निर्माण होण्याइतपत परिस्थिती गंभीर आहे.मध्यंतरी कळमनुरीचे काँग्रेस आ.संतोष टारफे व सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यात रंगलेल्या कलगीतुºयामुळे चर्चेत असलेली सेना आता पुन्हा थंड पडल्यात जमा आहे. एकंदर जिल्ह्यातील प्रमुख पक्षांसारखीच इतरांचीही स्थिती आहे. इतरही कोणी मैदानात उतरणार असल्याचे संकेत देत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण