शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
6
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
7
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
8
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
9
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
10
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
11
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
12
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
13
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
14
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
15
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
16
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
17
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
18
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
19
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
20
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली

रुग्णवाहिकेच्या ३६ डॉक्टरांची जबाबदारी केवळ १७ डॉक्टरांवर; वैद्यकीय तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 19:52 IST

हिंगोली जिल्ह्यात  १०८ क्रमांकच्या १२ रूग्णवाहिका सेवेत आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरांची पदभरणा करून घेणे ही कंपनीची जबाबदारी आहे.

- दयाशिल इंगोले 

हिंगोली : गंभीर रूग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हिंगोली जिल्ह्यात  १०८ क्रमांकच्या १२ रूग्णवाहिका सेवेत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून रूग्णवाहिकेचा कारभार ढेपाळला आहे. ३६ डॉक्टरांची या रूग्णवाहिकेत आवश्यकता असतानाही केवळ १७ डॉक्टरांवरच कारभार सुरू आहे. रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेबाबत तक्रारीही वाढल्या आहेत.

गंभीर रूग्णांसाठी जीवनदायिनी असलेल्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेत सध्या डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेबाबत तक्रारी वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे रूग्णवाहिका सेवीची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीला याबाबत वारंवार पत्र पाठवून डॉक्टरांची पदभरणा करावी या संदर्भाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्र पाठविले आहे. परंतु सदर पत्राला कंपनीकडून अद्याप उत्तर मिळाले नाही. परंतु कंपनीकडून पदभरती संदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातर्फे देण्यात आली. असे असले तरी मागील काही दिवसांपासून रूग्णवाहिकेतील सेवेचा बोजवारा उडल्याने मात्र गंभीर रूग्णांचे हाल होत आहेत.

हिंगोली येथील जिल्हा रूग्णालय अंतर्गत जिल्ह्यात एकूण १०८ क्रमांकच्या अत्याधुनिक सेवा असलेल्या १२ रूग्णवाहिका आहेत. या बाराही रूग्णवाहिकेत नियमानुसार ३६ डॉक्टर असणे आवश्यक आहे. जेणेकरून आठ तासांच्या शिप्टनुसार रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवा देताना अडचणी येणार नाहीत. परंतु १७ डॉक्टरच सध्या कार्यरत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताणही येत आहे. त्यामुळे सध्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेचे नियोजनच कोलमडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेमुळे गंभीर रूग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

आपात्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेमुळे अनेकांचे प्राणही वाचले. परंतु सध्या व्यवस्थापनच कोलमडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यात जिल्हा शल्यचिकित्सकही मागील काही दिवसांपासून ते आजारी रजेवर होते, परंतु ते रूजू झाले आहेत. त्यामुळे आता तरी रूग्णालयातील ढेपाळलेल्या कारभारावर नियंत्रण येईल का हाही प्रश्नच आहे. परंतु सध्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे मात्र गंभीर रूग्णांचा जीव धोक्यात सापडला आहे. अपघात किंवा इतरत्र कुठल्याही घटनेत गंभीर जमखी झालेल्या रूग्णांनाच्या मदतीला धावून जाणाऱ्या रूग्ण्वाहिकेतील सेवाच कोलमडली आहे.

१०८ रूग्णवाहिकेची जिल्ह्यात २०१४ पासून सेवाहिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात १०८ क्रमांकची सेवा २०१४ पासून कार्यान्वीत आहे. मागील पाच वर्षांत जवळपास ६३ हजार ६५८ रूग्णांना १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेची सेवा मिळाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने जीवदानही मिळाले आहे. ४परंतु मागील काही महिन्यांपासून १०८ रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सुविधेचे  नियोजन कोलमडले आहे. शिवाय याबाबत नागरिक, रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीही वाढतच चालल्या आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असून तशी मागणी होत आहे.४जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील गोर-गरिब रूग्ण येथे उपचारासाठी येतात. परंतु जिल्हा रूग्णालयातील ढेपाळलेल्या कारभाराचा फटका त्यांना सहन करावा लागतो. याकडे मात्र संबंधित वैद्यकीय अधिकारी मात्र लक्ष देत नाहीत हे विशेष.

१०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या तुटड्या संदर्भात संबंधित कंपनीला तसे पत्र पाठविले आहे. डॉक्टरांची पदभरणा करून घेणे ही कंपनीची जबाबदारी आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून जिल्हा रूग्णालयाकडून वारंवार पत्रही पाठविण्यात आले आहेत.- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास हिंगोली. 

टॅग्स :doctorडॉक्टरHingoliहिंगोलीmedicineऔषधं