शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर उशिराने का होईना स्वच्छतेस सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:11 IST

शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला होता. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली. मात्र स्वच्छता लवकर करण्यात आली नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. उशिराने का होईना अखेर ४ जानेवारीपासून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे.हिंगोली शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याने पसिरातील नागररिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. संबधित प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागला. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रया दिल्या जात आहेत. नगरपालिकेने याकडे लक्ष दिल्याने स्वच्छता विभागाचे कर्मचाºयांनी शुक्रवारपासून साफसफाई करण्यास सुरूवात करण्यात आली. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याने तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी येथील गणेशअण्णा चौधरी यांनी लोकमत शी बोलताना प्रतिक्रया दिली.माशांचा मृत्यू कोणीतरी विषारी द्राव्य टाकल्याने झाला या संदर्भाचे निवदेन कंत्राटदार सय्यद नईम स. मुसा यांनी हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते. नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली.मृत माशांची दुर्गधी परिसरात पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले. विशेष म्हणजे पालिकेच्या कर्मचाºयांनी साफसफाईची कामे हाती घेतल्यानंतर तलावातून मुदत संपलेली औषधी व गोळ्या सापडल्या. त्यामुळे आता माशांचा मृत्यू कशामुळे झाला असावा याचा अंदाज लागणे कठीण आहे. प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. तलावातील मृत मासे काढण्यास सुरूवात करण्यात आली असली तरी स्वच्छतेचे काम लवकर करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान