शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
4
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
5
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
6
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
7
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
8
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
9
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
10
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
11
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
12
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
13
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
14
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
15
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
16
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
17
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
18
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
19
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा

प्रशासनाच्या जनजागृतीने वाढली मतदानाची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

हिंगोली : लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ...

हिंगोली : लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात जनजागृती अभियान राबविले होते. त्यामुळेच मतदार घराच्या बाहेर पडला. ग्रामपंचायत निवडणुकीत तर विक्रमी मतदान झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

राज्य घटनेने प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार दिला आहे. कोणाचे सरकार स्थापन करायचे वा कोणाचे पाडायचे, याची ताकद मतदारांमध्ये असते. मात्र, मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये अनुत्सुकता दिसून येते. मतदानासाठी दिलेल्या सुटीच्या दिवशी अनेकजण सहलीचे आयोजन करत कुटुंबीयांसमवेत वेळ घालवितात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जनजागृती करत मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनानेही मतदान जनजागृती करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या होत्या. त्यामुळेच २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केेवारी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या मतदार संघातील टक्केवारी काहीशी घसरली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृती करण्यासाठी पथके कामाला लावली होती. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढली होती. यात आखणी वाढ होत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे.

लोकसभेसाठी मतदान

२०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सरासरी ६६.५२ टक्के मतदान झाले होते. यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या तीन मतदार संघामध्ये सरासरी ६४.८१ टक्के मतदान झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत वसमत ६९.६३, कळमनुरी ६७.२१, हिंगोली मतदार संघात ६२.७६ टक्के मतदान झाले. या तीन मतदार संघातील मतदानाची सरासरी टक्केवारी ६६.५३ होती. २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र वसमत ६८.०७, कळमनुरी ६५.६४, हिंगोली ६०.७३ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी वसमत, कळमनुरी व हिंगोली या मतदार संघातील टक्केवारी घसरली होती.

विधानसभेसाठी मतदान

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली या मतदार संघाची टक्केवारी पाहिल्यास ६४.८१ होती. मात्र, प्रशासनाने जनजागृती केल्याने २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६८.७२ टक्के मतदान झाले. यात वसमत ७४.०३, हिंगोली ६३.६३, कळमनुरी ६८.८६ टक्के मतदानाचा समावेश आहे.

ग्रामपंचायतीसाठी मतदान

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतदान वाढल्याचे पाहावयास मिळाले. तसेच ग्रामपंचायतीमध्ये आणखी टक्केवारी वाढली असून, सरासारी ८२ टक्के असे विक्रमी मतदान झाले. यात हिंगोली तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी ८२.५, सेनगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींसाठी ८०.५, औंढा नागनाथ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींसाठी ८१.४१, कळमनुरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी ८०.१४, वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान झाले आहे. विधानसभेच्या तुलनेत यात विक्रमी मतदान झाले आहे.

२०्र१४

लोकसभा

३४/६६

२०१९

विधानसभा

३२/६८

२०२०

ग्रामपंचायत

८२