शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या जनजागृतीने वाढली मतदानाची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

हिंगोली : लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ...

हिंगोली : लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात जनजागृती अभियान राबविले होते. त्यामुळेच मतदार घराच्या बाहेर पडला. ग्रामपंचायत निवडणुकीत तर विक्रमी मतदान झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

राज्य घटनेने प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार दिला आहे. कोणाचे सरकार स्थापन करायचे वा कोणाचे पाडायचे, याची ताकद मतदारांमध्ये असते. मात्र, मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये अनुत्सुकता दिसून येते. मतदानासाठी दिलेल्या सुटीच्या दिवशी अनेकजण सहलीचे आयोजन करत कुटुंबीयांसमवेत वेळ घालवितात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जनजागृती करत मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनानेही मतदान जनजागृती करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या होत्या. त्यामुळेच २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केेवारी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या मतदार संघातील टक्केवारी काहीशी घसरली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृती करण्यासाठी पथके कामाला लावली होती. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढली होती. यात आखणी वाढ होत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे.

लोकसभेसाठी मतदान

२०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सरासरी ६६.५२ टक्के मतदान झाले होते. यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या तीन मतदार संघामध्ये सरासरी ६४.८१ टक्के मतदान झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत वसमत ६९.६३, कळमनुरी ६७.२१, हिंगोली मतदार संघात ६२.७६ टक्के मतदान झाले. या तीन मतदार संघातील मतदानाची सरासरी टक्केवारी ६६.५३ होती. २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र वसमत ६८.०७, कळमनुरी ६५.६४, हिंगोली ६०.७३ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी वसमत, कळमनुरी व हिंगोली या मतदार संघातील टक्केवारी घसरली होती.

विधानसभेसाठी मतदान

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली या मतदार संघाची टक्केवारी पाहिल्यास ६४.८१ होती. मात्र, प्रशासनाने जनजागृती केल्याने २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६८.७२ टक्के मतदान झाले. यात वसमत ७४.०३, हिंगोली ६३.६३, कळमनुरी ६८.८६ टक्के मतदानाचा समावेश आहे.

ग्रामपंचायतीसाठी मतदान

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतदान वाढल्याचे पाहावयास मिळाले. तसेच ग्रामपंचायतीमध्ये आणखी टक्केवारी वाढली असून, सरासारी ८२ टक्के असे विक्रमी मतदान झाले. यात हिंगोली तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी ८२.५, सेनगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींसाठी ८०.५, औंढा नागनाथ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींसाठी ८१.४१, कळमनुरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी ८०.१४, वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान झाले आहे. विधानसभेच्या तुलनेत यात विक्रमी मतदान झाले आहे.

२०्र१४

लोकसभा

३४/६६

२०१९

विधानसभा

३२/६८

२०२०

ग्रामपंचायत

८२