शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

प्रशासनाच्या जनजागृतीने वाढली मतदानाची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

हिंगोली : लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ...

हिंगोली : लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात जनजागृती अभियान राबविले होते. त्यामुळेच मतदार घराच्या बाहेर पडला. ग्रामपंचायत निवडणुकीत तर विक्रमी मतदान झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

राज्य घटनेने प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार दिला आहे. कोणाचे सरकार स्थापन करायचे वा कोणाचे पाडायचे, याची ताकद मतदारांमध्ये असते. मात्र, मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये अनुत्सुकता दिसून येते. मतदानासाठी दिलेल्या सुटीच्या दिवशी अनेकजण सहलीचे आयोजन करत कुटुंबीयांसमवेत वेळ घालवितात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जनजागृती करत मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनानेही मतदान जनजागृती करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या होत्या. त्यामुळेच २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केेवारी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या मतदार संघातील टक्केवारी काहीशी घसरली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृती करण्यासाठी पथके कामाला लावली होती. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढली होती. यात आखणी वाढ होत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे.

लोकसभेसाठी मतदान

२०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सरासरी ६६.५२ टक्के मतदान झाले होते. यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या तीन मतदार संघामध्ये सरासरी ६४.८१ टक्के मतदान झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत वसमत ६९.६३, कळमनुरी ६७.२१, हिंगोली मतदार संघात ६२.७६ टक्के मतदान झाले. या तीन मतदार संघातील मतदानाची सरासरी टक्केवारी ६६.५३ होती. २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र वसमत ६८.०७, कळमनुरी ६५.६४, हिंगोली ६०.७३ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी वसमत, कळमनुरी व हिंगोली या मतदार संघातील टक्केवारी घसरली होती.

विधानसभेसाठी मतदान

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली या मतदार संघाची टक्केवारी पाहिल्यास ६४.८१ होती. मात्र, प्रशासनाने जनजागृती केल्याने २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६८.७२ टक्के मतदान झाले. यात वसमत ७४.०३, हिंगोली ६३.६३, कळमनुरी ६८.८६ टक्के मतदानाचा समावेश आहे.

ग्रामपंचायतीसाठी मतदान

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतदान वाढल्याचे पाहावयास मिळाले. तसेच ग्रामपंचायतीमध्ये आणखी टक्केवारी वाढली असून, सरासारी ८२ टक्के असे विक्रमी मतदान झाले. यात हिंगोली तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी ८२.५, सेनगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींसाठी ८०.५, औंढा नागनाथ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींसाठी ८१.४१, कळमनुरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी ८०.१४, वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान झाले आहे. विधानसभेच्या तुलनेत यात विक्रमी मतदान झाले आहे.

२०्र१४

लोकसभा

३४/६६

२०१९

विधानसभा

३२/६८

२०२०

ग्रामपंचायत

८२