शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

वगरवाडी गावात डेंग्यूने तिघांचा मृत्यू झाल्यावर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:01 IST

तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.

ठळक मुद्देघाणीचा अख्ख्या गावालाच विळखा : अजूनही वगरवाडी गावात तापाची साथ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.वगरवाडी हे गाव शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. तिघांचा बळी गेल्याच्या प्रकारामुळे या गावाला प्रत्यक्ष भेट दिली. गावात प्रवेश करताच रस्त्याचे रूपांतर गटारगंगेत झाल्याचे दिसून येत होते. नाल्या तुंबल्याने डासांचा मोठा प्रादुर्भाव असून हीच बाब आजाराला निमत्रंण देत असल्याचे दिसले. कैलास नरुके यांच्या घरानजीक तर घाणीचा कहर आहे. यात त्यांचे कुटुंबच आजारी पडले आहे. राम कैलास नरूके (१४) हाही तापाने फणफणला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.त्याच्या दु:खातून कुटुंब सावरत नाही तोच स्वाती कैलास नरूके (११) ही आजारी पडली. २४ नोव्हेंबरला मृत्यू झाला. त्यांच्या घरी भेट दिली असता कुटुंबियांनी सांगितले की, आमच्या लेकराला ताप आला होता, यानंतर औंढा येथे खासगी रूग्णालयात दाखविले; परंतु ताप कमी होत नसल्याने हिंगोलीला नेले; परंतु त्यांनीही नांदेडला पाठवल्याने या पाच ते सहा दिवसात ताप जास्त होवून डेंग्यूने आमच्या लेकरांचा बळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर शशिकला गुणाजी कच्छवे यांचाही ११ नोव्हेंबर रोजी ताप वाढल्याने म्हणजे डेंग्यूनेच झाल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्यांंच्या घरालादेखील सांडपाणी, नालीचे दूषित पाण्याने वेढा दिला आहे. मात्र आता पुन्हा गावात तापाची साथ सुरू झाली अन् तपासणीअंती आणखी तिघांना डेंग्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामस्थांनी डेंग्यूने गावातील लोकांचा बळी जात असल्याची ओरड सुरू केली. तेव्हा आरोग्य विभाग जागा झाला.आरोग्य पथक घरोघरी भेटी देवून पाणी साठलेले रांजण, टाक्या रिकाम्या करायला लावत आहे; परंतु या पाण्यातून अळ्या निघाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तापाने फणफणत असलेले अनुष्का शिवाजी पवार, बालाजी बबन विधाटे यांच्यावर हिंगोली, परभणी येथे उपचार करून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना डेंग्यू झाल्याचे उपचारानंतर निष्पन्न झाले.आरोग्य विभागाचे कोणीच फिरकत नाही?शिरडशहापूरला प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडलेले आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी हे विनोद अतुरकर असून, गावात आरोग्य सेविका पी.आर. धात्रक, ए.बी. जोगदंड आहेत; मात्र हे कर्मचारी कधीच गावात फिरुन त्यांनी जनजागृती केल्याचे पाहिले नसल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्या तिघांच्या मृत्युमुळे आरोग्य विभाग जागा झाला आहे, असे ग्रामस्थ सांगत होते.