शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

वगरवाडी गावात डेंग्यूने तिघांचा मृत्यू झाल्यावर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:01 IST

तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.

ठळक मुद्देघाणीचा अख्ख्या गावालाच विळखा : अजूनही वगरवाडी गावात तापाची साथ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.वगरवाडी हे गाव शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. तिघांचा बळी गेल्याच्या प्रकारामुळे या गावाला प्रत्यक्ष भेट दिली. गावात प्रवेश करताच रस्त्याचे रूपांतर गटारगंगेत झाल्याचे दिसून येत होते. नाल्या तुंबल्याने डासांचा मोठा प्रादुर्भाव असून हीच बाब आजाराला निमत्रंण देत असल्याचे दिसले. कैलास नरुके यांच्या घरानजीक तर घाणीचा कहर आहे. यात त्यांचे कुटुंबच आजारी पडले आहे. राम कैलास नरूके (१४) हाही तापाने फणफणला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.त्याच्या दु:खातून कुटुंब सावरत नाही तोच स्वाती कैलास नरूके (११) ही आजारी पडली. २४ नोव्हेंबरला मृत्यू झाला. त्यांच्या घरी भेट दिली असता कुटुंबियांनी सांगितले की, आमच्या लेकराला ताप आला होता, यानंतर औंढा येथे खासगी रूग्णालयात दाखविले; परंतु ताप कमी होत नसल्याने हिंगोलीला नेले; परंतु त्यांनीही नांदेडला पाठवल्याने या पाच ते सहा दिवसात ताप जास्त होवून डेंग्यूने आमच्या लेकरांचा बळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर शशिकला गुणाजी कच्छवे यांचाही ११ नोव्हेंबर रोजी ताप वाढल्याने म्हणजे डेंग्यूनेच झाल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्यांंच्या घरालादेखील सांडपाणी, नालीचे दूषित पाण्याने वेढा दिला आहे. मात्र आता पुन्हा गावात तापाची साथ सुरू झाली अन् तपासणीअंती आणखी तिघांना डेंग्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामस्थांनी डेंग्यूने गावातील लोकांचा बळी जात असल्याची ओरड सुरू केली. तेव्हा आरोग्य विभाग जागा झाला.आरोग्य पथक घरोघरी भेटी देवून पाणी साठलेले रांजण, टाक्या रिकाम्या करायला लावत आहे; परंतु या पाण्यातून अळ्या निघाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तापाने फणफणत असलेले अनुष्का शिवाजी पवार, बालाजी बबन विधाटे यांच्यावर हिंगोली, परभणी येथे उपचार करून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना डेंग्यू झाल्याचे उपचारानंतर निष्पन्न झाले.आरोग्य विभागाचे कोणीच फिरकत नाही?शिरडशहापूरला प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडलेले आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी हे विनोद अतुरकर असून, गावात आरोग्य सेविका पी.आर. धात्रक, ए.बी. जोगदंड आहेत; मात्र हे कर्मचारी कधीच गावात फिरुन त्यांनी जनजागृती केल्याचे पाहिले नसल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्या तिघांच्या मृत्युमुळे आरोग्य विभाग जागा झाला आहे, असे ग्रामस्थ सांगत होते.