शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

वगरवाडी गावात डेंग्यूने तिघांचा मृत्यू झाल्यावर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:01 IST

तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.

ठळक मुद्देघाणीचा अख्ख्या गावालाच विळखा : अजूनही वगरवाडी गावात तापाची साथ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.वगरवाडी हे गाव शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. तिघांचा बळी गेल्याच्या प्रकारामुळे या गावाला प्रत्यक्ष भेट दिली. गावात प्रवेश करताच रस्त्याचे रूपांतर गटारगंगेत झाल्याचे दिसून येत होते. नाल्या तुंबल्याने डासांचा मोठा प्रादुर्भाव असून हीच बाब आजाराला निमत्रंण देत असल्याचे दिसले. कैलास नरुके यांच्या घरानजीक तर घाणीचा कहर आहे. यात त्यांचे कुटुंबच आजारी पडले आहे. राम कैलास नरूके (१४) हाही तापाने फणफणला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.त्याच्या दु:खातून कुटुंब सावरत नाही तोच स्वाती कैलास नरूके (११) ही आजारी पडली. २४ नोव्हेंबरला मृत्यू झाला. त्यांच्या घरी भेट दिली असता कुटुंबियांनी सांगितले की, आमच्या लेकराला ताप आला होता, यानंतर औंढा येथे खासगी रूग्णालयात दाखविले; परंतु ताप कमी होत नसल्याने हिंगोलीला नेले; परंतु त्यांनीही नांदेडला पाठवल्याने या पाच ते सहा दिवसात ताप जास्त होवून डेंग्यूने आमच्या लेकरांचा बळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर शशिकला गुणाजी कच्छवे यांचाही ११ नोव्हेंबर रोजी ताप वाढल्याने म्हणजे डेंग्यूनेच झाल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्यांंच्या घरालादेखील सांडपाणी, नालीचे दूषित पाण्याने वेढा दिला आहे. मात्र आता पुन्हा गावात तापाची साथ सुरू झाली अन् तपासणीअंती आणखी तिघांना डेंग्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामस्थांनी डेंग्यूने गावातील लोकांचा बळी जात असल्याची ओरड सुरू केली. तेव्हा आरोग्य विभाग जागा झाला.आरोग्य पथक घरोघरी भेटी देवून पाणी साठलेले रांजण, टाक्या रिकाम्या करायला लावत आहे; परंतु या पाण्यातून अळ्या निघाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तापाने फणफणत असलेले अनुष्का शिवाजी पवार, बालाजी बबन विधाटे यांच्यावर हिंगोली, परभणी येथे उपचार करून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना डेंग्यू झाल्याचे उपचारानंतर निष्पन्न झाले.आरोग्य विभागाचे कोणीच फिरकत नाही?शिरडशहापूरला प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडलेले आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी हे विनोद अतुरकर असून, गावात आरोग्य सेविका पी.आर. धात्रक, ए.बी. जोगदंड आहेत; मात्र हे कर्मचारी कधीच गावात फिरुन त्यांनी जनजागृती केल्याचे पाहिले नसल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्या तिघांच्या मृत्युमुळे आरोग्य विभाग जागा झाला आहे, असे ग्रामस्थ सांगत होते.