शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

प्रशासनही हलेना अन् धरणे आंदोलकही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:28 IST

कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांनी मग्रारोहयोची कामे सुरू करा तसेच यापूर्वी मागणी करूनही काम न दिल्याने बेरोजगारी भत्ता द्या या मागणीसाठीचे धरणे अजूनही सुरूच ठेवले आहे. प्रशासन केवळ चर्चा करीत असून मागणी मान्यच करायला तयार नसल्याने गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांनी मग्रारोहयोची कामे सुरू करा तसेच यापूर्वी मागणी करूनही काम न दिल्याने बेरोजगारी भत्ता द्या या मागणीसाठीचे धरणे अजूनही सुरूच ठेवले आहे. प्रशासन केवळ चर्चा करीत असून मागणी मान्यच करायला तयार नसल्याने गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.मागील आठ ते दहा दिवसांपासून धानोरा येथील जवळपास १५ ते २0 मजूर कुटुंबियांसह धरणे आंदोलन करीत आहेत. दिवसभर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यास विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते येतात. अधून-मधून प्रशासनाचे अधिकारीही त्यांना धरणे मागे घेण्याची विनंती करतात. मात्र बेरोजगारी भत्ता मंजूर झाल्याशिवाय मागे हटायचेच नाही, असा त्यांचा निश्चय दिसू लागला आहे.गटविकास अधिकाऱ्यांकडे कामाची मागणी मजुरांनी केली होती. त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. ग्रा.पं.ने त्याची दखल घेतली की नाही, हा प्रश्नच आहे. मात्र या मजुरांना त्यावेळी काम मिळाले नाही. त्यामुळे मग्रारोहयोच्या नियमावर बोट ठेवून प्रशासनास कोंडीत पकडले आहे. तर अधिकारी त्यांना दाद द्यायला तयार नाहीत. नवा पायंडा निर्माण होण्याच्या भीतीने या मजुरांचे कामाचे दिवस अजूनही वाया घातले जात आहेत. यात जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालून दप्तरदिरंगाई करणाºयांवरही बडगा उगारण्याची गरज आहे. अन्यथा मजुरांना काम न देण्याचा पायंडाही पडण्याची भीती आहे.