शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चार महिन्यांमध्ये १३१ दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

हिंगोली : फेब्रुवारी (२०२१) महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे शासनाने संचारबंदीसह टाळेबंदी ...

हिंगोली : फेब्रुवारी (२०२१) महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे शासनाने संचारबंदीसह टाळेबंदी लागू केली आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा प्रशासन संचारबंदी कडकपणे राबवित आहे; परंतु काही जण मात्र संचारबंदीचे उल्लंघन करताना आढळून येत आहेत. यादरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० फेब्रुवारी ते २८ मे या चार महिन्यांमध्ये १३१ छोट्या- मोठ्या दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख ८५ हजार १०० रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहून विनामास्क फिरणाऱ्यांना तसेच जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना दंड लावण्यात यावा, अशी सूचना शासनाने केली. दंड लावल्यास फिरणे बंद होऊन बाजारातील गर्दी कमी होईल, असे शासनाला वाटत आहे. ही जबाबदारी शासनाने नगरपरिषद तसेच पोलीस विभागावर सोपविली आहे. २० फेब्रुवारीपासून २८ मेपर्यंत १३१ दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. यामध्ये क्लब व मंगल कार्यालय ४, रेस्टॉरंट/ शॉपिंग मॉल १३० व इतर १० दुकाने अशा मिळून १३१ दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापोटी २ लाख ८५ हजार १०० रुपये वसूल करण्यात आले. त्याचबरोबर या चार महिन्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी ९४० जण विनामास्क आढळून आले. यापैकी ७८० जणांना दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापोटी १ लाख ५७ हजार ७०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

तरीही फिरणे थांबेना ...

कोरोना महामारीचे रुग्ण वाढत असतानाही काही जण मात्र विनाकारण आणि विनामास्क बाजारात फिरताना आढळून येत आहेत. दंड भरावा लागला तरी चालेल पण फिरणे आम्ही बंद करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे २० फेब्रुवारी ते २८ मे या चार महिन्यांमध्ये मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १३१ छोट्या-मोठ्या दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजच सुरू आहे. विनाकारण आणि विनामास्क नागरिकांनी बाजारात फिरू नये.

- श्याम माळवटकर,न.प. प्रशासकीय अधिकारी