शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीत तीन हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना ...

हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना अद्याप विशिष्ट क्रमांकच प्राप्त झाला नसून, या माहितीतील त्रुटी दूर करण्याबद्दल बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.

हिंगोली जिल्ह्यात १.०४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अपेक्षा होती. शेवटी बँकांनी १ लाख २ हजार ४२० खातेदारांची माहिती महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली. त्यामुळे एवढे शेतकरी तरी या योजनेसाठी पात्र असल्याचे समोर आले आहे. यांपैकी ९६ हजार ९६ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला आहे. आता ज्या शेतकऱ्यांची माहिती योग्य आहे व कर्जमुक्तीसाठी होकार आहे, अशांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. यापैकी ३ हजार १८८ जणांनी अजूनही प्रमाणीकरण केले नाही. त्यात काहींच्या खात्यातील माहितीत त्रुटी असली तरीही काहींना मात्र याबाबत माहितीच नसल्याने अडचण आहे. बँकांनीही अशांना माहिती दिली नसल्याने ते अजून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेतच आहेत.

जिल्ह्यातील ९१ हजार ४६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना ५९४.८७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. म्हणजे हजार शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केल्यानंतरही त्यांची रक्कम जमा होणे बाकी आहे. तर आतापर्यंत २२५२ शेतकऱ्यांनी जिल्हा समितीकडे तक्रारी केल्या होत्या. यापैकी १११० तक्रारींचे त्यांनी निवारण केले. तर २० त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. तर १०८५ तक्रारी तहसील स्तरावरील असल्याने त्यांच्याकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३७ प्रलंबित आहेत.

बँकांच्या उदासीनतेत अडकले चार हजार शेतकरी

ज्या १ लाख २ हजार ४२० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली. त्यापैकी सहा हजार खातेदारांच्या माहितीत त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची तसदी बँका घेत नसल्याने अजूनही या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू असताना बँकांची ही उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. शिवाय ज्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे, अशांच्याही अनेक त्रुटी या बँकांशीच संबंधित आहेत. त्यांनाही या बँका दारात उभे करीत नसल्याने नेमके काय चालले? हे कळायला मार्ग नाही.

किती दिवस चालणार योजना?

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी शासन तत्काळ निधी देत असले तरीही बँका व प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू आहे. तरीही सर्व शेतकऱ्यांना अजून लाभ मिळाला नाही. कोरोनामुळे अडचणी येत असल्या तरीही बँकांना या काळात ग्राहकांना सेवा द्यायची नसल्याने ही कामे करण्यास चांगला वाव होता. शिवाय या बँकांमध्येच ही रक्कम जमा होणार आहे. मात्र पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ करण्याची सोयच बंद होणार असल्याने बँका शेतकऱ्यांची कामे करीत नसल्याचे कटू सत्य समोर येत आहे.