शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीत तीन हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना ...

हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना अद्याप विशिष्ट क्रमांकच प्राप्त झाला नसून, या माहितीतील त्रुटी दूर करण्याबद्दल बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.

हिंगोली जिल्ह्यात १.०४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अपेक्षा होती. शेवटी बँकांनी १ लाख २ हजार ४२० खातेदारांची माहिती महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली. त्यामुळे एवढे शेतकरी तरी या योजनेसाठी पात्र असल्याचे समोर आले आहे. यांपैकी ९६ हजार ९६ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला आहे. आता ज्या शेतकऱ्यांची माहिती योग्य आहे व कर्जमुक्तीसाठी होकार आहे, अशांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. यापैकी ३ हजार १८८ जणांनी अजूनही प्रमाणीकरण केले नाही. त्यात काहींच्या खात्यातील माहितीत त्रुटी असली तरीही काहींना मात्र याबाबत माहितीच नसल्याने अडचण आहे. बँकांनीही अशांना माहिती दिली नसल्याने ते अजून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेतच आहेत.

जिल्ह्यातील ९१ हजार ४६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना ५९४.८७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. म्हणजे हजार शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केल्यानंतरही त्यांची रक्कम जमा होणे बाकी आहे. तर आतापर्यंत २२५२ शेतकऱ्यांनी जिल्हा समितीकडे तक्रारी केल्या होत्या. यापैकी १११० तक्रारींचे त्यांनी निवारण केले. तर २० त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. तर १०८५ तक्रारी तहसील स्तरावरील असल्याने त्यांच्याकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३७ प्रलंबित आहेत.

बँकांच्या उदासीनतेत अडकले चार हजार शेतकरी

ज्या १ लाख २ हजार ४२० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली. त्यापैकी सहा हजार खातेदारांच्या माहितीत त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची तसदी बँका घेत नसल्याने अजूनही या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू असताना बँकांची ही उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. शिवाय ज्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे, अशांच्याही अनेक त्रुटी या बँकांशीच संबंधित आहेत. त्यांनाही या बँका दारात उभे करीत नसल्याने नेमके काय चालले? हे कळायला मार्ग नाही.

किती दिवस चालणार योजना?

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी शासन तत्काळ निधी देत असले तरीही बँका व प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू आहे. तरीही सर्व शेतकऱ्यांना अजून लाभ मिळाला नाही. कोरोनामुळे अडचणी येत असल्या तरीही बँकांना या काळात ग्राहकांना सेवा द्यायची नसल्याने ही कामे करण्यास चांगला वाव होता. शिवाय या बँकांमध्येच ही रक्कम जमा होणार आहे. मात्र पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ करण्याची सोयच बंद होणार असल्याने बँका शेतकऱ्यांची कामे करीत नसल्याचे कटू सत्य समोर येत आहे.