शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

कर्जमुक्तीत तीन हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना ...

हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना अद्याप विशिष्ट क्रमांकच प्राप्त झाला नसून, या माहितीतील त्रुटी दूर करण्याबद्दल बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.

हिंगोली जिल्ह्यात १.०४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अपेक्षा होती. शेवटी बँकांनी १ लाख २ हजार ४२० खातेदारांची माहिती महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली. त्यामुळे एवढे शेतकरी तरी या योजनेसाठी पात्र असल्याचे समोर आले आहे. यांपैकी ९६ हजार ९६ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला आहे. आता ज्या शेतकऱ्यांची माहिती योग्य आहे व कर्जमुक्तीसाठी होकार आहे, अशांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. यापैकी ३ हजार १८८ जणांनी अजूनही प्रमाणीकरण केले नाही. त्यात काहींच्या खात्यातील माहितीत त्रुटी असली तरीही काहींना मात्र याबाबत माहितीच नसल्याने अडचण आहे. बँकांनीही अशांना माहिती दिली नसल्याने ते अजून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेतच आहेत.

जिल्ह्यातील ९१ हजार ४६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना ५९४.८७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. म्हणजे हजार शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केल्यानंतरही त्यांची रक्कम जमा होणे बाकी आहे. तर आतापर्यंत २२५२ शेतकऱ्यांनी जिल्हा समितीकडे तक्रारी केल्या होत्या. यापैकी १११० तक्रारींचे त्यांनी निवारण केले. तर २० त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. तर १०८५ तक्रारी तहसील स्तरावरील असल्याने त्यांच्याकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३७ प्रलंबित आहेत.

बँकांच्या उदासीनतेत अडकले चार हजार शेतकरी

ज्या १ लाख २ हजार ४२० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली. त्यापैकी सहा हजार खातेदारांच्या माहितीत त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची तसदी बँका घेत नसल्याने अजूनही या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू असताना बँकांची ही उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. शिवाय ज्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे, अशांच्याही अनेक त्रुटी या बँकांशीच संबंधित आहेत. त्यांनाही या बँका दारात उभे करीत नसल्याने नेमके काय चालले? हे कळायला मार्ग नाही.

किती दिवस चालणार योजना?

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी शासन तत्काळ निधी देत असले तरीही बँका व प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू आहे. तरीही सर्व शेतकऱ्यांना अजून लाभ मिळाला नाही. कोरोनामुळे अडचणी येत असल्या तरीही बँकांना या काळात ग्राहकांना सेवा द्यायची नसल्याने ही कामे करण्यास चांगला वाव होता. शिवाय या बँकांमध्येच ही रक्कम जमा होणार आहे. मात्र पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ करण्याची सोयच बंद होणार असल्याने बँका शेतकऱ्यांची कामे करीत नसल्याचे कटू सत्य समोर येत आहे.