शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीत तीन हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना ...

हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना अद्याप विशिष्ट क्रमांकच प्राप्त झाला नसून, या माहितीतील त्रुटी दूर करण्याबद्दल बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.

हिंगोली जिल्ह्यात १.०४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अपेक्षा होती. शेवटी बँकांनी १ लाख २ हजार ४२० खातेदारांची माहिती महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली. त्यामुळे एवढे शेतकरी तरी या योजनेसाठी पात्र असल्याचे समोर आले आहे. यांपैकी ९६ हजार ९६ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला आहे. आता ज्या शेतकऱ्यांची माहिती योग्य आहे व कर्जमुक्तीसाठी होकार आहे, अशांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. यापैकी ३ हजार १८८ जणांनी अजूनही प्रमाणीकरण केले नाही. त्यात काहींच्या खात्यातील माहितीत त्रुटी असली तरीही काहींना मात्र याबाबत माहितीच नसल्याने अडचण आहे. बँकांनीही अशांना माहिती दिली नसल्याने ते अजून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेतच आहेत.

जिल्ह्यातील ९१ हजार ४६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना ५९४.८७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. म्हणजे हजार शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केल्यानंतरही त्यांची रक्कम जमा होणे बाकी आहे. तर आतापर्यंत २२५२ शेतकऱ्यांनी जिल्हा समितीकडे तक्रारी केल्या होत्या. यापैकी १११० तक्रारींचे त्यांनी निवारण केले. तर २० त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. तर १०८५ तक्रारी तहसील स्तरावरील असल्याने त्यांच्याकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३७ प्रलंबित आहेत.

बँकांच्या उदासीनतेत अडकले चार हजार शेतकरी

ज्या १ लाख २ हजार ४२० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली. त्यापैकी सहा हजार खातेदारांच्या माहितीत त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची तसदी बँका घेत नसल्याने अजूनही या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू असताना बँकांची ही उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. शिवाय ज्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे, अशांच्याही अनेक त्रुटी या बँकांशीच संबंधित आहेत. त्यांनाही या बँका दारात उभे करीत नसल्याने नेमके काय चालले? हे कळायला मार्ग नाही.

किती दिवस चालणार योजना?

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी शासन तत्काळ निधी देत असले तरीही बँका व प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू आहे. तरीही सर्व शेतकऱ्यांना अजून लाभ मिळाला नाही. कोरोनामुळे अडचणी येत असल्या तरीही बँकांना या काळात ग्राहकांना सेवा द्यायची नसल्याने ही कामे करण्यास चांगला वाव होता. शिवाय या बँकांमध्येच ही रक्कम जमा होणार आहे. मात्र पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ करण्याची सोयच बंद होणार असल्याने बँका शेतकऱ्यांची कामे करीत नसल्याचे कटू सत्य समोर येत आहे.