शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

विधान परिषदेसाठी ९८.८८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:33 IST

: विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत दुपारपर्यंत मंद असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. हिंगोली जिल्ह्यात दोघांचे मतदान न झाल्याने ९८.८८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात मात्र १00 टक्के मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत दुपारपर्यंत मंद असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. हिंगोली जिल्ह्यात दोघांचे मतदान न झाल्याने ९८.८८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात मात्र १00 टक्के मतदान झाले.जिल्ह्यात विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत मिळून ३६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. परभणी व हिंगोली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात सात मतदान केंद्र होते. यापैकी परभणी जिल्ह्यात ४ होते. यात परभणीत ५८ पुरुष व ७५ महिला अशा १३३, सेलूत २८ पुरुष व २६ महिला अशा ५४, गंगाखेड येथे ३४ पुरुष व ३६ महिला अशा ७0, पाथरीत ३0 पुरुष व ३५ महिला अशा ६५ जणांनी मतदान केले. तर हिंगोली जिल्ह्यात तीन मतदान केंद्र होते. यात हिंगोलीत १0९ पैकी १0७ जणांनी मतदान केले. यात ५0 पुरुष व ५७ महिलांचा समावेश आहे. हिंगोलीचे अपक्ष नगरसेवक नाना नायक यांना तडिपारीच्या कारणावरून मतदान करण्यास मज्जाव केला. त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले होते. तर फाळेगाव सर्कलच्या काँग्रेसच्या जि.प.सदस्या सागर गौतम भिसे यांनी नाराजीतून मतदान केले नसल्याचे सांगितले जाते. तर मला पक्षश्रेष्ठींनी काहीच निरोप दिला नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. कळमनुरी येथे पुरुष १0 तर महिला ९ अशा १९ जणांनी मतदान केले. वसमत येथे २७ पुरुष व २४ महिला अशा ५१ जणांनी मतदान केले. केवळ हिंगोली येथील दोघांनी मतदान न केल्याने मतदानाची एकूण टक्केवारी ९९.६0 झाली.हिंगोलीत अपक्ष नगरसेवक नरसिंग ऊर्फ नाना नायक यांना मतदान केंद्रावर आल्यानंतर तडिपारीच्या कारणावरून मतदान करू देण्यात आले नाही. याबाबत नायक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक आयोग आदींना निवेदने पाठविली आहेत. या निवेदनात म्हटले की, मला ५ जूनपर्यंततडिपारीला स्थगिती असतानाही मतदानापासून वैयक्तिक कारणावरून वंचित ठेवल्याचा आरोप केला. तर पोलिसांना आजच्या तारखेत त्यांनी पत्र दिले. तसेच ते हिंगोलीच्या केंद्रात होते, असाही आरोप नायक यांनी केला आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर म्हणाले, मी कळमनुरीच्या केंद्रावर होतो. मात्र नायक यांना तडिपार केल्यानंतर स्थगिती उठल्याचे कोणतेच पत्र मला आले नाही. त्यांनीही दाखविले नाही. त्यामुळे पोलिसांना पत्र दिलेले होते.ही निवडणूक सुरुवातीपासूनच विविध राजकीय घडामोडींनी गाजली. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांना डावलून काँग्रेसला ही जागा बहाल करण्यात आली. तर पारंपरिकरीत्या भाजपकडून कायम लढविल्या जाणाºया या जागेवर ऐनवेळी शिवसेनेने हक्क सांगितला. उमेदवारही दिला. त्यामुळे भाजपचे सुरेश नागरे हे तयारी करूनही ऐनवेळी शिवसेनेसोबत गेले. काँग्रेसचे सुरेश देशमुख व शिवसेनेचे विप्लव बाजोरिया हे आमने-सामने आल्याने पक्षीय संख्याबळावरून देशमुख यांचे पारडे जड होते. मात्र शेवटच्या टप्प्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक एकतर्फी नाही, हे दिसून आले. आता यात बाजी कोण मारणार हे २४ मे रोजी कळणार आहे. मात्र मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत फारसा उत्साह नव्हता. उमेदवारांनी नीट प्रचारही केला नाही. ‘भेटी’-गाठींचाही तुटवडाच होता. त्यामुळे ही नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. तर आज एकट्या शिवसेनेचाच तंबू केंद्रासमोर दिसून आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूक