शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विधान परिषदेसाठी ९८.८८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:33 IST

: विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत दुपारपर्यंत मंद असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. हिंगोली जिल्ह्यात दोघांचे मतदान न झाल्याने ९८.८८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात मात्र १00 टक्के मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत दुपारपर्यंत मंद असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. हिंगोली जिल्ह्यात दोघांचे मतदान न झाल्याने ९८.८८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात मात्र १00 टक्के मतदान झाले.जिल्ह्यात विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत मिळून ३६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. परभणी व हिंगोली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात सात मतदान केंद्र होते. यापैकी परभणी जिल्ह्यात ४ होते. यात परभणीत ५८ पुरुष व ७५ महिला अशा १३३, सेलूत २८ पुरुष व २६ महिला अशा ५४, गंगाखेड येथे ३४ पुरुष व ३६ महिला अशा ७0, पाथरीत ३0 पुरुष व ३५ महिला अशा ६५ जणांनी मतदान केले. तर हिंगोली जिल्ह्यात तीन मतदान केंद्र होते. यात हिंगोलीत १0९ पैकी १0७ जणांनी मतदान केले. यात ५0 पुरुष व ५७ महिलांचा समावेश आहे. हिंगोलीचे अपक्ष नगरसेवक नाना नायक यांना तडिपारीच्या कारणावरून मतदान करण्यास मज्जाव केला. त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले होते. तर फाळेगाव सर्कलच्या काँग्रेसच्या जि.प.सदस्या सागर गौतम भिसे यांनी नाराजीतून मतदान केले नसल्याचे सांगितले जाते. तर मला पक्षश्रेष्ठींनी काहीच निरोप दिला नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. कळमनुरी येथे पुरुष १0 तर महिला ९ अशा १९ जणांनी मतदान केले. वसमत येथे २७ पुरुष व २४ महिला अशा ५१ जणांनी मतदान केले. केवळ हिंगोली येथील दोघांनी मतदान न केल्याने मतदानाची एकूण टक्केवारी ९९.६0 झाली.हिंगोलीत अपक्ष नगरसेवक नरसिंग ऊर्फ नाना नायक यांना मतदान केंद्रावर आल्यानंतर तडिपारीच्या कारणावरून मतदान करू देण्यात आले नाही. याबाबत नायक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक आयोग आदींना निवेदने पाठविली आहेत. या निवेदनात म्हटले की, मला ५ जूनपर्यंततडिपारीला स्थगिती असतानाही मतदानापासून वैयक्तिक कारणावरून वंचित ठेवल्याचा आरोप केला. तर पोलिसांना आजच्या तारखेत त्यांनी पत्र दिले. तसेच ते हिंगोलीच्या केंद्रात होते, असाही आरोप नायक यांनी केला आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर म्हणाले, मी कळमनुरीच्या केंद्रावर होतो. मात्र नायक यांना तडिपार केल्यानंतर स्थगिती उठल्याचे कोणतेच पत्र मला आले नाही. त्यांनीही दाखविले नाही. त्यामुळे पोलिसांना पत्र दिलेले होते.ही निवडणूक सुरुवातीपासूनच विविध राजकीय घडामोडींनी गाजली. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांना डावलून काँग्रेसला ही जागा बहाल करण्यात आली. तर पारंपरिकरीत्या भाजपकडून कायम लढविल्या जाणाºया या जागेवर ऐनवेळी शिवसेनेने हक्क सांगितला. उमेदवारही दिला. त्यामुळे भाजपचे सुरेश नागरे हे तयारी करूनही ऐनवेळी शिवसेनेसोबत गेले. काँग्रेसचे सुरेश देशमुख व शिवसेनेचे विप्लव बाजोरिया हे आमने-सामने आल्याने पक्षीय संख्याबळावरून देशमुख यांचे पारडे जड होते. मात्र शेवटच्या टप्प्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक एकतर्फी नाही, हे दिसून आले. आता यात बाजी कोण मारणार हे २४ मे रोजी कळणार आहे. मात्र मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत फारसा उत्साह नव्हता. उमेदवारांनी नीट प्रचारही केला नाही. ‘भेटी’-गाठींचाही तुटवडाच होता. त्यामुळे ही नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. तर आज एकट्या शिवसेनेचाच तंबू केंद्रासमोर दिसून आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूक