शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

९३.६७ कोटींचा आराखडा प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:45 IST

जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत वीज व आरोग्याचा प्रश्न चांगलाच गाजला. या बैठकीत ९३.६७ कोटीच्या विकास कामांचा आराखडाही प्रस्तावित करण्यात आला. अधिकाºयांनी लक्ष घालून या समस्या त्वरीत सोडविण्याचा आदेश पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती बैठक : वीजबिल वसुलीतून रोहित्रांसाठी आॅईल खरेदी करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत वीज व आरोग्याचा प्रश्न चांगलाच गाजला. या बैठकीत ९३.६७ कोटीच्या विकास कामांचा आराखडाही प्रस्तावित करण्यात आला. अधिकाºयांनी लक्ष घालून या समस्या त्वरीत सोडविण्याचा आदेश पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष टारफे, आ. जयप्रकाश मुंदडा, आ. रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सीईओ एच.पी. तुम्मोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांची उपस्थिती होती.चालू आर्थिक वर्षातील कामांवर बैठकीत चर्चा झाली. तर २0१७-१८ चा आराखडा प्रस्तावित करण्यासाठी सादर करण्यात आला. यामध्ये सर्वसाधारणसाठी ९३.६७ कोटी, यात गाभा क्षेत्रात ५0.४२ कोटी, बिगर गाभा क्षेत्रात २५.२१ कोटी , इतर योजनांसह नावीन्यपूर्ण योजनेत १५ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. तर अनुसूचित जाती उपाययोजनेच्या आराखड्यात ५0.४७ कोटींच्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. आदिवासी उपाययोजनेत २९.१७ कोटींच्या योजना प्रस्तावित केल्या.जिल्हा सामान्य रुग्णालयाचा प्रश्न चांगलाच गाजला. येथे साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याबाबत आ. रामराव वडकुते, आ. संतोष टारफे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. अनेक सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. इमारत बांधकामही लवकर करून ते वापरात यावे, अशी मागणी केली. तर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम होवून साहित्य नसल्याने अडचण असल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर जळालेल्या रोहित्रांचा मुद्दा आजही गाजला. तर ग्रामीण व शहरी भागातही लोंबकळलेल्या तारा दुरुस्त होत नसल्याचे सांगण्यात आले. आॅईलचा प्रश्न आ.वडकुते यांनी बराच काळ ताणून धरला. यात पालकमंत्री कांबळे यांनी नव्याने झालेल्या वसुलीतून नवीन रोहित्रांसह आॅईल खरेदीस प्राधान्य देण्याचा आदेश दिला. ८ कोटींची वसुली झाल्याचे सांगितले जाते. तर २0१४ पासून कोटेशन भरूनही वीज जोडण्या मिळाल्या नसल्याचा आरोप झाला. सिद्धेश्वर धरणावरील मत्स्यव्यवसाय व बिजोत्पादनाचा प्रश्नही चांगलाच गाजला. संबंधितास पंधरा वर्षांचे कंत्राट दिलेच कसे, असा सवाल वडकुते यांनी केला. एका जि.प. सदस्याने अंगणवाड्यांचा प्रश्न मांडून त्यासाठी १0 लाखांप्रमाणे निधी मंजूर करण्याची मागणी केली. यापूर्वी यात सात कोटी परत गेले आहेत. गोरेगाव भागातील सीएनबीची ९ कामे जलयुक्त शिवार योजनेत मंजूर होती. मात्र तीनच झाल्याचे सांगून संजय कावरखे यांनी उर्वरित सहा कामांना मंजुरी देण्याची मागणी केली. अंकुश आहेर यांनी ३0५४ या हेडचा निधी जि.प.ला देण्याची मागणी केली. जयप्रकाश मुंदडा यांनी घरकुल योजनेसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयात दलालांना भेटावे लागते, असा आरोप केला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाने आश्रमशाळांचा कायापालट केल्याची कौतुकाची थाप प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्या पाठीवर मारली. तर समाजकल्याणनेही असा आदर्श निर्माण करावा, असे सांगितले.