शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

‘पूर्णे’ साठी ८०.५४ टक्के मतदान; ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: July 9, 2023 18:44 IST

११ जुलै रोजी मतमोजणी व निकाल; परीवर्तन की पुन्हा दांडेगावकर याकडे लागले लक्ष

इस्माईल जहागिरदार, वसमत (जि. हिंगोली): पूर्णा  सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी ९ जुलै रोजी ८०.५४ टक्के मतदान झाले. २१ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी ‘आयटीआय’ मध्ये मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. २१ हजार ५२० पैकी १७ हजार ३३२ मतदारानी ८०.५४ टक्के मतदानाचा हक्क बजावला. ५३ मतदान केंद्रांवर ४४१ कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. निवडणुकीत परीवर्तन की पुन्हा दांडेगावकर बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. शेवटपर्यंत निवडणुकीत अटीतटीचा सामना दिसून आला.

वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात होते. एकूण २१ हजार ५२० मतदार २१ संचालक निवडून देणार होते. निवडणुकीसाठी ९ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत २१ हजार ५२० पैकी १७ हजार ३३२ असे एकुण ८०.५४ टक्के मतदान झाले. रविवारी सकाळपासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वसमत शहरासह ५३ मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ८०.५४ टक्के मतदान झाले. शेवटपर्यंत मतदारात मतदानासाठी मोठी चुरस दिसून आली. मतदानाची टक्केवारी ७० ते ७५ पर्यंत राहील, असे दिसत होते.  परंतु निवडणुकीत ८०.५४ टक्के मतदान झाले. वाढत्या टक्केवारीचा फटका कोणत्या पॅनलला बसणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी विकास देशमुख, तहसीलदार शारदा दळवी, किशोर धुतमल, अनिल पाटील यांनी लक्ष ठेवले होते. ५३ मतदान केंद्रांवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ‘पूर्णे’ साठी सर्व मतदान केंद्रांवर ८०.५४ टक्के मतदान शांततेत झाल, अशी माहिती  निवडणूक विभागाने दिली.

उमेदवारांना प्रचारास मिळाले अवघे ३ दिवस...

निवडणुकीचा प्रचार रंगात येताच २८ जून रोजी सहकार विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत निवडणूक पुढे ढकलल्याचा आदेश प्राप्त झाला होता. ९ दिवस प्रचार थंड पडला होता. खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती. ५ जूलै रोजी खंडपिठाने ‘पूर्णा’ ची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. ३ दिवस उमेदवारांना मतदारांच्या भेटीसाठी वेळ मिळाला. वाढती मतदानाची टक्केवारी कोणासाठी लाभदायक ठरणार ? हे ११ जुलै रोजी मतमोजणीनंतर कळेल.

‘पूर्णे’ वर सत्ता कोणाची...

शेतकरी विकास पॅनल व त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी विकास परीवर्तन पॅनलने प्रचारात आघाडी घेत आपली बाजू मांडली. मतदारात ऊस गाळपास न नेल्याची शेवटपर्यंत नाराजी दिसून आली. शनिवारच्या भेटीत खरी जादू झाली तर निवडणुकीचे निकाल आश्चर्यचकीत लागतील, कोण बाजी मारणार, यावर तालुक्यात पैजा लागण्यास सुरुवात झाली आहे. ‘पूर्णे’ चे कार्यक्षेत्र नांदेड, हिंगोली व परभणी या तीन  जिल्ह्यांत आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागो दोन्ही पॅनलमध्ये शेवटपर्यंत अटीतटीचा सामना पहावयास मिळाला.

११ जुलै रोजी मतमोजणी....

पूर्णा कारखान्यासाठी झालेल्या मतदानाची ‘आयटीआय’ येथे ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरु होणार आहे. आयटीआय येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक