शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत नियम उल्लंघनाच्या ७ हजार केसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:28 IST

शहरातील दिवसेंदिवस वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी बनत चालली आहे. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही कमी नाही. केवळ दंडात्मक कारवाई करूनही हा प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे प्रत्येकांनीच वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ७ हजार २७८ चालकांकाकडून मागील नऊ महिन्यांत तब्बल २० लाख २७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देदंडात्मक कारवाई : मागील नऊ महिन्यांत तब्बत २० लाखांचा दंड वसूल

दयाशिल इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील दिवसेंदिवस वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी बनत चालली आहे. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही कमी नाही. केवळ दंडात्मक कारवाई करूनही हा प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे प्रत्येकांनीच वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ७ हजार २७८ चालकांकाकडून मागील नऊ महिन्यांत तब्बल २० लाख २७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोली शहरात साधे वाहतूक सिग्नल नाहीत ही आश्चर्याची बाब आहे. पालिकेने लाखों रूपये खर्च करून दहा वर्षापूर्वी बसविलेले वाहतूक सिग्नल आजही धूळखात पडून आहेत. हिंगोली शहरातील बसस्थानक, इंदिरा गांधी चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवाहर रोड, आदी गर्दीच्या ठिकाणी ये-जा करणाºया वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यातच फळविक्रेत्यांची हातगाडे व दुचाकी व इतर वाहने रस्त्यावरच उभी असतात. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दरदिवशी शिस्त लागावी यासाठी कारवाई केली जाते. परंतु वाहने ‘आम्ही वाहने कुठे उभी करावी, शहरात पार्किंगची व्यवस्था कुठे आहे’ असा प्रश्न उपस्थित केला जातो. या कारणावरून अनेकदा पोलिसांसोबत वादही होतात. शहरात बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शिवाय अनेकदा अपघाताच्या किरकोळ घटनांही घडतात. काही दिवसांपूर्वी हातगाडेवाले आणि पोलिसांत मोठा वाद निर्माण झाला होता. परंतु कारवाई करूनही याला आळा बसत नाही.शहरातून सर्रासपणे जड वाहतूकजड वाहनांच्या वाहतूकीसाठी वाशिम व नांदेड मार्गे येणाºया हिंगोलीत बायपासची सुविधा आहे. परंतु वाहने थेट शहरातूनच धावतात. पोलिसांकडून जड वाहतूक करणाºयांवर कारवाई केली जाते. हिंगोली येथून ग्रामीण भागाकडे जाणार बसेसची संख्याही कमी आहे. अनेक गावांत बस पोहचत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी वाहनाशिवाय पर्याय नाही. परंतु या खाजगी वाहनांतून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून नेले जातात. अवैध प्रवासी वाहतूक करणाºया एकूण ३०१ वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरून वर्दळीच्या ठिकाणावरून वाहने सुसाट पळविणा-या एकूण १५ वाहन चालकांवर वाहतूक शाखेतर्फे विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन पळविणा-यांची वाहनेही पोलिसांनी जप्त केली होती. यांमध्ये दोन महिला, दोन पुरुष यांचा समावेश आहे.शहरातून राँगसाईटने वाहन चालविणाºया ७४४ जणांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून वाहतूक शाखेकडून दंड वसूल करण्यात आला.यासह विना परवाना वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे उपलब्धच नसणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना नंबरप्लेट वाहने या चालकांवर विविध कलमान्वये वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. हिंगोली शहर वाहतूक शाखेत १ पोलीस अधिकारी व २० कर्मचारी कार्यरत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडroad transportरस्ते वाहतूक