शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

७ हजार २४० शिक्षकांची होणार कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. ...

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार असून पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण कमी संख्येने आढळून येत आहेत. संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार १३ शाळांमधून ८३ हजार ६५१ विद्यार्थी प्रवेशित असून ७ हजार २४० शिक्षक कार्यरत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद , खासगी शाळांचा समावेश आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी वर्गाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून, पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळातील ७ हजार २४० शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट २० जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. जसजसे शिक्षकाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येईल तसतसे शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

कोरोना टेस्ट संदर्भात शिक्षकांची घेतली जातेय माहिती

पाचवी ते आठवी वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची माहिती संकलित केली जात असून, कोरोना टेस्ट करण्यासंदर्भात शिक्षकांना माहिती दिली जात आहे. शाळा प्रशासनाला वर्ग निर्जंतुकीकरणासंदर्भात शिक्षण विभागाकडून सूचना दिल्या जात आहेत.

आरटीपीसीआर टेस्ट नंतरच नियुक्ती

ज्या शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली असेल अशा शिक्षकांना शाळेत क्रमाक्रमाने घेतले जाणार आहे. शाळा निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

-संदीप सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी,