शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारणची ६५० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:17 IST

हिंगोली येथे २००६ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाले. मंच स्थापनेपासून आतापर्यंत (२०१८ अखेर) ६९५ पैकी ६५० प्रकरणे निकाली लागले आहेत. तर ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देग्राहकांच्या फसवणुकीच्या अधिक तक्रारी पतसंस्था, विमा, महावितरणबाबत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्राहकांच्या हक्काचे व हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात आला आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याससाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली. हिंगोली येथे २००६ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाले. मंच स्थापनेपासून आतापर्यंत (२०१८ अखेर) ६९५ पैकी ६५० प्रकरणे निकाली लागले आहेत. तर ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत.दिवसेंदिवस ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणूक झालेल्या अनेक जागरूक ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारणकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. २००६ रोजी मंच स्थापन झाल्यापासून ६९५ प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी एप्रिल २०१८ पर्यंत ६५० प्रकरणे निकाली लागली आहेत. तर उर्वरित ४५ प्रकरणे मंचाकडे प्रलंबित आहेत. विविध पतसंस्था, इन्श्युरन्स कंपनी व महावितरण यांच्याकडूनच जास्तीत-जास्त ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तकारी येत आहेत.ग्राहकांची फसवणूक करणारे विक्रेते, सेवा पुरवठादार यांच्याविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, त्या संबंधित कंपनी, विक्रेता किंवा पुरवठादाराकडून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ग्राहकांना नुकसान भरपाई मिळवून दिली.परंतु हिंगोली येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचला मागील चार महिन्यांपासून अध्यक्षच नाही. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे न्यायालयीन कामकाज अध्यक्ष व सदस्य पाहतात. दोघांच्या उपस्थितीमध्ये खटला चालतो. परंतु अध्यक्ष पदच रिक्त असल्यामुळे न्यायालयीन कामे ठप्प आहेत.हिंगोली येथील अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याची प्रकरणे प्रलंबित आहे. कार्यालयीन कामे सुरू असली तरी न्यायालयीन कामकाज बंद आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या ग्राहक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे प्रभारी अध्यक्ष म्हणून सध्या पदभार कोणाकडे देण्यात आला नाही. त्यामुळे मागील चार महिन्यांत एकही न्यायालयीन प्रकरण निकाली लागले नाही. ग्राहकांच्या तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी येथील रिक्त असलेले अध्यक्षपदी नियुक्तीची आवश्यकता आहे. यापुर्वी जिल्हा तक्रार निवारण मंच येथे अध्यक्षा म्हणून ए. जी. सातपुते काम पाहत होत्या.दोन सदस्य कार्यरत, अध्यक्षपद मात्र रिक्तचकांकरिया यांची नियुक्ती - हिंगोली येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील रिक्त असलेल्या सदस्यपदी निता कांकरिया यांची नियुक्ती केली आहे. चार महिन्यांपूर्वी अध्यक्ष व एक सदस्य येथील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढत असत. आता कांकरीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कांकरीया १० मे रोजी रूजू झाल्या आहेत. आता दोन सदस्य असले तरी, अद्याप अध्यक्षाचे पद मात्र रिक्त आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे निकाली लागत नाहीत. शिवाय संबंधित कर्मचाºयांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfraudधोकेबाजी