शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हिंगोली जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारणची ६५० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:17 IST

हिंगोली येथे २००६ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाले. मंच स्थापनेपासून आतापर्यंत (२०१८ अखेर) ६९५ पैकी ६५० प्रकरणे निकाली लागले आहेत. तर ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देग्राहकांच्या फसवणुकीच्या अधिक तक्रारी पतसंस्था, विमा, महावितरणबाबत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्राहकांच्या हक्काचे व हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात आला आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याससाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली. हिंगोली येथे २००६ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाले. मंच स्थापनेपासून आतापर्यंत (२०१८ अखेर) ६९५ पैकी ६५० प्रकरणे निकाली लागले आहेत. तर ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत.दिवसेंदिवस ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणूक झालेल्या अनेक जागरूक ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारणकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. २००६ रोजी मंच स्थापन झाल्यापासून ६९५ प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी एप्रिल २०१८ पर्यंत ६५० प्रकरणे निकाली लागली आहेत. तर उर्वरित ४५ प्रकरणे मंचाकडे प्रलंबित आहेत. विविध पतसंस्था, इन्श्युरन्स कंपनी व महावितरण यांच्याकडूनच जास्तीत-जास्त ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तकारी येत आहेत.ग्राहकांची फसवणूक करणारे विक्रेते, सेवा पुरवठादार यांच्याविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, त्या संबंधित कंपनी, विक्रेता किंवा पुरवठादाराकडून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ग्राहकांना नुकसान भरपाई मिळवून दिली.परंतु हिंगोली येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचला मागील चार महिन्यांपासून अध्यक्षच नाही. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे न्यायालयीन कामकाज अध्यक्ष व सदस्य पाहतात. दोघांच्या उपस्थितीमध्ये खटला चालतो. परंतु अध्यक्ष पदच रिक्त असल्यामुळे न्यायालयीन कामे ठप्प आहेत.हिंगोली येथील अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याची प्रकरणे प्रलंबित आहे. कार्यालयीन कामे सुरू असली तरी न्यायालयीन कामकाज बंद आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या ग्राहक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे प्रभारी अध्यक्ष म्हणून सध्या पदभार कोणाकडे देण्यात आला नाही. त्यामुळे मागील चार महिन्यांत एकही न्यायालयीन प्रकरण निकाली लागले नाही. ग्राहकांच्या तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी येथील रिक्त असलेले अध्यक्षपदी नियुक्तीची आवश्यकता आहे. यापुर्वी जिल्हा तक्रार निवारण मंच येथे अध्यक्षा म्हणून ए. जी. सातपुते काम पाहत होत्या.दोन सदस्य कार्यरत, अध्यक्षपद मात्र रिक्तचकांकरिया यांची नियुक्ती - हिंगोली येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील रिक्त असलेल्या सदस्यपदी निता कांकरिया यांची नियुक्ती केली आहे. चार महिन्यांपूर्वी अध्यक्ष व एक सदस्य येथील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढत असत. आता कांकरीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कांकरीया १० मे रोजी रूजू झाल्या आहेत. आता दोन सदस्य असले तरी, अद्याप अध्यक्षाचे पद मात्र रिक्त आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे निकाली लागत नाहीत. शिवाय संबंधित कर्मचाºयांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfraudधोकेबाजी