शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर धरणात ५९.८८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणात सध्या ५९.८८ टक्के जलसाठा उपलब्ध ...

सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.

तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणात सध्या ५९.८८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाची पाण्याची पातळी ४३६.७९० मीटर आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ५७७.३३३ द.ल.घ.मी. आहे. धरणात तालुक्यातील १४ गावे गेली आहेत. परंतु, या धरणाचा म्हणावा तसा फायदा तालुक्याला होत नाही.

सात वर्षांनंतर पहिल्यांदाच यावर्षी हे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सध्या धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाचे क्षेत्रफळ नऊ हजार ६३४ हेक्‍टर आहे. २०१३ मध्ये धरण शंभर टक्के भरले गेेले. त्यानंतर २०२० मध्येच धरण शंभर टक्के भरले होते.

उन्हाळी पिकांना पाणी देणे सुरू

सद्य:स्थितीत उन्हाळी पिकांना उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे इसापूर धरण तुडुंब भरले होते. त्यामुळे धरणातून पैनगंगा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून इसापूर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता एस. एम. सूर्यवंशी यांनी दिली.

कळमकोंडा, देवदरीने तळ गाठला

गत पंधरा-वीस दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. प्रखर उन्हामुळे तालुक्यातील कळमकोंडा व देवदरी तलावांनी सद्य:स्थितीत तळ गाठला आहे. उन्हाळा संपायला अजून दीड महिना बाकी आहे. शहर व तालुक्यात कुठे पाईपलाईनद्वारे गळती होत असेल तर त्याबाबत प्रशासनाला कळवावे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.