शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

इसापूर धरणात ५९.८८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणात सध्या ५९.८८ टक्के जलसाठा उपलब्ध ...

सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.

तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणात सध्या ५९.८८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाची पाण्याची पातळी ४३६.७९० मीटर आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ५७७.३३३ द.ल.घ.मी. आहे. धरणात तालुक्यातील १४ गावे गेली आहेत. परंतु, या धरणाचा म्हणावा तसा फायदा तालुक्याला होत नाही.

सात वर्षांनंतर पहिल्यांदाच यावर्षी हे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सध्या धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाचे क्षेत्रफळ नऊ हजार ६३४ हेक्‍टर आहे. २०१३ मध्ये धरण शंभर टक्के भरले गेेले. त्यानंतर २०२० मध्येच धरण शंभर टक्के भरले होते.

उन्हाळी पिकांना पाणी देणे सुरू

सद्य:स्थितीत उन्हाळी पिकांना उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे इसापूर धरण तुडुंब भरले होते. त्यामुळे धरणातून पैनगंगा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून इसापूर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता एस. एम. सूर्यवंशी यांनी दिली.

कळमकोंडा, देवदरीने तळ गाठला

गत पंधरा-वीस दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. प्रखर उन्हामुळे तालुक्यातील कळमकोंडा व देवदरी तलावांनी सद्य:स्थितीत तळ गाठला आहे. उन्हाळा संपायला अजून दीड महिना बाकी आहे. शहर व तालुक्यात कुठे पाईपलाईनद्वारे गळती होत असेल तर त्याबाबत प्रशासनाला कळवावे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.