शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

जात वैधता पडताळणीत ५९४३ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:31 IST

जिल्हा जातपडताळणी समितीकडे मागील दीड वर्षात ६३४७ प्रकरणे प्राप्त झाली होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ५९४३ प्रकरणे निकाली काढण्यात असून उर्वरित ४०४ पैकी १२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा जातपडताळणी समितीकडे मागील दीड वर्षात ६३४७ प्रकरणे प्राप्त झाली होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ५९४३ प्रकरणे निकाली काढण्यात असून उर्वरित ४०४ पैकी १२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे देण्यात आली.हिंगोली येथे २१ नोव्हेंबर २०१६ पासून जिल्हा जात वैधता पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली. शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी असोत किंवा निवडणुकीतील उमेदवार व महाविद्यालयीन विद्यार्थी आदींना विविध शासकीय कामांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्रांसाठी अर्जदाराला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे व वेळीच त्रुटींची पूर्तता केल्यास अर्ज लवकर निकाली काढल्या जाते, असा या कार्यालयाचा दावा आहे. शिवाय संबधित अर्जदाराला एसएमएसद्वारे वेळोवेळी कळविले जाते. तो मिळताच खात्री करून घेतल्यास व कागदोत्रांची पूर्तता केल्यास जात वैधता पडताळणीच्या कामात व्यत्यय येत नाही, अशी माहिती जात वैधता पडताळणी समितीचे उपायुक्त भारत केंद्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने या कामासाठी कार्यालयाचे खेटे घ्यावे लागातात. परंतु येथील रिक्त पदे, व अध्यक्ष नसल्यामुळे याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहे. अधिक माहितीकरिता ६६६.ुं१३्र.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.अध्यक्षविना कामकाज : रिक्त पदांचे ग्रहणमागील दीड वर्षापासून जिल्हा जातपडताळणी समितीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला नाही. शिवाय येथील १ डीवायएसपीं, २ क्लार्क, १ स्टेनोग्राफर व १ शिपाई ही पदे रक्त आहेत. तरे एकूण ६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यावर कामकाज सुरू आहे.जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अनुभवी शासकीय कर्मचाºयांचा अभाव आहे. त्यामुळे कार्यालयीन कामे करताना अडचणी येतात. शिवाय प्रक्रिया पार पाडताना अनेक चुकाही होतात.भूल-थापांना बळी पडू नका- केंद्रे४अर्जदारांनी कोणाच्याही भूल-थापांना बळी पडू नये, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. तसेच यादरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता वेळेत केल्यास पुढील प्रक्रिया सुरळीत पार पाडल्या जाते. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणाकडेही आपली मूळ कागदपत्रे किंवा इतर कार्यालयीन कामे सोपवू नयेत. एकाच जातीचा दुसºया जातीत जाऊन जातपडताळणी करून लाभ घेणारे बोगस प्रकरणेही येतात. त्यामुळे योग्य पडताळणी केली जाते. याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. दोषी आढळून आल्यास वरिष्ठ कार्यवाही करतात.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रGovernmentसरकार