शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनाअपघात सेवा देण्यात ४६९ चालक पडले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

हिंगोली : एसटी महामंडळाच्या बसची वाहतूक सेवा सुरक्षित समजली जाते. अनेक जण एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. चालकवर्गही विनाअपघात सेवा ...

हिंगोली : एसटी महामंडळाच्या बसची वाहतूक सेवा सुरक्षित समजली जाते. अनेक जण एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. चालकवर्गही विनाअपघात सेवा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी परभणी विभागात केवळ ३८१ चालकांकडूनच विनाअपघात सेवा घडली आहे. यात हिंगोली आगारातील तीन चालकांचा समावेश आहे.

राज्यभरात ‘गाव तेथे एसटी’ असे बिरूद घेऊन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची बस गावागावात सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच गावागावात एसटीचे जाळे पसरले असून, सर्वाधिक प्रवासी वाहतूक एसटी बसच्या माध्यमातून होत असल्याचे पहावयास मिळत आहे. खात्रीशीर प्रवास एसटीचा असला तरी विनाअपघात सेवा देणारे चालक किती आहेत, याचा आढावा घेतला असता परभणी विभागात ३८१ चालकांनी विनाअपघात सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे, तर ४६९ चालक विनाअपघात सेवा देण्यात कमी पडल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. परभणी विभागात परभणी व हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागात एकूण ८५० चालक कार्यरत आहेत. हिगोली आगारात २३ चालक कार्यरत असून, यातील तिघांनी १५ वर्षापेक्षा जास्त विनाअपघात सेवा बाजावली आहे.

७०ला स्पीड लॉक

एसटी महामंडळाच्या बस क्षमतेपेक्षा अधिक वेगाने चालविल्या जाऊ नयेत, इंधन कमी लागावे, चालकांचे बसवरील नियंत्रण सुटू नये, या बाबी लक्षात घेऊन बसचा वेग नियंत्रणात असावा यासाठी वाहनांना वेगमर्यादा घालण्यात आली आहे. कमी अंतराच्या वाहनांना ७० किमी प्रतितास तर लांब पल्ल्याच्या वाहनांना ८० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

वर्षभरात ३१ अपघात

परभणी विभागात मागील वर्षभरात ३१ अपघात घडले आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्यानेच अपघाताच्या घटनात वाढ होत आहे. वर्षभरात मोठा अपघात झाला नाही. मात्र दुचाकीला धडक देणे, चुकून वाहन एसटीच्या समोर येणे, अशा स्वरूपाचे अपघात घडले आहेत. चालकांना महामंडळाच्या वतीने तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच एसटी प्रवास सुरक्षित मानला जातो.

चालक म्हणून नियुक्त झाल्यानंतर चालकांना एसटी विभागाच्या वतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचे मनोबल उंचावे यासाठी दरवर्षी बक्षीसरूपी सत्कार करण्यात येतो. जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

-पी.बी. चौथमल, आगारप्रमुख

वाहतुकीचे नियम व प्रवाशांची सुरक्षितता समोर ठेवून बस चालविण्याचा प्रयत्न केला. यामुळेच सलग २० वर्ष विनाअपघात सेवा बजावण्यात यशस्वी झालो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही विनाअपघात सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

-आर.एम. पठाण, चालक (फोटो आहे.)

सलग अठरा वर्षांच्या सेवेत आतापर्यंत एकही अपघात माझ्या हातून घडला नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन वाहतुकीचे नियम पाळले. वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळेच विनाअपघात सेवा बजावण्यात यश मिळाले.

-डी. एस. ढोणे, चालक

मागील वर्षात परभणी विभागात झालेले अपघात

जानेवारी -२

फेब्रुवारी - ६

मार्च -१

एप्रिल - ०

मे -०

जून- ३

जुलै -०

ऑगस्ट - २

सप्टेंबर - ३

ऑक्टोबर - ५

नोव्हेंबर - ४

डिसेंबर - ५

परभणी विभागातील एसटीचालक

८५०

विनाअपघात बस चालविली म्हणून सत्कार

१० वर्षापेक्षा जास्त सेवा

०१

१५ वर्षापेक्षा जास्त सेवा

०३