शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४५६२ कुटुंबांना ‘सौभाग्य’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:53 IST

जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला २०१७ रोजी प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' योजना सुरू केली. सदर योजनेअंतर्गत केवळ शहरातच नव्हे, तर दुर्गम व अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्यांना वीजजोडणी दिली जात आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी 'सौभाग्य'च्या माध्यमातून राज्यातील वीज न पोहचलेल्या कुटुंबांना २०१८ अखेरपर्यंत वीज जोडणी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने सध्या जिल्ह्यात सौभाग्य योजनेचा गरजू कुटुंबियांना लाभ दिला जात आहे. सौभाग्य योजनेतून प्रत्येक गरिबांच्या घरा-घरात वीजजोडणी देण्याचा संकल्प आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ करण्याचा शासनाचा दृष्टिकोण आहे. योजनेअंतर्गत घरा-घरात वीज पोहचविणे हा उद्देश आहे. सौभाग्यच्या माध्यमातून महावितरण नांदेड परिमंडळातील अद्याप घरामध्ये वीज न पोहचलेल्या १० हजार ६०४ कुटुंबांना ११ दिवसांत वीजजोडणी दिली.या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिन पॉर्इंटफिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीज जोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रूपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा हप्त्यांमध्ये भरावयाचे आहे. नांदेड जिल्ह्यातील वीज जोडणीपासून वंचीत २५ हजार ४३२ कुटुंबियांपैकी २ हजार ३५३ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आली. तर परभणी जिल्ह्याातील ९ हजार ३२५ पैकी ३ हजार ६८९ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणGovernmentसरकार