शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

जिल्ह्यातील ४५६२ कुटुंबांना ‘सौभाग्य’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:53 IST

जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला २०१७ रोजी प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' योजना सुरू केली. सदर योजनेअंतर्गत केवळ शहरातच नव्हे, तर दुर्गम व अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्यांना वीजजोडणी दिली जात आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी 'सौभाग्य'च्या माध्यमातून राज्यातील वीज न पोहचलेल्या कुटुंबांना २०१८ अखेरपर्यंत वीज जोडणी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने सध्या जिल्ह्यात सौभाग्य योजनेचा गरजू कुटुंबियांना लाभ दिला जात आहे. सौभाग्य योजनेतून प्रत्येक गरिबांच्या घरा-घरात वीजजोडणी देण्याचा संकल्प आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ करण्याचा शासनाचा दृष्टिकोण आहे. योजनेअंतर्गत घरा-घरात वीज पोहचविणे हा उद्देश आहे. सौभाग्यच्या माध्यमातून महावितरण नांदेड परिमंडळातील अद्याप घरामध्ये वीज न पोहचलेल्या १० हजार ६०४ कुटुंबांना ११ दिवसांत वीजजोडणी दिली.या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिन पॉर्इंटफिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीज जोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रूपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा हप्त्यांमध्ये भरावयाचे आहे. नांदेड जिल्ह्यातील वीज जोडणीपासून वंचीत २५ हजार ४३२ कुटुंबियांपैकी २ हजार ३५३ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आली. तर परभणी जिल्ह्याातील ९ हजार ३२५ पैकी ३ हजार ६८९ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणGovernmentसरकार