शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

जनसुविधाची ४ कामे सुरूच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:34 IST

यंदा जनसुविधा योजनेतील ४५ कामे सुरू करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला असला तरीही गतवर्षीचीच ४ कामे अजून सुरू झाली नसून ५ कामे आताही निविदा स्तरावरच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा जनसुविधा योजनेतील ४५ कामे सुरू करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला असला तरीही गतवर्षीचीच ४ कामे अजून सुरू झाली नसून ५ कामे आताही निविदा स्तरावरच आहेत.हिंगोली जिल्ह्यात जनसुविधा योजनेत २0१६-१७ या वर्षात ७२ कामे मंजूर झाली होती. यासाठी ३.६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. तर ३.0२ कोटी रुपयांचा निधी पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आला आहे. यामध्ये हिंगोली-१३, वसमत-१४, कळमनुरी-१४, सेनगाव-१५ व औंढा १६ अशी तालुकानिहाय कामांची संख्या आहे. यापैकी केवळ एक काम १२ लाखांचे होते. उर्वरित ५ लाखांची कामे होती. यात ३९ कामे पूर्ण झाली असून या कामांवर १.२३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तर २४ कामे अजूनही सुरूच आहेत. ही कामे पूर्ण झाली नाहीत. यामध्ये हिंगोलीत ५, वसमत-७, कळमनुरी-३, सेनगाव-४, औंढा नागनाथ-५ अशी तालुकानिहाय अजूनही पूर्ण न झालेल्या कामांची संख्या आहे. तर पाच कामे निविदा स्तरावर आहेत. यापैकी एक काम वसमत तालुक्यातील तर तब्बल चार कामे सेनगाव तालुक्यातील आहेत. विजेष म्हणजे वसमत तालुक्यातील तीन कामे व कळमनुरी तालुक्यातील १ काम तर अजूनही सुरूच झाले नाही.आता मार्च एण्ड जवळ आला आहे. मार्च महिन्यात ही कामे पूर्ण न झाल्यास हा निधी परतीचा मार्ग धरू शकतो. मात्र तरीही याबाबत अनेक ग्रामपंचायती गंभीर दिसत नाहीत. पंचायत विभागाने याबाबत पंचायत समित्यांना कळविले असले तरीही यातील पाच कामेच निविदा स्तरावर आहेत. उर्वरित कामांची अजूनही प्रक्रियाच नाही. शिवाय सुरू असलेली २४ कामेही पूर्ण करण्यासाठी एवढाच महिना शिल्लक असून त्याला गती देण्याची गरज आहे.सीईओंचा आढावा : कामे गतिमान करामार्च महिना सुरू झाला असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी आज जि.प.त बैठक घेतली. यात विविध विभागाची कोट्यवधीची कामे अजूनही निविदा स्तरातच लटकलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. तर अनेक विभागांची ही प्रक्रियाही अजूनही पूर्ण झाली नसल्याचे आढळून आलेआहे. बांधकाम विभागाच्या विविध कामांच्या निविदा अजूनही निघालेल्या नाहीत. याबाबत तुम्मोड यांनी संबंधितांना कडक सूचना दिल्या. तर मार्च एण्डपर्यंत सर्व योजनांचा निधी खर्च व्हावा, निधी परत जावू नये, यासाठी बजावले आहे.विविध विभागांच्या अनेक योजनांच्या निधीबाबत अजूनही काहीच नियोजन नसल्याचे चित्र असून दोन वर्षांची मुदत संपणारा निधीही मार्च एण्डलाच खर्च करण्याची परंपरा कायम दिसत आहे.