शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

३४९ कुटुंबियांना मोफत वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:32 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अशा हिंगोली जिल्ह्यातील ३४९ कुटुंबियांना महावितरणने मोफत वीज जोडणी देऊन अंधारातली गावे प्रकाशमान केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अशा हिंगोली जिल्ह्यातील ३४९ कुटुंबियांना महावितरणने मोफत वीज जोडणी देऊन अंधारातली गावे प्रकाशमान केली आहेत.ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी गाव निहाय शिबिरांचे आयोजन करून अद्याप विविध कारणास्तव वीज जोडणी पासून वंचित राहिलेल्या अनुसूचित जातीतील २१०, अनुसूचित जमातीतील १७ व इतर १२२ अशा एकूण ३४९ कुटुंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना विनामूल्य तर इतर गरिब कुटुंबियांना ५० रूपये प्रतिमहिना याप्रमाणे केवळ पाचशे रूपयात वीज जोडणी देण्यात आली. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील तुप्पा गावामध्ये ८२ सेनगाव तालुक्यातील सिंदेफळ गावात ४३, वसमत तालुक्यातील कौडगाव मधील ७५ कुटुंबियांना तर हिंगोली तालुक्यातील देवठाणा येथे ८० तसेच कलगाव मधील ६९ कुटूंबियांना वीज जोडणी देण्यात आली आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्व वीज जोडण्या पूर्ण होतील अशा पध्दतीने काम करावे. अधिकृत वीज जोडणी ही स्वमालकीची व प्रतिष्ठेची भावना असल्याने ग्रामस्थांनीही वीज जोडणी करून घ्यावी.ग्राम स्वराज्य अभियान राबवूनही वीजचोरी करणाºयांवर वीज कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत विविध ठिकाणच्या न्यायालयांनी वीज चोरांना दोन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सदर योजनेचा फायदा घेऊनअधिकृत वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन महावितरण नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.सदरील अभियानाच्या माध्यमातून अद्याप पर्यंत वीज जोडणी नसलेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या शाखा कार्यालय अथवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधून वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण