शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

३४९ कुटुंबियांना मोफत वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:32 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अशा हिंगोली जिल्ह्यातील ३४९ कुटुंबियांना महावितरणने मोफत वीज जोडणी देऊन अंधारातली गावे प्रकाशमान केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अशा हिंगोली जिल्ह्यातील ३४९ कुटुंबियांना महावितरणने मोफत वीज जोडणी देऊन अंधारातली गावे प्रकाशमान केली आहेत.ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी गाव निहाय शिबिरांचे आयोजन करून अद्याप विविध कारणास्तव वीज जोडणी पासून वंचित राहिलेल्या अनुसूचित जातीतील २१०, अनुसूचित जमातीतील १७ व इतर १२२ अशा एकूण ३४९ कुटुंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना विनामूल्य तर इतर गरिब कुटुंबियांना ५० रूपये प्रतिमहिना याप्रमाणे केवळ पाचशे रूपयात वीज जोडणी देण्यात आली. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील तुप्पा गावामध्ये ८२ सेनगाव तालुक्यातील सिंदेफळ गावात ४३, वसमत तालुक्यातील कौडगाव मधील ७५ कुटुंबियांना तर हिंगोली तालुक्यातील देवठाणा येथे ८० तसेच कलगाव मधील ६९ कुटूंबियांना वीज जोडणी देण्यात आली आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्व वीज जोडण्या पूर्ण होतील अशा पध्दतीने काम करावे. अधिकृत वीज जोडणी ही स्वमालकीची व प्रतिष्ठेची भावना असल्याने ग्रामस्थांनीही वीज जोडणी करून घ्यावी.ग्राम स्वराज्य अभियान राबवूनही वीजचोरी करणाºयांवर वीज कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत विविध ठिकाणच्या न्यायालयांनी वीज चोरांना दोन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सदर योजनेचा फायदा घेऊनअधिकृत वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन महावितरण नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.सदरील अभियानाच्या माध्यमातून अद्याप पर्यंत वीज जोडणी नसलेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या शाखा कार्यालय अथवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधून वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण