शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

३४९ कुटुंबियांना मोफत वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:32 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अशा हिंगोली जिल्ह्यातील ३४९ कुटुंबियांना महावितरणने मोफत वीज जोडणी देऊन अंधारातली गावे प्रकाशमान केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अशा हिंगोली जिल्ह्यातील ३४९ कुटुंबियांना महावितरणने मोफत वीज जोडणी देऊन अंधारातली गावे प्रकाशमान केली आहेत.ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी गाव निहाय शिबिरांचे आयोजन करून अद्याप विविध कारणास्तव वीज जोडणी पासून वंचित राहिलेल्या अनुसूचित जातीतील २१०, अनुसूचित जमातीतील १७ व इतर १२२ अशा एकूण ३४९ कुटुंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना विनामूल्य तर इतर गरिब कुटुंबियांना ५० रूपये प्रतिमहिना याप्रमाणे केवळ पाचशे रूपयात वीज जोडणी देण्यात आली. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील तुप्पा गावामध्ये ८२ सेनगाव तालुक्यातील सिंदेफळ गावात ४३, वसमत तालुक्यातील कौडगाव मधील ७५ कुटुंबियांना तर हिंगोली तालुक्यातील देवठाणा येथे ८० तसेच कलगाव मधील ६९ कुटूंबियांना वीज जोडणी देण्यात आली आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्व वीज जोडण्या पूर्ण होतील अशा पध्दतीने काम करावे. अधिकृत वीज जोडणी ही स्वमालकीची व प्रतिष्ठेची भावना असल्याने ग्रामस्थांनीही वीज जोडणी करून घ्यावी.ग्राम स्वराज्य अभियान राबवूनही वीजचोरी करणाºयांवर वीज कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत विविध ठिकाणच्या न्यायालयांनी वीज चोरांना दोन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सदर योजनेचा फायदा घेऊनअधिकृत वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन महावितरण नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.सदरील अभियानाच्या माध्यमातून अद्याप पर्यंत वीज जोडणी नसलेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या शाखा कार्यालय अथवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधून वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण