शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईअंतर्गत ३३८ बालकांचा प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांवर ३३८ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे, तर १८२ ...

हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांवर ३३८ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे, तर १८२ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला असून पालकांचे दुसऱ्या फेरीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने आरटीईअंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील ७९ शाळांनी यासाठी नोंदणी केली होती. यामध्ये राखीव ५३० जागांसाठी राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. कोरोनामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढही मिळाली होती. त्यानुसार ५३० जागांसाठी ९८७ बालकांचे ऑनलाइन अर्ज आले होते. पहिल्या प्रवेश फेरीसाठी ४७८ बालकांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या बालकांनी ३१ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र मोफत प्रवेशासाठी पालकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ३१ जुलैअखेर ३३८ बालकांचाच प्रवेश निश्चित झाला आहे, तर १८२ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे.

दुसऱ्या फेरीकडे पालकांचे लक्ष

पहिल्या फेरीत ४७८ बालकांची निवड करण्यात आली होती. मात्र यातील ३३८ बालकांनीच प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे आणखी १९२ जागांवर प्रवेश देणे बाकी आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या बालकांनी शाळेत प्रवेश घेण्यासाठीची मुदत संपली आहे. त्यामुळे दुसरी प्रवेश फेरी केव्हा लागते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

आरटीईअंतर्गत अशी आहे आकडेवारी

आरटीईअंतर्गंत शाळा - ७९

एकूण राखीव जागा - ५३०

एकूण अर्ज - ९८७

पहिल्या फेरीत निवड - ४७८

तात्पुरते प्रवेश - १८२

प्रवेश निश्चित - ३३८