शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आरटीईअंतर्गत ३३८ बालकांचा प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST

हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांवर ३३८ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे, तर १८२ ...

हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांवर ३३८ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे, तर १८२ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला असून पालकांचे दुसऱ्या फेरीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने आरटीईअंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील ७९ शाळांनी यासाठी नोंदणी केली होती. यामध्ये राखीव ५३० जागांसाठी राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. कोरोनामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढही मिळाली होती. त्यानुसार ५३० जागांसाठी ९८७ बालकांचे ऑनलाइन अर्ज आले होते. पहिल्या प्रवेश फेरीसाठी ४७८ बालकांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या बालकांनी ३१ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र मोफत प्रवेशासाठी पालकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ३१ जुलैअखेर ३३८ बालकांचाच प्रवेश निश्चित झाला आहे, तर १८२ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे.

दुसऱ्या फेरीकडे पालकांचे लक्ष

पहिल्या फेरीत ४७८ बालकांची निवड करण्यात आली होती. मात्र यातील ३३८ बालकांनीच प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे आणखी १९२ जागांवर प्रवेश देणे बाकी आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या बालकांनी शाळेत प्रवेश घेण्यासाठीची मुदत संपली आहे. त्यामुळे दुसरी प्रवेश फेरी केव्हा लागते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

आरटीईअंतर्गत अशी आहे आकडेवारी

आरटीईअंतर्गंत शाळा - ७९

एकूण राखीव जागा - ५३०

एकूण अर्ज - ९८७

पहिल्या फेरीत निवड - ४७८

तात्पुरते प्रवेश - १८२

प्रवेश निश्चित - ३३८