आधी रुग्ण आढळला पण् सध्या शून्यावर
जिल्ह्यातील ४०४ गावांत आतापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. यापैकी जवळपास ३०० गावांत आधी रुग्ण आढळला होता. मात्र सध्या ती गावे शून्यावर आहेत. त्यामुळे अशा गावांनीही पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात एकूण गावे ७११
सध्या कोरोनाचे रुग्ण नाही ६०७
शहरी रुग्ण ४६४०
ग्रामीण रुग्ण ३०९१
६६८९ लोकांनी केली कोरोनावर मात
१०६ एकूण मृत्यू
आमच्या गावातील आठवडी बाजार बंद केला. शिवाय गावात मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याविषयी जागृती केली. सुरुवातीच्या काळात बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन करणे, नागरिकांमध्ये जागृती करणे हे कामही केले. तर वारंवार निर्जंतुकीकरणासाठी फवारणीही करण्यात येते. त्यामुळे गावात एकही रुग्ण आढळला नाही.
डॉ.प्रल्हाद वाघमारे, सरपंच, सिद्धेश्वर नंदगाव
गावात सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर करण्याची जागृती केली. सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले. दुकाने व इतर ठिकाणी गर्दी न करण्यास प्रत्येकाला बजावण्यात आले. बाहेरगावी जाताना व बाहेरून आल्यावर कोराेनाविषयक सर्व नियम पाळण्यास सांगण्यात आले होते. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्याने गाव अद्याप तरी कोरोनामुक्त आहे.
स्वाती दयानंद चट्टे, सरपंच, गोटेवाडी
डोणवाडा येथे गाव पातळीवर कोरोना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख कायम आहे. त्यामुळे गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे याची जनजागृती ग्रा.पं.कडून करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शहरी भागात गेल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे अथवा अशा ठिकाणी खरेदी करणे टाळण्यास सांगण्यात आले.
रमेश दळवी, उपसरपंच, डोणवाडा