शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

३०७ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

आधी रुग्ण आढळला पण् सध्या शून्यावर जिल्ह्यातील ४०४ गावांत आतापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. यापैकी जवळपास ३०० गावांत आधी ...

आधी रुग्ण आढळला पण् सध्या शून्यावर

जिल्ह्यातील ४०४ गावांत आतापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. यापैकी जवळपास ३०० गावांत आधी रुग्ण आढळला होता. मात्र सध्या ती गावे शून्यावर आहेत. त्यामुळे अशा गावांनीही पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात एकूण गावे ७११

सध्या कोरोनाचे रुग्ण नाही ६०७

शहरी रुग्ण ४६४०

ग्रामीण रुग्ण ३०९१

६६८९ लोकांनी केली कोरोनावर मात

१०६ एकूण मृत्यू

आमच्या गावातील आठवडी बाजार बंद केला. शिवाय गावात मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याविषयी जागृती केली. सुरुवातीच्या काळात बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन करणे, नागरिकांमध्ये जागृती करणे हे कामही केले. तर वारंवार निर्जंतुकीकरणासाठी फवारणीही करण्यात येते. त्यामुळे गावात एकही रुग्ण आढळला नाही.

डॉ.प्रल्हाद वाघमारे, सरपंच, सिद्धेश्वर नंदगाव

गावात सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर करण्याची जागृती केली. सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले. दुकाने व इतर ठिकाणी गर्दी न करण्यास प्रत्येकाला बजावण्यात आले. बाहेरगावी जाताना व बाहेरून आल्यावर कोराेनाविषयक सर्व नियम पाळण्यास सांगण्यात आले होते. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्याने गाव अद्याप तरी कोरोनामुक्त आहे.

स्वाती दयानंद चट्टे, सरपंच, गोटेवाडी

डोणवाडा येथे गाव पातळीवर कोरोना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख कायम आहे. त्यामुळे गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे याची जनजागृती ग्रा.पं.कडून करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शहरी भागात गेल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे अथवा अशा ठिकाणी खरेदी करणे टाळण्यास सांगण्यात आले.

रमेश दळवी, उपसरपंच, डोणवाडा