शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३ मिमी पाऊस; सुकलेल्या पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

हिंगोली जिल्ह्यात यंदा सुरुवातीच्या काळात चांगले पर्जन्य झाले. दरवर्षी आतापर्यंत होणाऱ्या पावसाच्या १३४ टक्के पर्जन्य झाल्याने शेतकऱ्यांना यंदा पेरण्या ...

हिंगोली जिल्ह्यात यंदा सुरुवातीच्या काळात चांगले पर्जन्य झाले. दरवर्षी आतापर्यंत होणाऱ्या पावसाच्या १३४ टक्के पर्जन्य झाल्याने शेतकऱ्यांना यंदा पेरण्या वेळेत करता आल्या. मात्र, मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे आता पिके माना टाकू लागले होते. त्यातच काल रात्री झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच हा पाऊस झाला. यामध्ये हिंगोली तालुक्यात ३.८ मिमी, कळमनुरीत १.४ मिमी, वसमत २.८ मिमी, औंढा ५.२ मिमी तर सेनगाव ३.६ मिमी अशी पर्जन्याची नोंद झाली आहे.

मंडळनिहाय असे पर्जन्य

मंडळनिहाय हिंगोली ६.३ मिमी, नर्सी ७, सिरसम २.८, बासंबा २.३, डिग्रस कऱ्हाळे ३, माळहिवरा २.३, खांबाळा ३, कळमनुरी ३, वाकोडी १.५, नांदापूर १.४, डोंगरकडा १.४, वारंगा १, वसमत ३, हयातनगर ३.८, गिरगाव ३, हट्टा १.५, टेंभुर्णी २.८, कुरुंदा ६.८, औंढा ४, येहळेगाव ८.३, साळणा १.३, जवळा ७, सेनगाव २.५, गोरेगाव ३.३, आजेगाव १, साखरा १०, पानकनेरगाव १, हत्ता ३.८ मिमी अशी नोंद झाली आहे. तर आखाडा बाळापूर व आंबा या दोन मंडळांत पर्जन्य झाले नाही.