शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

२९ हजार हेक्टर रबीचे नुकसान

By admin | Updated: March 4, 2015 15:40 IST

खरीप /हंगाम वाया गेल्यानंतर रबीवर उरलेल्या आशाही अवकाळी पावसाने मावळल्या.

 हिंगोली : /खरीप /हंगाम वाया गेल्यानंतर रबीवर उरलेल्या आशाही अवकाळी पावसाने मावळल्या. ५0 टक्क्यांच्या आत ५५ पैकी २९ हजार ८१३ हेक्टरवर हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. गतवर्षी गारपिटीने घाला घातला होता. जिल्ह्यात १ लाख २६ हजार २१0 पैकी ५५ हजार ५७0 हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. प्रमुख पीक असलेल्या हरभर्‍याची काढणी सुरू होती. एकूण पिकांपैकी ६0 टक्क्यांवर असलेला हरभरा अनेक ठिकाणी भुईसपाट झाला. कापलेल्या ठिकाणी तर मोड फुटण्याची वेळ आली. ज्वारी आणि गव्हाची अवस्था सारखीच झाली. दाणे धरल्यामुळे दोन्ही पिके काळी पडून नुकसानीत अधिक वाढ झाली. दोन्ही पिके झोपली असल्याने अन्नद्रव्य शेंड्यापर्यंत पोहोचणार नाहीत. परिणामी, दाणे भरणार नाहीत आणि काळवंडणारही आहेत. करडई, सुर्यफूल इतर पिकांनाही मोठा फटका बसला. पिके अंतिम टप्प्यात असताना सलग दुसर्‍यावर्षी पावसाने घाला घातला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्ह्याधिकार्‍यांनी महसूल आणि कृषी विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात फळ आणि इतर पिके मिळून २९ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज काढला. प्रामुख्याने कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यात सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागले. औंढा आणि सेनगाव तालुक्यात अनुक्रमे ७८३३ आणि ६0१२ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी मदतीचे चित्र अस्पष्ट आहे. /(प्रतिनिधी) 

उभे पीक आडवे.. :हिंगोली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरातही मोठा पाऊस झाला. त्यात सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यातील गहू झोपी गेल्याचे दृश्य. ५0 टक्क्यांपुढे नुकसान नाही- गतवर्षी झालेल्या गारपिटीत ५0 टक्क्यांच्या पुढे नुकसान अधिक असल्यामुळे फुल नाही फुलांची पाकळी शेतकर्‍यांची हाती पडली. आता गारपीट नसल्यामुळे पावसाने नुकसानी तीव्रता लक्षात घेण्यासाठी सर्व्हेक्षण केले. ५0 टक्क्यांपुढे एकाही हेक्टरवर नुकसान झालेले एकही हेक्टर नाही. डोंगरकडा परिसरात नुकसान- डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात वरूड, भाटेगाव, हिवरा, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव, वसफळ, जामगव्हाण, सुकळीवीर आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यात १ मार्च रोजी सकाळी ३ च्या सुमारास झालेल्या पावसाने गहू, हरभरा, ज्वारी हे पिकांचे नुकसान झाले. आंब्याला फटका, संत्रीची नोंद नाही- सलग पाच वर्षांपासून संकरित आणि परजिल्ह्यातील आंब्यावर रसाची मदार आहे. यावेळीही मोहोर जोरात आला असताना पावसाने तो गळाला. त्यात वसमत आणि हिंगोली वगळता तीन तालुक्यांत नुकसानीची नोंद केली. मात्र हिंगोली तालुक्यात कमी प्रमाणात का होईना असलेली संत्र्याच्या नुकसानीची नोंद नाही. इतर पिकांत डाळिंबाचे १९ हजारांवर नुकसान दाखवले. द्राक्ष, आवळा, चिकू, पेरूचे कॉलम नील असताना संत्र्यांच्या नुकसानीचा कॉलमही नाही आणि नुकसानीचा उल्लेख नाही. त्यामुळे अस्मानीबरोबर सुलतानी संकटही संत्रा उत्पादकांवर ओढवले आहे.