शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

२९ हजार हेक्टर रबीचे नुकसान

By admin | Updated: March 4, 2015 15:40 IST

खरीप /हंगाम वाया गेल्यानंतर रबीवर उरलेल्या आशाही अवकाळी पावसाने मावळल्या.

 हिंगोली : /खरीप /हंगाम वाया गेल्यानंतर रबीवर उरलेल्या आशाही अवकाळी पावसाने मावळल्या. ५0 टक्क्यांच्या आत ५५ पैकी २९ हजार ८१३ हेक्टरवर हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. गतवर्षी गारपिटीने घाला घातला होता. जिल्ह्यात १ लाख २६ हजार २१0 पैकी ५५ हजार ५७0 हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. प्रमुख पीक असलेल्या हरभर्‍याची काढणी सुरू होती. एकूण पिकांपैकी ६0 टक्क्यांवर असलेला हरभरा अनेक ठिकाणी भुईसपाट झाला. कापलेल्या ठिकाणी तर मोड फुटण्याची वेळ आली. ज्वारी आणि गव्हाची अवस्था सारखीच झाली. दाणे धरल्यामुळे दोन्ही पिके काळी पडून नुकसानीत अधिक वाढ झाली. दोन्ही पिके झोपली असल्याने अन्नद्रव्य शेंड्यापर्यंत पोहोचणार नाहीत. परिणामी, दाणे भरणार नाहीत आणि काळवंडणारही आहेत. करडई, सुर्यफूल इतर पिकांनाही मोठा फटका बसला. पिके अंतिम टप्प्यात असताना सलग दुसर्‍यावर्षी पावसाने घाला घातला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्ह्याधिकार्‍यांनी महसूल आणि कृषी विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात फळ आणि इतर पिके मिळून २९ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज काढला. प्रामुख्याने कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यात सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागले. औंढा आणि सेनगाव तालुक्यात अनुक्रमे ७८३३ आणि ६0१२ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी मदतीचे चित्र अस्पष्ट आहे. /(प्रतिनिधी) 

उभे पीक आडवे.. :हिंगोली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरातही मोठा पाऊस झाला. त्यात सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यातील गहू झोपी गेल्याचे दृश्य. ५0 टक्क्यांपुढे नुकसान नाही- गतवर्षी झालेल्या गारपिटीत ५0 टक्क्यांच्या पुढे नुकसान अधिक असल्यामुळे फुल नाही फुलांची पाकळी शेतकर्‍यांची हाती पडली. आता गारपीट नसल्यामुळे पावसाने नुकसानी तीव्रता लक्षात घेण्यासाठी सर्व्हेक्षण केले. ५0 टक्क्यांपुढे एकाही हेक्टरवर नुकसान झालेले एकही हेक्टर नाही. डोंगरकडा परिसरात नुकसान- डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात वरूड, भाटेगाव, हिवरा, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव, वसफळ, जामगव्हाण, सुकळीवीर आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यात १ मार्च रोजी सकाळी ३ च्या सुमारास झालेल्या पावसाने गहू, हरभरा, ज्वारी हे पिकांचे नुकसान झाले. आंब्याला फटका, संत्रीची नोंद नाही- सलग पाच वर्षांपासून संकरित आणि परजिल्ह्यातील आंब्यावर रसाची मदार आहे. यावेळीही मोहोर जोरात आला असताना पावसाने तो गळाला. त्यात वसमत आणि हिंगोली वगळता तीन तालुक्यांत नुकसानीची नोंद केली. मात्र हिंगोली तालुक्यात कमी प्रमाणात का होईना असलेली संत्र्याच्या नुकसानीची नोंद नाही. इतर पिकांत डाळिंबाचे १९ हजारांवर नुकसान दाखवले. द्राक्ष, आवळा, चिकू, पेरूचे कॉलम नील असताना संत्र्यांच्या नुकसानीचा कॉलमही नाही आणि नुकसानीचा उल्लेख नाही. त्यामुळे अस्मानीबरोबर सुलतानी संकटही संत्रा उत्पादकांवर ओढवले आहे.