शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

२५ हजार मराठा बांधव ध्वजारोहणासाठी हिंगोलीत धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:51 IST

सकल मराठा समाजाच्या वतीने येथील गांधी चौकात मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी चर्चेलाही बोलावले होते. सकारात्मक चर्चा झाली, पण फारसे काही निष्पन्न झाले नाही. १५ आॅगस्टला २५ हजार मराठा समाजबांधव जिल्हा कचेरीवर धडकतील, असा विश्वास सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सकल मराठा समाजाच्या वतीने येथील गांधी चौकात मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी चर्चेलाही बोलावले होते. सकारात्मक चर्चा झाली, पण फारसे काही निष्पन्न झाले नाही. १५ आॅगस्टला २५ हजार मराठा समाजबांधव जिल्हा कचेरीवर धडकतील, असा विश्वास सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.जिल्हाभरात गेल्या २० दिवसांपासून मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी विविध आंदोलने केली जात आहेत. गांधी चौकात १५ दिवसांपासून ठिय्या दिला आहे. लोकप्रतिनिधींना गावबंदी व पालकमंत्र्यांना १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करू दिले जाणार नसल्यचा इशाराही निवेदनाद्वारे दिलेला आहे. यासाठी सर्व जिल्हा परिषद सर्कलनिहाय मराठा बांधव येण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. समन्वयकांना ही जबाबदारी दिली आहे. किमान २५ हजार समाजबांधव उपस्थित राहतील, असा विश्वास वर्तविण्यात आला. पालकमंत्र्यांशिवाय शासकीय अधिकारी, वीरपत्नी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यांच्या हस्ते १५ आॅगस्टचे ध्वजारोहण व्हावे, अशी मागणी केली जात आहे.वसमतला बाराव्या दिवशीही ठिय्यावसमत : येथे २ आॅगस्ट पासून मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीवरून सूरू आसलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या बाराव्या दिवशीही आंदोलन सुरूच असून आज धनगर समाजाने ही आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासह सरकारचा निषेध केला.सकाळपासून ठिय्या आंदोलनात असेगाव सर्कल मधील मालापूर, रूंज, गुंज, पळसगाव, टाकळगाव, सुनेगाव, दगडपिंप्री इ. गावांतील सकल मराठा समाजाने सक्रिय पुढाकार घेतला आहे. भजन, पोवाडे, सरकार निषेधार्थ रचलेली गाणे आणि आरक्षण आमच्या हक्काचे..., एक मराठा लाख मराठा.., छत्रपती शिवाजी महाराज की जय... ! आदी घोषणांनी परिसरात सरकारचा निषेध केला.मागील बारा दिवसांत येथे विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली.प्रत्येक दिवशी नवे आंदोलन करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र अजूनही मागण्यांवर कोणताच निर्णय नसल्याचे दिसून येत आहे.शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चाजिल्हाधिकाºयांकडे शिष्टमंडळाने विविध ७ मागण्या मांडल्या. तर त्या पूर्ण न झाल्यास शहिदाची वीरपत्नी, प्रशासकीय अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांना ती संधी द्यावी अन्यथा पालकमंत्र्यास ध्वजारोहण करण्यास आम्ही मज्जाव करू, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, तुम्ही प्रशासनाकडे सादर केलेल्या मागण्या आम्ही पालकमंत्री व शासनाकडे पाठविल्या असून याबाबत सकारात्मक निर्णय होईल. आपल्या मागण्यांबाबत योग्य ते पाऊल उचलले जाईल, असे आश्वासित केले. या बैठकीला अ. जिल्हाधिकारी जगदीश मनियार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्यासह मराठा समन्वयक उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा