शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

दंगलप्रकरणी २४ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:42 IST

सन २०१० मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दंगल झाली होती. यातील दोन्ही गटांतील २४ आरोपींना शुक्रवारी प्रथम न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दंगलीत दोषी ग्राह्य धरून प्रत्येकी १५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये दोन विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. निकाल देणार असल्याने न्यायालयात व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : सन २०१० मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दंगल झाली होती. यातील दोन्ही गटांतील २४ आरोपींना शुक्रवारी प्रथम न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दंगलीत दोषी ग्राह्य धरून प्रत्येकी १५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये दोन विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. निकाल देणार असल्याने न्यायालयात व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.औंढा नागनाथ येथे २३ सप्टेंबर २०१० रोजी रात्री १२.३० वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली होती. यात तत्कालीन पोलीस निरीक्षक सी.पी.काकडे व चार पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी दोन्ही समाजातील प्रत्येकी १२आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.सदरील प्रकरण औंढा प्रथमवर्ग न्यायालयात तब्बल ८ वर्षे चालले. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहकारी अभियोक्ता अ‍ॅड. चेतन अग्रवाल यांनी बाजू मांडली होती. अंतिम युक्तीवादानंतर न्यायाधीश एस.पी.आडे यांनी शुक्रवारी न्यायालयाचा निकाल दिला. यामध्ये विद्यमान नगरसेवक जकी काजी, अनिल देव यांच्यासह जियाउद्दीन काजी, शेख इजाज खालेद, शे.खाजा शे. इक्रोमोद्दीन, सरफराज पठाण, शफीयोद्दीन काजी, शमीकौद्दीन काजी, सलीम खतीब, शे. एकबाल खालेद, शे.जब्बार शे. खालेद, शे.जब्बार इब्राहिम, मनोज देशमुख, गजानन रेणके, गोकूळ काळे, सुंदर काळे, बबन सोनुने, सचिन देव, अमोल गोटरे, नागेश यन्नावार, विजय यकुतकर, मारोती राज व सर्व रा.औंढा यांनी न्यायालयात गावातील जातीय सलोखा कायम ठेवण्याची हमी सर्व आरोपींनी दिल.त्यांना प्रत्येकी १५०० रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यातील आरोपींनी हा दंड न भरल्यास त्यांना १५ दिवसांच्या साधा कारावासाची शिक्षा न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दिली. आरोपींकडून वसूल दंडाची रक्कम ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहे.शुक्रवारी दुपारी हा निकाल देण्यात येणार असल्याने येथे मोठी गर्दी जमली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केल्याने परिसरास छावणीचे स्वरुप आले होते.