शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

२२२० करदात्या शेतकऱ्यांचा पेन्शन परतीच्या नोटिशीला ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

हिंगोली : पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षात तीन हप्त्यात सहा हजारांची पेन्शन देण्यात येते. यात २६६५ करदाते तर ६४०० ...

हिंगोली : पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षात तीन हप्त्यात सहा हजारांची पेन्शन देण्यात येते. यात २६६५ करदाते तर ६४०० अपात्र शेतकऱ्यांनीही ६.८० कोटींचा लाभ उचलला. मात्र, २२२० करदाते प्रशासनाने नोटिसा बजावूनही दाद देत नसल्याचे चित्र आहे.

हिंगोली जिल्ह्यात पीएम किसान योजनेत जवळपास २.०३ लाख लाभार्थी शेतकरी आहेत. आधी प्रशासनाकडून या शेतकऱ्यांच्या नोंदी करून पहिला हप्ता त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी १.१० लाखच लाभार्थी समोर आले होते. नंतर तक्रारी वाढल्या अन् शेतकऱ्यांनीच नोंदी करण्यासाठी बाहेरून ई-सुविधा केंद्रावरूनच व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी भरमसाट नोंदी केल्या. त्यात पात्र शेतकऱ्यांना थेट नोंदणीचा फायदा झाला असला तरीही अनेक अपात्र शेतकऱ्यांनीही घुसखोरी केली. शिवाय, यात करदात्या शेतकऱ्यांचीही नोंदणी झाल्याचे नंतर समोर आले. त्यामुळे शासनाने पडताळणी करून अशांकडील रकमा परत घेण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्याला काही जण वगळता इतरांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्याममुळे केवळ ५८ लाख वसूल झाले असून, अजून ६.२० कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे.

आतापर्यंत ४४ लाख वसूल

हिंगोली जिल्ह्यात करदाते असलेल्या २२६५ शेतकऱ्यांना २.३५ कोटी रुपयांचा लाभ पीएम किसान योजनेत मिळाला आहे.

यापैकी ४६८ शेतकऱ्यांनी रक्कम परत केली किंवा करण्यास प्रारंभ केला. ही रक्कम ४४ लाख एवढी आहे.

अजूनही १.८५ कोटी रुपयांची वसुली बाकी असून, जवळपास २२२० शेतकऱ्यांनी अजून छदामही परत केला नाही. अशांना नोटिसा देऊनही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

अपात्र शेतकऱ्यांकडेही ४.३० कोटी

६४०० अपात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आल्याने पीएम किसानमधून जवळपास ४.४४ कोटी रुपये अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. मात्र, यापैकी केवळ १८० शेतकऱ्यांनीच रक्कम परत केली आहे, तर ही रक्कम १४ लाखांची आहे. अजून ४.३० कोटी परत येणे बाकी आहे. यातील अनेक शेतकरी तर जागेवर सापडतही नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी

२.०३ लाख

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी ६४८

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी ३५००

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी ८४१४

पीएम किसान योजनेतील करदाते व अपात्र शेतकऱ्यांना मध्यंतरी नोटिसा दिल्यानंतर काही प्रमाणात वसुली वाढली आहे. मात्र, जे शेतकरी प्रतिसाद देत नाहीत. त्याबाबत शासनाकडून वसुलीसाठी त्यांच्या खात्याला ऑटो डेबिटची सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे.

-चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी