शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

रोहयोच्या १४२ कामांवर २२०० मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

कळमनुरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये १४२ कामे सुरू आहेत. या कामांवर २ ...

कळमनुरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये १४२ कामे सुरू आहेत. या कामांवर २ हजार २०० मजूर आहेत. रोहयोअंतर्गत कोरोना काळातही २२०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या ४५ ग्रामपंचायतींमध्ये घरकुल, सिंचन विहिरी, वृक्ष लागवड व संगोपन, रोपवाटिका, फळबाग लागवड, तुती लागवड आदी कामे सुरू आहेत. मजुरांना कामाच्या मोबदल्यात मजुरी दिली जाते. प्रत्येक मजुराला कमीत कमी २४८ रुपये मजुरी मिळावी, ही अपेक्षा असते. यापूर्वी मजुरांना २३८ रुपये मजुरी होती. १ एप्रिलपासून मजुरांच्या मजुरीत दहा रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. मजुरांच्या खात्यावर ऑनलाइन मजुरी जमा केली जाते. या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरांना मोठा आधार मिळाला आहे. कोरोनामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर कोसळली आहे; परंतु मनरेगा अंतर्गत होत असलेल्या कामामुळे मजुरांना गावातच मजुरी मिळालेली आहे.

जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून संचारबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळत नाही. परंतु मनरेगाअंतर्गत गावातील प्रत्येक ग्रामस्थांना या माध्यमातून रोजगार मिळत आहे. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी केल्यास प्रशासनातर्फे मागेल त्याला काम उपलब्ध करून दिले जाते. ही कामे सुरक्षित अंतराचे पालन करून तसेच मास्कचा वापर करून शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून मजूरही कामे करीत आहेत.

संचारबंदी व कोरोनाकाळ असल्याने रोहयोच्या प्रत्येक कामावर पाच ते दहा मजूर असतात. प्रत्येक कामावर कोरोनाच्या नियमाचे तंतोतंत पालन केले जात असल्याचे पंचायत समितीतून सांगण्यात आले. मजुरांनी आठ दिवस काम केल्यानंतर मजुरांच्या ऑनलाइन बँक खात्यावर मजुरी जमा केली जाते. रोहयोच्या कामांना कोरोना काळात मागणी वाढलेली दिसत आहे.