शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रोहयोच्या १४२ कामांवर २२०० मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

कळमनुरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये १४२ कामे सुरू आहेत. या कामांवर २ ...

कळमनुरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये १४२ कामे सुरू आहेत. या कामांवर २ हजार २०० मजूर आहेत. रोहयोअंतर्गत कोरोना काळातही २२०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या ४५ ग्रामपंचायतींमध्ये घरकुल, सिंचन विहिरी, वृक्ष लागवड व संगोपन, रोपवाटिका, फळबाग लागवड, तुती लागवड आदी कामे सुरू आहेत. मजुरांना कामाच्या मोबदल्यात मजुरी दिली जाते. प्रत्येक मजुराला कमीत कमी २४८ रुपये मजुरी मिळावी, ही अपेक्षा असते. यापूर्वी मजुरांना २३८ रुपये मजुरी होती. १ एप्रिलपासून मजुरांच्या मजुरीत दहा रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. मजुरांच्या खात्यावर ऑनलाइन मजुरी जमा केली जाते. या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरांना मोठा आधार मिळाला आहे. कोरोनामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर कोसळली आहे; परंतु मनरेगा अंतर्गत होत असलेल्या कामामुळे मजुरांना गावातच मजुरी मिळालेली आहे.

जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून संचारबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळत नाही. परंतु मनरेगाअंतर्गत गावातील प्रत्येक ग्रामस्थांना या माध्यमातून रोजगार मिळत आहे. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी केल्यास प्रशासनातर्फे मागेल त्याला काम उपलब्ध करून दिले जाते. ही कामे सुरक्षित अंतराचे पालन करून तसेच मास्कचा वापर करून शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून मजूरही कामे करीत आहेत.

संचारबंदी व कोरोनाकाळ असल्याने रोहयोच्या प्रत्येक कामावर पाच ते दहा मजूर असतात. प्रत्येक कामावर कोरोनाच्या नियमाचे तंतोतंत पालन केले जात असल्याचे पंचायत समितीतून सांगण्यात आले. मजुरांनी आठ दिवस काम केल्यानंतर मजुरांच्या ऑनलाइन बँक खात्यावर मजुरी जमा केली जाते. रोहयोच्या कामांना कोरोना काळात मागणी वाढलेली दिसत आहे.