शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कोरोनाकाळात २१ बालविवाह रोखले; दोनवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

घरची गरीबी परिस्थिती व आर्थिक विवंचनेतून हे बालविवाह होत होते, असे तपासाअंति समोर आले आहे. एकंदर कोरोनाकाळात २१ बाल ...

घरची गरीबी परिस्थिती व आर्थिक विवंचनेतून हे बालविवाह होत होते, असे तपासाअंति समोर आले आहे. एकंदर कोरोनाकाळात २१ बाल विवाह रोखले गेले आहेत. एप्रिल २०२० मध्ये वसमत तालुक्यातील बोराळा येथे १, मे महिन्यात कळमनुरी तालुक्यातील धारधावंडा येथे २, वसमत तालुक्यातील सेलू येथे १, जूनमध्ये कळमनुरी शहरातील इंदिरानगर येथे १,वारंगा येथे १, जुलै महिन्यात कळमनुरी तालुुक्यातील महालिंगी येथे १, सप्टेंबरमध्ये कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द १, वसमत तालुक्यातील माळवटा येथे १, नोव्हेंबरमध्ये वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे १, हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथे १, पेडगाववाडी येथे १, डिसेंबरमध्ये हिंगोली तालुक्यातील कलगाव येथे १, फेब्रुवारी २०२१ मध्ये वसमत तालुक्यातील वाई येथे २, मार्चमध्ये वसमत तालुक्यातील दगडपिंपरी येथे १, सेलू येथे १, कळमनुरी तालुक्यातील सापळी येथे १, एप्रिलमध्ये हिंगोली तालुक्यातील येळी येथे १, मे महिन्यात वसमत तालुक्यातील गुंज येथे १, औंढा तालुक्यातील उमरा येथे १, कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथे १, जूनमध्ये सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे १, हाताळा येथे १, कळमनुरी तालुक्यातील शिंदगी येथे १ असे बाल विवाह रोखण्यात आले. यापैकी वारंगाफाटा, माळवटा आणि वाई येथील बाल विवाहावर गुन्हे दाखल करण्यात आले.

जुलै महिन्यात कळमनुरी तालुुक्यातील महालिंगी येथे १, सप्टेंबरमध्ये कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द १, वसमत तालुक्यातील माळवटा येथे १, नोव्हेंबरमध्ये वसमत तालुक्यातील इंजनगा १, हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथे १, पेडगाववाडी येथे १, डिसेंबरमध्ये हिंगोली तालुक्यातील कलगाव येथे १, फेब्रुवारी २०२१ मध्ये वसमत तालुक्यातील वाई येथे २, मार्चमध्ये वसमत तालुक्यातील दगडपिंपरी येथे १, सेलू येथे १, कळमनुरी तालुक्यातील सापळी येथे १, एप्रिलमध्ये हिंगोली तालुक्यातील येळी येथे १, मे महिन्यात वसमत तालुक्यातील गुंज येथे १, औंढा तालुक्यातील उमरा येथे १, कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथे १, जूनमध्ये सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे १, हाताळा येथे १, कळमनुरी तालुक्यातील शिंदगी येथे १ असे बाल विवाह रोखण्यात आले. यापैकी वारंगाफाटा, माळवटा आणि वाई येथील बाल विवाहावर गुन्हे दाखल करण्यात आले.

शाळाबाह्य मुले-मुली जास्त...

बालविवाहामध्ये जास्त करुन शाळाबाह्य मुले-मुलीच आहेत. हा सर्व प्रकार गरीबी आणि आर्थिक विवंचणेतून होतो असेही तपासाअंतीम समोर आले आहे. बालविहाबाबत कोणाला माहिती कळाल्यास त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा.

माहिती कळाल्याबरोबर घेतली धाव...

कोरोना काळात बाल विवाह होणार असल्याची माहिती कळाली. लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. संबंधित बालकांच्या माता-पित्यांनाही यावेळी समज देण्यात आली. यापुढे असे प्रकार घडू देवू नका, अशीही सूचना दिली.

आर्थिक विवंचणेतून बालविवाह

आर्थिक विवंचणा हे प्रमुख कारण बाल विवाह होण्यासाठी कारणीभूत आहे. मागचा पुढचा विचार न करता ही मंडळी आपल्या मुला-मुलीचा विवाह करुन टाकतात. नंतर मात्र पश्चातापाला सामोरे जातात, एवढे मात्र नक्की.

प्रतिक्रिया

पालकांनी मुलींना जास्तीत जास्त शिक्षण दिले पाहिजे. मुलगी जर शिकली तर घराची प्रगती होते. बाल वयात मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणामुळे मुलगी उच्चशिक्षीत होते.

-सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

जिल्ह्यात बाल विवाह होत असतील तर त्याची माहिती गावकऱ्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात द्यावी. यासाठी १०९८ असा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे.

-विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी