शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

शहरात २० हजार घरे; अंदाजे १० टक्के अनधिकृत नळधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणीप्रश्न कायम पेटलेला असल्याचे पाहायला मिळते. हिंगोलीत मात्र ही समस्या जाणवत नाही. एकेकाळी येथेही ही समस्या ...

अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणीप्रश्न कायम पेटलेला असल्याचे पाहायला मिळते. हिंगोलीत मात्र ही समस्या जाणवत नाही. एकेकाळी येथेही ही समस्या कायम आवासून उभी राहायची. मात्र, नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे मागील आठ वर्षांपासून हा प्रश्न सुटला आहे. अनेक नवीन वसाहतींनाही या योजनेचे पाणी दिले आहे. काही भागात बोअरलाच मुबलक पाणी असल्याने नागरिक पालिकेच्या पाण्यावर अवलंबून नाहीत. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. मात्र, आगामी २५ वर्षांचा विचार करून ही योजना बनविलेली असल्याने दोन दिवसाआड शहराला पुरेसे पाणी वेळापत्रकाप्रमाणे मिळते. तशी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली योजना आहे. मात्र, वीजबिल व पाणीपट्टी वसुली याचा ताळमेळ बसविण्यासाठी दोन दिवसांआड पाणी दिले जाते.

हिंगोलीची योजना नवीन असल्याने गळतीचे प्रमाण कमी असले तरीही अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोरच्या नळांना तोट्या लावल्या नसल्याने पाणी वाया जाण्याचे प्रकार जुन्या शहरासह अनेक नवीन वस्तीतही पाहायला मिळते. त्याचबरोबर काहींनी अनधिकृतरित्या जोडण्याही घेतल्या आहेत. त्यामुळे शहरात पाणीप्रश्न निर्माण होत नसला तरीही नगरपालिकेच्या कराची चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. ही योजना कायम अशीच सुरू राहण्यासाठी यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तसेच जोडणी देण्यासही अनेकदा विलंब होतो. त्यामुळे संबंधितांकडून अवैध जोडणीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचेही चित्र आहे. यात सुसूत्रता आणली तर ही वेळ टाळता येणार आहे.

२ हजार अनधिकृत नळ

हिंगोली शहरात जवळपास दोन ते अडीच हजार अनधिकृत नळ जोडण्या असण्याची शक्यता आहे. यासाठी दरवर्षी सर्वेक्षण करून त्या अधिकृत करण्याचे काम केले जाते.

पाणी गळतीला लगाम

हिंगोली शहरात नवीन पाणीपुरवठा योजना असल्याने आधीच पाणीगळती त्या प्रमाणात होत नाही. मात्र, एरवी कायम तपासणी करून पाणी गळती होणार नाही, यासाठी पथके नेमलेली आहेत. क्वचित प्रसंगी विकासकामामुळे गळती होते.

२ कोटींचा पाणीकर जनतेकडे थकला

हिंगोली शहरात पाणीपट्टी कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. यंदा ७५ लाख वसूल झाले असून, २ कोटी रुपये थकलेले आहेत.

नगरपालिकेच्या पथकांकडून वसुली मोहीम सुरू असून, यात दिरंगाई केल्यास नळजोडणी तोडण्यात येणार आहे.

हिंगोलीत पाणीपुरवठा योजना चांगल्या रितीने कार्यान्वित आहे. वेळापत्रकाप्रमाणे नागरिकांना पाणी मिळते. कोणी अवैध जोडणी केली असेल तर ती नियमित करून घ्यावी. अन्यथा कठोर कारवाई होईल. शिवाय वेळेत थकबाकी भरून नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य केले पाहिजे.

- डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, हिंगोली