शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

शहरात २० हजार घरे; अंदाजे १० टक्के अनधिकृत नळधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणीप्रश्न कायम पेटलेला असल्याचे पाहायला मिळते. हिंगोलीत मात्र ही समस्या जाणवत नाही. एकेकाळी येथेही ही समस्या ...

अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणीप्रश्न कायम पेटलेला असल्याचे पाहायला मिळते. हिंगोलीत मात्र ही समस्या जाणवत नाही. एकेकाळी येथेही ही समस्या कायम आवासून उभी राहायची. मात्र, नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे मागील आठ वर्षांपासून हा प्रश्न सुटला आहे. अनेक नवीन वसाहतींनाही या योजनेचे पाणी दिले आहे. काही भागात बोअरलाच मुबलक पाणी असल्याने नागरिक पालिकेच्या पाण्यावर अवलंबून नाहीत. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. मात्र, आगामी २५ वर्षांचा विचार करून ही योजना बनविलेली असल्याने दोन दिवसाआड शहराला पुरेसे पाणी वेळापत्रकाप्रमाणे मिळते. तशी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली योजना आहे. मात्र, वीजबिल व पाणीपट्टी वसुली याचा ताळमेळ बसविण्यासाठी दोन दिवसांआड पाणी दिले जाते.

हिंगोलीची योजना नवीन असल्याने गळतीचे प्रमाण कमी असले तरीही अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोरच्या नळांना तोट्या लावल्या नसल्याने पाणी वाया जाण्याचे प्रकार जुन्या शहरासह अनेक नवीन वस्तीतही पाहायला मिळते. त्याचबरोबर काहींनी अनधिकृतरित्या जोडण्याही घेतल्या आहेत. त्यामुळे शहरात पाणीप्रश्न निर्माण होत नसला तरीही नगरपालिकेच्या कराची चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. ही योजना कायम अशीच सुरू राहण्यासाठी यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तसेच जोडणी देण्यासही अनेकदा विलंब होतो. त्यामुळे संबंधितांकडून अवैध जोडणीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचेही चित्र आहे. यात सुसूत्रता आणली तर ही वेळ टाळता येणार आहे.

२ हजार अनधिकृत नळ

हिंगोली शहरात जवळपास दोन ते अडीच हजार अनधिकृत नळ जोडण्या असण्याची शक्यता आहे. यासाठी दरवर्षी सर्वेक्षण करून त्या अधिकृत करण्याचे काम केले जाते.

पाणी गळतीला लगाम

हिंगोली शहरात नवीन पाणीपुरवठा योजना असल्याने आधीच पाणीगळती त्या प्रमाणात होत नाही. मात्र, एरवी कायम तपासणी करून पाणी गळती होणार नाही, यासाठी पथके नेमलेली आहेत. क्वचित प्रसंगी विकासकामामुळे गळती होते.

२ कोटींचा पाणीकर जनतेकडे थकला

हिंगोली शहरात पाणीपट्टी कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. यंदा ७५ लाख वसूल झाले असून, २ कोटी रुपये थकलेले आहेत.

नगरपालिकेच्या पथकांकडून वसुली मोहीम सुरू असून, यात दिरंगाई केल्यास नळजोडणी तोडण्यात येणार आहे.

हिंगोलीत पाणीपुरवठा योजना चांगल्या रितीने कार्यान्वित आहे. वेळापत्रकाप्रमाणे नागरिकांना पाणी मिळते. कोणी अवैध जोडणी केली असेल तर ती नियमित करून घ्यावी. अन्यथा कठोर कारवाई होईल. शिवाय वेळेत थकबाकी भरून नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य केले पाहिजे.

- डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, हिंगोली