शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

१९२ गावे होणार लख्ख प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:52 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्याही अधिक आहे, अशा राज्यभरातील १९२ गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्याही अधिक आहे, अशा राज्यभरातील १९२ गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.नांदेड परिमंडळातील २५ गावांचा समावेश ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत करण्यात आला असून या गावातील दलित वस्त्यांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण केले जाणार आहे. जिल्हयातील अद्याप वीज न पोहोचलेल्या कुटूंबांना वीजजोडणीचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या ‘ग्राम स्वराज्य अभियान’ अंतर्गत नांदेड जिल्हयातील २० तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गावांचा सदर योजनेत समावेश आहे. या गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी गाव निहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्या गावात दलितांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे व गरीब कुटुंबांचे प्रमाणही जास्त आहे अशा गावामध्ये शंभर टक्के विद्युतीकरण केले जाणार आहे. सदरील अभियानात संबंधीत गावातील अद्याप वीज जोडणी नसलेल्या ग्रामस्थांनी दिलेल्या गावनिहाय तारखेला शिबिरामध्ये उपस्थित राहून वीज जोडणीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे तसेच हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. महावितरणच्या या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे.ज्यांच्याकडे पूर्वी मीटर होते, परंतु ते थकबाकीमुळे काढून नेले असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे महावितरणचे उप कार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.सेनगाव तालूक्यातील सिंदेफळ हिंगोली तालुक्यातील कलगाव,देवठाणा, कळमनुरी तालूक्यातील तुप्पा, वसमत येथील कौडगाव आदी गावांत कॅम्प भरविले जाणार असल्याचे महावितरण तर्फे सांगण्यात आले.

 

 

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण