शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१७ लाखांची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:14 IST

आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाती फाटा येथे २७ जुलै रोजी दुपारी ८ ते १० अज्ञात लोकांनी ट्रक अडवून पेट्रोल टाकून पेटवून दिला. यात तो ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेप्रकरणी ट्रकचालक महमद ताहिर महमंद तय्यब (रा. कालखेडा ता. फेरोजपूर झरिका जि. मेवात हरियाणा) याच्या फिर्यादीवरून १० अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि ओमकांत चिंचोलकर करत आहेत. तर एरिगेशन कॅॅम्प येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागीय कार्यालय विभाग क्र. ४ मध्ये २७ जुलै रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या दरम्यान १० ते १२ अनोळखी व्यक्ती तोंडाला बांधून हातात तलवारी घेवून कार्यालयात अनाधिकृत घुसत कार्यालयाची तोडफोड केली. अभिलेख जाळले, काचा-फर्निचर तोडले, यात १ लाख ३० हजार रूपयांच्या शासकीय मालमततेचे नुकसान केले आहे.याप्रकरणी गणेश गंगाराम काळदाते (कनिष्ठ लिपिक) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनेत १६ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार तानाजी चेरले करीत आहेत. हे अनोळखी हल्लेखोर कोण? याचा शोध लावण्याचे आव्हान बाळापूर पोलिसांपुढे उभे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा