शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१६ दिवसात हिंगोली आगाराचे उत्पन्न ४४ लाखांवर पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

हिंगोली: कोरोना महामारीमुळे मागील चार महिन्यांमध्ये बसेस बंदच होत्या. त्यामुळे आगाराला मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु, शासनाच्या आदेशानुसार ...

हिंगोली: कोरोना महामारीमुळे मागील चार महिन्यांमध्ये बसेस बंदच होत्या. त्यामुळे आगाराला मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु, शासनाच्या आदेशानुसार बसेस सुरु झाल्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होत आहे. प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. १६ दिवसांमध्ये हिंगोली आगाराने ४४ लाख १५ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले असून, परभणी विभागात हिंगोली आगाराचा प्रथम क्रमांक आला आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. आजमितीस कोरोना ओसरत चालला असला तरी कोरोनाचे रुग्ण रोजच आढळून येत आहेत. कोरोना महामारीचे रुग्ण वाढू नये म्हणून शासनाने खरबदारी घेत महामंडळाच्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली होती. ६ जूनपासून शासनाने महामंडळास बसेस सुरु करण्याबाबत परवानगी दिली आहे. ७ जून ते २१ जून या दरम्यान हिंगोली आगाराने ४४ लाख १५ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न एस. टी. महामंडळास मिळवून दिले आहे. ७ जून रोजी ८४ हजार २३८ रुपये, ८ जून रोजी १ लाख १५ हजार ३९२ रुपये, ९ जून रोजी १ लाख ८३ हजार ७६ रुपये, १० जून रोजी २ लाख ४२ हजार १ रुपये, ११ जून रोजी २ लाख ७१ हजार ९६९ रुपये, १२ जून रोजी २ लाख ९३ हजार १३३ रुपये, १३ जून रोजी ३ लाख ३ हजार २५१ रुपये, १४ जून रोजी ३ लाख ४८ हजार ८५० रुपये, १५ जून रोजी ३ लाख ६९ हजार ५४३ रुपये, १६ जून रोजी ३ लाख ७९ हजार ८८९ रुपये, १७ जून रोजी ४ लाख १५ हजार १८० रुपये, १८ जून रोजी ३ लाख ८६ हजार ७६ रुपये, १९ जून रोजी ३ लाख ६२ हजार ६२० रुपये, २० जून रोजी ४ लाख २८ हजार ७२८ रुपये तर २१ जून रोजी ४ लाख ११ हजार ८७० रुपये एवढे उत्पन्न झाले आहे.

सद्यस्थितीत हिंगोली आगाराच्या बसेस १५ हजार किलोमीटर धावत आहेत. ग्रामीण भागासाठी परवानगी दिल्यास किलोमीटरमध्ये वाढ होऊ शकते. कोरोना ओसरत चालला असला तरी रुग्ण रोजच आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील बसेस सुरु करण्याबाबत परवानगी दिलेली नाही. सद्यस्थितीत सोलापूर, कोल्हापूर, पुणे, लातूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, अकोला, परभणी आदी लांब पल्ल्यांच्या बसेसला परवानगी दिलेली आहे.

हिंगोली ते हैदराबाद बस सुरु

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना नियम पाळत २२ जून पासून हिंगोली आगाराने हिंगोली ते हैैदराबाद ही बस सुरु केली आहे. सकाळी ६.३० वाजेदरम्यान ही बस हैदराबादला निघते. दुसऱ्या दिवशी हैदराबाद येथून सकाळी १० वाजता ही बस निघून हिंगोली येथे रात्री ९ वाजे दरम्यान पोहोचते. कोरोना महामारी लक्षात घेऊन सर्व चालक, वाहक व कर्मचाऱ्यांना कोरोना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे चालक-वाहक कोरोना नियम पाळणार नाहीत त्यांची ड्यूटी बंद करण्यात येईल, अशीही ताकीद देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचा आदेश आल्यास ग्रामीण भागातील बसेस सुरु करण्यात येतील.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली आगार