शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

१६ दिवसात हिंगोली आगाराचे उत्पन्न ४४ लाखांवर पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

हिंगोली: कोरोना महामारीमुळे मागील चार महिन्यांमध्ये बसेस बंदच होत्या. त्यामुळे आगाराला मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु, शासनाच्या आदेशानुसार ...

हिंगोली: कोरोना महामारीमुळे मागील चार महिन्यांमध्ये बसेस बंदच होत्या. त्यामुळे आगाराला मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु, शासनाच्या आदेशानुसार बसेस सुरु झाल्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होत आहे. प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. १६ दिवसांमध्ये हिंगोली आगाराने ४४ लाख १५ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले असून, परभणी विभागात हिंगोली आगाराचा प्रथम क्रमांक आला आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. आजमितीस कोरोना ओसरत चालला असला तरी कोरोनाचे रुग्ण रोजच आढळून येत आहेत. कोरोना महामारीचे रुग्ण वाढू नये म्हणून शासनाने खरबदारी घेत महामंडळाच्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली होती. ६ जूनपासून शासनाने महामंडळास बसेस सुरु करण्याबाबत परवानगी दिली आहे. ७ जून ते २१ जून या दरम्यान हिंगोली आगाराने ४४ लाख १५ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न एस. टी. महामंडळास मिळवून दिले आहे. ७ जून रोजी ८४ हजार २३८ रुपये, ८ जून रोजी १ लाख १५ हजार ३९२ रुपये, ९ जून रोजी १ लाख ८३ हजार ७६ रुपये, १० जून रोजी २ लाख ४२ हजार १ रुपये, ११ जून रोजी २ लाख ७१ हजार ९६९ रुपये, १२ जून रोजी २ लाख ९३ हजार १३३ रुपये, १३ जून रोजी ३ लाख ३ हजार २५१ रुपये, १४ जून रोजी ३ लाख ४८ हजार ८५० रुपये, १५ जून रोजी ३ लाख ६९ हजार ५४३ रुपये, १६ जून रोजी ३ लाख ७९ हजार ८८९ रुपये, १७ जून रोजी ४ लाख १५ हजार १८० रुपये, १८ जून रोजी ३ लाख ८६ हजार ७६ रुपये, १९ जून रोजी ३ लाख ६२ हजार ६२० रुपये, २० जून रोजी ४ लाख २८ हजार ७२८ रुपये तर २१ जून रोजी ४ लाख ११ हजार ८७० रुपये एवढे उत्पन्न झाले आहे.

सद्यस्थितीत हिंगोली आगाराच्या बसेस १५ हजार किलोमीटर धावत आहेत. ग्रामीण भागासाठी परवानगी दिल्यास किलोमीटरमध्ये वाढ होऊ शकते. कोरोना ओसरत चालला असला तरी रुग्ण रोजच आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील बसेस सुरु करण्याबाबत परवानगी दिलेली नाही. सद्यस्थितीत सोलापूर, कोल्हापूर, पुणे, लातूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, अकोला, परभणी आदी लांब पल्ल्यांच्या बसेसला परवानगी दिलेली आहे.

हिंगोली ते हैदराबाद बस सुरु

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना नियम पाळत २२ जून पासून हिंगोली आगाराने हिंगोली ते हैैदराबाद ही बस सुरु केली आहे. सकाळी ६.३० वाजेदरम्यान ही बस हैदराबादला निघते. दुसऱ्या दिवशी हैदराबाद येथून सकाळी १० वाजता ही बस निघून हिंगोली येथे रात्री ९ वाजे दरम्यान पोहोचते. कोरोना महामारी लक्षात घेऊन सर्व चालक, वाहक व कर्मचाऱ्यांना कोरोना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे चालक-वाहक कोरोना नियम पाळणार नाहीत त्यांची ड्यूटी बंद करण्यात येईल, अशीही ताकीद देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचा आदेश आल्यास ग्रामीण भागातील बसेस सुरु करण्यात येतील.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली आगार