शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यातील १५३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, १५३ ग्रामपंचायती निर्विवाद बहुमतासह ताब्यात ...

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, १५३ ग्रामपंचायती निर्विवाद बहुमतासह ताब्यात घेतल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली आहे. त्यापैकी ७३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडण्यात आले असून, उर्वरित ४२२ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी खा. राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने या निवडणुका लढविल्या. काँग्रेसने स्वतंत्रपणे पॅनल उभे केले होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधकांवर टीका करण्याऐवजी विकासाचे मुद्दे घेऊनच काँग्रेसने प्रचार केला. गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी विकास कामांच्या जोरावर निवडणुकीचा प्रचार चालविला होता. गावकऱ्यांचे प्रश्न समजून घेत, त्यांची कुठल्याही परिस्थितीत सोडवणूक केली जाईल, असे आश्वासन देत निवडणूक लढविली. जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकून तब्बल १५३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात दिल्या आहेत. आखाडा बाळापूर, दांडेगाव, नरसी नामदेव, येळेगाव सोळंके, शेवाळा, पिंपळदरी अशा मोठ्या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, याशिवाय जिल्ह्यात १,३०५ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. विकासाच्या मुद्द्यावरच जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास टाकून मोठ्या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात दिल्या आहेत. या ग्रामपंचायतीमधून पालकमंत्री गायकवाड, खा.राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे करून गावकऱ्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही संजय बोंढारे यांनी सांगितले.