शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

११३ शाळांचे रूपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST

हिंगोली : राजमाता जिजाऊ शैक्षणिक विकास गुणवत्ता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील निजामकालीन असलेल्या जिल्हा परिषदेच्या ११३ शाळांची दुरूस्ती व वर्गाची ...

हिंगोली : राजमाता जिजाऊ शैक्षणिक विकास गुणवत्ता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील निजामकालीन असलेल्या जिल्हा परिषदेच्या ११३ शाळांची दुरूस्ती व वर्गाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी शाळांच्या दुरूस्तीसाठी येणाऱ्या खर्चाच्या एकूण ८० टक्के म्हणजे १६ कोटी १७ लाख ३० हजार रूपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. तर २० टक्के निधी इतर माध्यमातून उपलब्ध करून घ्यावा लागणार आहे.

जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी निजामकालीन शाळा आहेत. मात्र या शाळांची दुरवस्था झाली असून शाळा मोडकळीस आल्या आहेत. वर्गखोल्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसणे ही अवघड बनले आहे. अशा शाळांची समग्र शिक्षा यंत्रणेमार्फत पुनर्बांधणी व दुरूस्तीची कामे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक विकास गुणवत्ता अभियानांतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४२ शाळांच्या १२६ वर्गखोल्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी ११ कोटी ८५ लाख ६० हजारांचा निधी तसेच ७१ शाळांच्या मोठ्या दुरूस्तीसाठी ४ कोटी ३१ लाख ७० हजार रूपयांचा निधीस शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत ९ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे शाळांचे रूपडे पालटण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

२० टक्के निधी इतर स्त्रोतातून करावा लागणार जमा

शासनाच्या वतीने ८० टक्के इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित २० टक्के निधी पैकी १० टक्के निधी जिल्हा परिषदेने त्यांच्या सेस फंडातून, १५ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती, आमदार, खासदार निधी, मानव विकास मिशन आदींतून तर १० टक्के निधी शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक लोकवर्गणीतून किंवा सी.एस.आर. फंडातून रोख किंवा वस्तू स्वरूपात उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी जिल्हा परिषदांनी किमान ६० ते १०० पटसंख्या असलेल्या शाळांपैकी ज्या शाळांनी २० टक्के निधी उभा केला आहे, त्या शाळांना प्राधान्याने वाटप करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

समितीचे असणार लक्ष

प्रस्तावित शाळांच्या वर्गखोल्यांची पुनर्बांधणी व दुरूस्तीची मोहीम राबविण्याची व प्राधान्य क्रम ठरविण्याची जबाबदारी तसेच प्राधान्यक्रम ठरविण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), सरपंच, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीमधील एक सदस्याचा समावेश असणार असून समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.