शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कर्जमाफीचे ११२ कोटी खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:59 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत रात्रंदिवस एक करीत शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून अर्ज भरले होते. त्याला आता एश आले असून ४३ हजार ५१२ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ५६ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम जमा केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत रात्रंदिवस एक करीत शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून अर्ज भरले होते. त्याला आता एश आले असून ४३ हजार ५१२ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ५६ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम जमा केली आहे.जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ३८५ शेतकºयांनी कर्ज माफीसाठी अर्ज भरले होते. कर्जमाफीची रक्कम तीन बँकाच्या खात्यावर शेतकºयांची रक्कम वर्ग केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत २१ हजार ४० पैकी १९ हजार ७२० शेतकºयांच्या खात्यावर २४ कोटी ६३ लाख ७ हजार ८१४. ३० एवढी रक्कम वर्ग केली आहे. तर राष्टÑीयकृत बँकेच्या १४ हजार ९८ पैकी १० हजार ५३४ शेतकºयांच्या खात्यावर ५६ कोटी ४० लाख १हजार ७३२. ३४ एवढी रक्कम, तर ग्रामीण बँकेच्या ८ हजार ३७४ पैकी ६ हजार २३३ शेतकºयांच्या खात्यावर ३१ कोटी ८० लाख ५६ हजार ३७. ८९ एवढी रक्कम वर्ग केली आहे. असे एकूण ४३ हजार ५१२ पैकी ३६ हजार ४८७ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ६५ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली आहे. तर ७ हजार २५ शेतकºयांचे ४७ कोटी ३१ हजार ७६ हजार ७४७. ४६ एवढी रक्कम शिल्लक आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज माफीसाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी ३१ मार्च अखेर पर्यंत संबंधित बँकांना प्राप्त झालेली रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. तर दीड लाखाच्या वर कर्ज असणाºया शेतकºयांच्या खात्यावर रक्कम अजून वर्ग करण्यात आलेली नाही. यायोजनेंतर्गत केवळ दीड लाखापर्यंतचेच कर्ज माफ होणार असल्याने दीड लाखांच्यावर असलेली रक्कम संंबंधित कर्जदारांने भरल्याशिवाय त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे उर्वरित कर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्ज माफीचे अर्ज करण्यापासून वंचित असलेल्या शेतकºयांसाठी १ ते १४ एप्रिल पर्यंत वाढीव मुदत देण्यात आलेली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र