शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार बालकांना मिळतोय पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

कोरोना स्थितीमुळे जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास ...

कोरोना स्थितीमुळे जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अद्याप जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या नसल्याच्या दिसून येत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तरी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येत होता. सध्याही शालेय पोषण आहार देण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात एकूण १ लाख ३३ हजार लाभार्थी विद्यार्थी आहेत. या मुलांना सुरुवातीला पोषण आहार म्हणून मूग, हरभरा, तांदूळ देण्यात आला. त्यानंतर तूरडाळ, मटकी, तांदूळ देण्यात आला. आता जिल्ह्यात पोषण आहार वाटपाचे काम सुरू असून सध्या मटकी, तांदूळ, मसूर डाळ देण्यात येत आहे. काही शाळेत केवळ तांदूळच वितरित करण्यात येत असल्याबाबत विचारणा केली असता अशी कुठलीही तक्रार आली नसल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना घरपोच आहार

शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येतो. हा आहार शाळेत शिजविला जात नसला तरी धान्य घरपोच देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेमार्फत धान्य वितरित करताना पालक व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून फिजिकल डिस्टन्स अंतराचे पालन करत धान्य देण्यात येत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

प्राथमिक शिक्षण विभागाकडे नाही आकडेवारी

जिल्ह्यात १ लाख ३३ हजार शालेय पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत; मात्र जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या शिक्षण विभागाकडे शालेय पोषण आहारासंदर्भात तालुकानिहाय आकडेवारीच उपलब्ध नाही. त्यातही शालेय पोषण आहारविषयक कामे तालुकास्तरावरून चालतात. शिवाय काही पदेही रिक्त आहेत.

जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी

१३३०००