शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बघे होऊ नका...समाजभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:54 IST

आजकाल रस्ते अपघातांची संख्या किती वाढली आहे? या आठवड्यात तर राज्यात दोन-तीन अपघात असे घडले की, त्यात प्रत्येकी दहाहून अधिकजण मृत्युमुखी पडले. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की, अशा अपघातांच्या आठ-दहा बातम्या तरी सहज दिसतील.

ठळक मुद्देकेवळ काय झालंय एवढेच विचारून केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका, तर मदतीला धावा.जखमीला पाहून विश्वजित तातडीने पुढे गेले. घरच्यांशी संपर्क साधला आणि थेट सीपीआर रुग्णालयात येण्यास सांगितले.

आजकाल रस्ते अपघातांची संख्या किती वाढली आहे? या आठवड्यात तर राज्यात दोन-तीन अपघात असे घडले की, त्यात प्रत्येकी दहाहून अधिकजण मृत्युमुखी पडले. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की, अशा अपघातांच्या आठ-दहा बातम्या तरी सहज दिसतील. तुम्ही नियमित प्रवास करीत असाल तर तुम्हाला एखादा तरी छोटा-मोठा अपघात पाहावयास मिळत असेल. अशावेळी तुम्ही काय करता? अपघात पाहून थोडा वेळ थांबता. चूक कोणाची, कुणी गेले आहे का की केवळ जखमी आहेत, याची चौकशी तिथल्याच बघ्यांकडे करता? अपघात गंभीर असेल तर हळहळता की तसेच निघून पुढे जाता? अपघातातील जखमींच्या मदतीला जावे, त्यांना रुग्णालयात दाखल करावे, असे तुम्हाला वाटते का की पोलिसांची नसती ब्याद पाठीमागे नको म्हणून मनात असूनही तुम्ही काहीही करीत नाही? हे प्रश्न तुम्ही स्वत:लाच विचारा. आपण आजपर्यंत किती अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून त्यांचा जीव वाचविला? याचे उत्तर सकारात्मक असेल तर तुमच्यातला माणूस जागा आहे, तुम्ही समाजसेवी आहात, असे समजायला हरकत नाही.

समाजातील माणुसकी, प्रामाणिकपणा कमी होत चालल्याची ओरड सार्वत्रिक आहे. मात्र, आजही माणुसकीचे दर्शन घडविणाºया घटना पाहायला मिळतात. आणि वाळवंटातही ओअ‍ॅसिस दिसल्याचा भास आपल्याला होतो. अशीच एक घटना स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात घडली. राजारामपुरीतील एक हॉटेल व्यावसायिक विश्वजित काटकर हे त्या दिवशी काही कामानिमित्त साताºयाला गेले होते. तेथील काम आटोपून ते रात्री कोल्हापूरला परत येत होते. सव्वानऊचा सुमार असावा. ते तावडे हॉटेल ओलांडून पुढे आले असता त्यांना रस्त्यात मोठी गर्दी दिसली. त्यांनी गाडी थांबविली. काय झाले हे पाहण्यासाठी ते खाली उतरले, तर तेथे मोठा अपघात झाला होता. तो पाहण्यासाठी जमलेल्या बघ्यांची ती गर्दी होती. एकजण रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन बेशुद्धावस्थेत पडला होता. गर्दीतील कुणीतरी पोलिसांना फोन लावत होते, तर कुणी रुग्णवाहिकेला. कुणी अपघात कसा झाला, याची चर्चा करीत होते. त्या जखमीला पाहून विश्वजित तातडीने पुढे गेले. जखमीच्या शेजारी रस्त्यावर त्याचा मोबाइलही पडला होता. तो उचलून विश्वजित यांनी जखमीच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि थेट सीपीआर रुग्णालयात येण्यास सांगितले. त्यानंतर त्या जखमीला स्वत:च्या गाडीत घातले आणि सीपीआर गाठले.

जखमीला रुग्णालयात दाखल करून त्या जखमीच्या घरचे तिथे येईपर्यंत थांबून मगच ते तेथून बाहेर पडले. त्या जखमीचे नाव होते अनिकेत आडसुळे. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगावचा रहिवासी. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे अनिकेतचे प्राण वाचले. अमित कांदेकर यांनी त्यांच्या या मदतीची घटना फेसबुकवर ‘आम्ही कोल्हापुरी’ ग्रुपवर छायाचित्रासह पोस्ट केली. या पोस्टला सुमारे नऊ हजार लाइक्स आणि सतराशे कॉमेंट्स मिळाल्या आहेत. सर्वांनीच विश्वजित यांचे कौतुक आणि अभिनंदनही केले आहे. यावरून लोकांना समाजसेवा किती महत्त्वाची वाटते हे जाणवते. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. अनेकांनी समाजप्रबोधनपर देखावे उभारून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच जनजागृती अपघाताबद्दलही व्हावी. हेल्मेट वापरणे, वाहतुकीची शिस्त पाळणे, वेगमर्यादा पाळणे या गोष्टी वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या आहेतच; पण त्याचबरोबर अपघातग्रस्तांच्या मदतीला तातडीने धाऊन जाणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता मदतीला धावणाºयांच्या पाठीमागे पोलिसांचे शुक्लकाष्ठही लागत नाही. त्यामुळे यापुढे एखादा अपघात दिसलाच तर केवळ काय झालंय एवढेच विचारून केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका, तर मदतीला धावा. तुमच्यामुळे एखाद्या जखमीचा जीव वाचू शकतो याची जाणीव सदैव ठेवा.- चंद्रकांत कित्तुरे‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे