शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

..म्हणूनच तुमचं डोकं काम करीत नाही!

By admin | Updated: June 15, 2017 17:48 IST

‘मेमरी लॉस’पासून वाचायचं असेल तर या गोष्टी करायलाच हव्यात..

- मयूर पठाडेअगदी साधा प्रश्न.. तुमच्या रोजच्या आहारात काय काय असतं? म्हणजे तुम्ही रोज आपल्या जेवणात काय खाता? आपल्या भारतीय पद्धतीनं, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबिर.. असं तुम्ही खाता कि पिझ्झा, पिझ्झा, बर्गर, स्पाघेटी.. असलेच पदार्थ तुमच्या खाण्यात जास्त असतात?भारतीय पद्धतीचा आहार जर तुम्ही रोज घेत असाल, तर उत्तमच आहे, पण पाश्चात्य पद्धतीच्या आहारावर जर तुमचा रोज आणि जास्तीत जास्त भर असेल, तर ते मात्र तुमच्या तब्येतीला नक्कीच चांगलं नाही. ते नुसतं तब्येतीलाच वाईट आहे, असं नाही, तर तुमच्या असलेल्या आणि नसलेल्या आजारांचं प्रमाणही कित्येक पटीनं वाढवतं. त्यातलाच मुख्य आजार आहे अल्झायमर. या अल्झायमरमुळे तुमच्या मेमरीचा लॉस होतो आणि अगदी साधी साधी कामं करणंही नंतर तुम्हाला मुश्कील होऊ शकतं. त्यामुळे भारतीय आहाराचं महत्त्व आजही खूपच महत्त्व आहे.अर्थातच भारतीय आहार म्हणजे तुम्ही अगदी रोज चौरस आहारच घेतला पाहिजे असं नाही, पण आपल्या मूळ आहारावर मात्र तुम्ही भर दिला पाहिजे.शास्त्रज्ञांनी यासंदर्भात नुकतंच एक महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. ज्या प्रकारच्या आहारात कोलेस्टोरॉल, साखर यांचं प्रमाण जास्त असतं असा आहार तुमच्या आरोग्यासाठी फारच घातक आहे आणि त्यामुळे तुुम्हाला अल्झायमरचा धोका होऊ शकतो असं या शास्त्रज्ञांचं निरीक्षण आहे. पाश्चात्य आहारात प्रामुख्याने हे घटक जास्त असतात.

 

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, पाश्चात्य पद्धतीच्या अशा प्रकारच्या आहारामुळे तुमच्या मेंदूला सूज येऊ शकते आणि मेंदूशी संबंधित अनेक प्रकारच्या विकारांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.आहारासंदर्भात त्यामुळेच काळजी घेणं आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुमची जीवनशैली, व्यायाम आणि तुमच्या जिन्सचं महत्त्वही अपरंपार आहे.

 

तुमचे जिन्स कसे आहेत, यावरही तुम्ही कसे आहात आणि भविष्यात कसे असणार आहात हे अवलंबून असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आपला आहार तर आपल्या भूभागाशी, वातावणाशी सुसंगत असा तर असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपली लाइफस्टाइल कशी आहे, तेही एकदा तपासून पाहा. रोज व्यायाम करीत नसाल तर व्यायामाकडे लक्ष द्या. आठवड्यातून किमान चार दिवस, चाळीस मिनिटं तरी व्यायाम झालाच पाहिजे. या गोष्टींकडे लक्ष द्याल, तर तुमचा भविष्यकाळ नक्कीच सुखकारक असेल.