शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
2
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
3
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
4
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
5
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
6
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
7
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
8
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
9
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
10
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
11
VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग'
12
एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..."
13
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
14
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
15
महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला 
16
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
17
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
18
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
19
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
20
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कुणामुळे जास्त आनंदी आहात? दोस्तांमुळे की कुटूंबामुळे?

By admin | Updated: June 8, 2017 18:30 IST

आनंदी जगणं आणि उत्तम आरोग्य यांच्यासाठी कुटूंबापेक्षाही जास्त महत्वाचे ठरतात दोस्त.

- नितांत महाजनआपल्याला सगळ्यांना आनंदी रहायचं असतं. पण आपला आनंदी कितीही नाही म्हटलं तरी इतरांवरच अवलंबून असतो. तो तसा ठेवू नये हे आपल्याला कळतं, पण वळत नाही. आणि वळून उपयोगही नसतो अनेकदा कारण आपल्या अवतीभोवतीची माणसं आपल्या सुखदु:खाला कारण ठरत असतातच. पण तुम्हाला विचारलं की तुमच्या जगण्यात कुणामुळे जास्त आनंद आहे. कोण जास्त रंग भरतं तुमच्या जगण्यात? दोस्त की कुटूंब? प्रश्न सोपा आहे, उत्तर तितकं सोपं नाही. पण तरी मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासानुसार काही लाख लोकांना असं वाटतं की, कुटूंबापेक्षा मित्रांमुळे आपण जास्त आनंदी होतो. मित्र आपल्या आयुष्यात अनेक आनंद भरतात आणि जगण्याला उमेद देतात.मिशिनग स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार हे अत्यंत वेगळे आणि बदलत्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारे एक नवे चित्र समोर आहे आहे. हेल्थ अ‍ॅण्ड हॅपिनेस या विषयांत विविध अभ्यास करणाऱ्या इथल्या संशोधकांनी २,७१,००० लोकांशी संपर्क केला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत काही प्रश्नावल्या भरुन घेतल्या. त्या साऱ्या माहितीचे संकलन अर्थात डाटा प्रोसेसिंंग करण्यात आलं. आणि त्यातून काही निष्कर्ष काढण्यात आले.हा अभ्यास असं म्हणतो की, तरुण वयात मित्रांचा शब्द प्रमाण असतोच. मित्र आयुष्यात कुणाही पेक्षा अधिक महत्वाचे असतातच. मात्र वय वाढतं, प्रौढ होत जातात लोक तसतसे मित्रांचे महत्व आयुष्यात जास्त वाढते. वय वाढतं तशी ही मैत्री, त्याकाळातले निवडक, गिनेचूने मित्र जास्त महत्वाचे होत जातात. याकाळात सोबत चांगले मित्र असतील तर जगण्याचे, वाढत्या वयाचे पठारावस्था अधिक सोपी आणि आनंदी होते. ज्यांच्या वाट्याला असे मित्र येत नाहीत ते अधिक एकेकटे, कडवट आणि आतून जास्त कोरडे होत जातात.

 

मित्र चांगले असतील तर वाढत्या वयात माणसं आनंदी तर राहतातच पण त्याच काळात त्यांची तब्येतही चांगली राहते.मित्र कधी साथ देतात.१) क्रॉनिक आजार असेल, मोठा आजार स्वत:ला किंवा घरात कुणाला झाला तर मित्र जास्त साथ देतात.२) एक फील गूड आपल्या अवतीभोवती कायम ठेवतात.३) अवघड परस्थितीत साथ सोडत नाहीत.४) कठीण परिस्थितीत मदतीला धावतात. धीर देतात.५) फक्त दोष न देत राहता, उपाय सुचवतात.६) हेवेदावे न करता, साथ देतात.७) त्यांच्याशी शेअरिंग सोपं होतं,मिळालेल्या माहितीचं ते राजकारण करत नाहीत.