शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

काय म्हणता, हालचाली मंदावल्यात?

By admin | Updated: July 4, 2017 17:39 IST

..मग मोठ्या आजाराची ही सुरुवात असू शकते. आजी-आजोबांकडे जरा जास्त लक्ष द्या..

- मयूर पठाडेतुमची आजी, आजोबा.. एवढं वय झालं, पण अजूनही धडधाकट आहेत की नाहीत?.. रोज सगळी कामं वेळच्या वेळी आणि स्वत:ची स्वत: करतात, रोज सकाळी फिरायला जातात, नातवंडं, पतवंडांसोबत छान खेळतात.. मुलांनाही त्यांची सोबत फारच आवडते.. आजी-आजोबांशिवाय त्यांनाही बिलकुल करमत नाही.. आजी-आजोबांचं हे चैतन्य घरभर कसं विखुरलेलं असतं आणि आपल्यालाही ते प्रफुल्लित करीत असतं..पण थांबा, तुम्हाला आजकाल असं वाटायला लागलंय का, कि आजी-आजोबांचा चालण्याचा वेग किंचित मंदावलाय, पूर्वीच्या तुलनेत अलीकडे ते थोडं हळूहळू चालायला लागलेत.. तुम्हाला जर असं वाटत असेल, तर शंकेला जागा आहे. त्यांना ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.. कारण या वयात तुमच्या हालचाली अगदी थोड्या का मंदावलेल्या असेना, स्मृतीभ्रंशाकडे तुमची वाटचाल सुरू झालेली असू शकते. डिमेन्शिया, अल्झायमर.. यासारख्या आजारांची ती सुरूवात असू शकते.

 

त्यामुळे हालचाली मंदावल्याची थोडी जरी शक्यता वाटली, तरी लगेच आपल्या आजी-आजोबांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवा. त्यांच्या साऱ्या तपासण्या करून घ्या. स्मृतीभ्रंशाची ही लक्षणं जर खरीच असली, तर वेळेवर उपचार करून त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येतं. त्यासाठी आजी-आजोबांनीही स्वत:कडे लक्ष द्यायला हवं. अगदी आपल्या मुलांनी आणि नातवंडांनीच त्याबाबत तुम्हाला सावध करायला हवं असं नाही. ज्येष्ठांनीही ही लक्षणं जर त्यांच्यात अचानक दिसायला लागली असतील, तर वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.

 

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे लक्षात आलं आहे, की, तुमच्या हालचाली जर मागच्या वर्षाच्या तुलनेत अगदी ०.१ सेकंदानं जरी कमी झाल्या असतील, तरी डिमेन्शिया, अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशासारख्या आजारांचा तुमचा धोक तब्बल ५० टक्क्यांच्या आसपास वाढू शकतो!आपल्या मेंदूच्या उजव्या बाजूला स्मृती आणि हालचालींवर नियंत्रण ठेवणारा एक भाग असतो. साधारणपणे समुद्री घोड्यासारखा त्याचा आकार असतो. हा भाग जर आकुंचन पाऊ लागला तर तुमच्या स्मृती आणि चालण्याफिरण्यावरही त्यामुळे मर्यादा येतात.

 

अर्थात वयोमानानुसार तुमचे मसल्स कमजोर होणे, गुडघेदुखी, डायबेटिस, हृदयरोगासारखे वेगवेगळे आजार.. यामुळेही तुमच्या हालचालींवर मर्यादा येऊ शकतात, पण या साऱ्या गोष्टींकडे जर वेळीच लक्ष दिलं, तर नंतरच्या मोठ्या संकटातून आपली सुटका होऊ शकते, एवढं नक्की!त्यामुळे आपल्या हालचाली जर थोड्याही मंदावल्या असतील तर त्याकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका, वेळीच त्यावर उपचार करा आणि कायम हसते-फिरते, आनंदी राहा. आपल्या चैतन्याचा सुगंध कायम सगळीकडे पसरू द्या..