शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणता, हालचाली मंदावल्यात?

By admin | Updated: July 4, 2017 17:39 IST

..मग मोठ्या आजाराची ही सुरुवात असू शकते. आजी-आजोबांकडे जरा जास्त लक्ष द्या..

- मयूर पठाडेतुमची आजी, आजोबा.. एवढं वय झालं, पण अजूनही धडधाकट आहेत की नाहीत?.. रोज सगळी कामं वेळच्या वेळी आणि स्वत:ची स्वत: करतात, रोज सकाळी फिरायला जातात, नातवंडं, पतवंडांसोबत छान खेळतात.. मुलांनाही त्यांची सोबत फारच आवडते.. आजी-आजोबांशिवाय त्यांनाही बिलकुल करमत नाही.. आजी-आजोबांचं हे चैतन्य घरभर कसं विखुरलेलं असतं आणि आपल्यालाही ते प्रफुल्लित करीत असतं..पण थांबा, तुम्हाला आजकाल असं वाटायला लागलंय का, कि आजी-आजोबांचा चालण्याचा वेग किंचित मंदावलाय, पूर्वीच्या तुलनेत अलीकडे ते थोडं हळूहळू चालायला लागलेत.. तुम्हाला जर असं वाटत असेल, तर शंकेला जागा आहे. त्यांना ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.. कारण या वयात तुमच्या हालचाली अगदी थोड्या का मंदावलेल्या असेना, स्मृतीभ्रंशाकडे तुमची वाटचाल सुरू झालेली असू शकते. डिमेन्शिया, अल्झायमर.. यासारख्या आजारांची ती सुरूवात असू शकते.

 

त्यामुळे हालचाली मंदावल्याची थोडी जरी शक्यता वाटली, तरी लगेच आपल्या आजी-आजोबांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवा. त्यांच्या साऱ्या तपासण्या करून घ्या. स्मृतीभ्रंशाची ही लक्षणं जर खरीच असली, तर वेळेवर उपचार करून त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येतं. त्यासाठी आजी-आजोबांनीही स्वत:कडे लक्ष द्यायला हवं. अगदी आपल्या मुलांनी आणि नातवंडांनीच त्याबाबत तुम्हाला सावध करायला हवं असं नाही. ज्येष्ठांनीही ही लक्षणं जर त्यांच्यात अचानक दिसायला लागली असतील, तर वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.

 

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे लक्षात आलं आहे, की, तुमच्या हालचाली जर मागच्या वर्षाच्या तुलनेत अगदी ०.१ सेकंदानं जरी कमी झाल्या असतील, तरी डिमेन्शिया, अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशासारख्या आजारांचा तुमचा धोक तब्बल ५० टक्क्यांच्या आसपास वाढू शकतो!आपल्या मेंदूच्या उजव्या बाजूला स्मृती आणि हालचालींवर नियंत्रण ठेवणारा एक भाग असतो. साधारणपणे समुद्री घोड्यासारखा त्याचा आकार असतो. हा भाग जर आकुंचन पाऊ लागला तर तुमच्या स्मृती आणि चालण्याफिरण्यावरही त्यामुळे मर्यादा येतात.

 

अर्थात वयोमानानुसार तुमचे मसल्स कमजोर होणे, गुडघेदुखी, डायबेटिस, हृदयरोगासारखे वेगवेगळे आजार.. यामुळेही तुमच्या हालचालींवर मर्यादा येऊ शकतात, पण या साऱ्या गोष्टींकडे जर वेळीच लक्ष दिलं, तर नंतरच्या मोठ्या संकटातून आपली सुटका होऊ शकते, एवढं नक्की!त्यामुळे आपल्या हालचाली जर थोड्याही मंदावल्या असतील तर त्याकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका, वेळीच त्यावर उपचार करा आणि कायम हसते-फिरते, आनंदी राहा. आपल्या चैतन्याचा सुगंध कायम सगळीकडे पसरू द्या..