शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पोटाची चरबी वाढायला लागलीय, वजनाचा काटा उजवीकडे झुकू लागलाय?..

By admin | Updated: June 20, 2017 16:01 IST

मग संधिवात तुमच्या पायाशी आलाच म्हणून समजा. महिलांनो, पुरुषांपेक्षा घ्या आताच आणि अधिक काळजी..

- मयूर पठाडे‘हो, तुम्ही लठ्ठ आहात!’, कोणालाही नुसतं असं म्हणून पाहा, तो लगेच कबुली देईल, ‘हो, ना, अलीकडे वजन फारच वाढलंय. कमी करण्याचा प्रयत्न करतोय, करतेय, पण फारसा काही फरक पडला नाही. पुढे त्या व्यक्तीला असंही विचारा, ‘तुम्हाला सांधेदुखीचाही त्रास असेलच. गुडघे दुखत असतील, सांधे, जॉइंट्स त्रास देत असतील..’ - याही गोष्टीची ती व्यक्ती ताबडतोब कबुली देईल.. ती व्यक्ती जर पन्नाशीच्या पुढे असेल तर हे समीकरण बहुदा तंतोतंत जुळतं. सर्वसाधारणपणे हे चित्र आपल्याकडे सर्रास दिसून येतं. ज्या व्यक्तींना गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास असतो, त्यांचं वजनही बहुदा जास्त असतं. अर्थात ‘जास्त’ म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या तरुणपणाच्या वजनाच्या तुलनेत!हे रिलेशन आता शास्त्रज्ञांनीही उलगडून दाखवलंय. पण त्यासाठी त्यांनी तब्बल २१ वर्षे संशोधनही केलं आणि त्यातली केवळ सत्यासत्यताच नाही, तर इतर अनेक गोष्टीही तपासून पाहिल्या. लठ्ठपणाचा संबंध नेमका कशाशी जोडला जातो? कोणाला लठ्ठ म्हणायचं? त्या त्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय, त्या व्यक्तीच्या पोटाचा घेर, त्याभोवती साचलेली चरबी आणि फॅटच शरीरातील जास्तीचं प्रमाण.. या प्रमुख घटकांवर तुमचा लठ्ठपणा अवलंबून असतो आणि त्यावरच ती व्यक्ती लठ्ठ आहे की नाही, लठ्ठपणाचं प्रमाण किती आहे हे ठरवलं जातं. डेन्मार्कच्या शास्त्रज्ञांनी ५० ते ६४ या वयोगटातील काही स्त्री आणि पुरुषांचा अभ्यास केला. तब्बल २१ वर्षे यासंबंधीचा त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष असा, की ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत, त्यांना संधीवाताचा त्रास जास्त होतो, त्यातही महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.

 

ज्या महिलांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल, तुलनेनं अधिक लठ्ठ असतील, तर त्यांच्यात संधीवाताचं प्रमाण जास्त असतं किंवा त्यांना संधिवात होण्याचा धोका अधिक प्रमाणात वाढतो.आश्चर्यकारकपणे लठ्ठपणा आणि संधिवाताचं हे समीकरण पुरुषांमध्ये मात्र शास्त्रज्ञांना आढळून आलं नाही. जे पुरुष लठ्ठ आहेत, त्यांना भविष्यात संधिवात होईलच, हे मात्र ठामपणे सांगता येऊ शकत नाही. महिलांसाठी मात्र हे मोठ्या प्रमाणात लागू आहे, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

 

त्यामुळे महिलांनो, तुमचं वजन आणि लठ्ठपणा वाढू देऊ नका. तरुणपणीच ही काळजी घेतली तर उत्तरायुष्यात अनेक विकारांपासून, त्यातही संधिवातासारख्या अतिशय त्रासदायक विकारापासून तुमची सुटका होऊ शकते. आयुष्याच्या सायंकाळीही आपलं आरोग्य टिकवायचं असेल, नातवंडं, पतवंडं यांना तुमच्या अनुभवाचा फायदा द्यायचा असेल, प्रेमानं त्यांचे लाडकोड करायचे असतील, त्यांना अंगाखांद्यावर फिरवायचं, मिरवायचं असेल तर ही काळजी आतापासूनच घ्या..