शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्याबाबतचे, लोकांची दिशाभूल करणारे गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:29 IST

Weight Loss : लोकांमध्ये वजन कमी करण्याबाबत काही गैरसमजही असतात. त्याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

(डॉ मनोज जैन, कन्सल्टन्ट, जनरल सर्जरी (गॅस्ट्रोइंटेस्टीनल, लॅपरोस्कोपिक, बॅरियाट्रिक, मेटाबोलिक आणि रोबोटिक सर्जन), कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)

Weight Loss :  वजन कमी करणं हे एक खूपच अवघड काम आहे. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. हे उपाय करून काहींना फायदा मिळतो तर काहींना मिळत नाही. वजनाची वाढती समस्या बघता सोशल मीडियावरही यासंबंधी अनेक टिप्स दिल्या जातात. पण लोकांमध्ये वजन कमी करण्याबाबत काही गैरसमजही असतात. त्याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

गैरसमज १: फक्त व्यायामाने वजन कमी होते

नुकत्याच हाती आलेल्या संशोधन निष्कर्षांनुसार, फक्त व्यायामाने वजन कमी होत नाही. व्यायामाने कॅलरी जळतात आणि त्याबरोबरीनेच बेसल मेटाबोलिक रेट देखील वाढतो, सहाजिकच त्या व्यक्तीची भूक वाढते. अनेक लोकांना हे समजत नाही की व्यायामाने जळालेल्या कॅलरीज जास्त जेवल्याने वाढतात, त्यामुळे त्यांचे प्रयत्न वाया जातात. वजन कमी होणे ही एक सतत होत राहणारी प्रक्रिया आहे, जर व्यायाम थांबला पण आहार तसाच राहिला तर वजन खूप जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे व्यायाम आणि योग्य आहार यांचा समावेश असलेली सुसंतुलित योजना करून वजनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

गैरसमज २: वजन कमी होण्याचा एकच सर्वात चांगला मार्ग असतो.

वजन कमी करण्याचा एकच हमखास असा मार्ग नसतो. त्याच्या प्रभावी पद्धती विविध घटकांवर अवलंबून असतात जसे की, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), जीवनशैली आणि सह्व्याधी. मुख्य पद्धती पुढील प्रमाणे आहेत

आहारातील बदल: कॅलरी सेवनावर नियंत्रण, उच्च पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा रोजच्या आहारामध्ये समावेश आणि वेळच्या वेळी जेवणे.

शारीरिक व्यायाम: तुमच्या शरीराच्या गरजांनुसार नियमितपणे व्यायाम.

फार्माकोथेरपी: काही स्थितींमध्ये सेमाग्ल्यूटाइडवर आधारित औषधे

नॉन-सर्जिकल प्रक्रिया: गॅस्ट्रिक बलून आणि एन्डोस्कोपिक थेरपी

सर्जिकल प्रक्रिया: खूप जास्त स्थूलपणा असेल तर बॅरियाट्रिक सर्जरी. २२.५ ते २७.५ बीएमआय असलेल्यांसाठी आहार आणि व्यायाम पुरेसे आहे, पण त्यापेक्षा जास्त बीएमआय रेन्ज असल्यास फार्माकोथेरपी किंवा सर्जरी आवश्यक असते. 

गैरसमज ३: फक्त डाएटिंग करून वजन कमी करता येते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काय खाता ते महत्त्वाचे आहे पण फक्त डाएटिंग करून वजन कमी होत नाही आणि कमी झालेले वजन दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळणे, अल्कोहोल आणि साखरमिश्रित पेयांमधील लिक्विड कॅलरीचे सेवन कमी करणे आणि जेवणाच्या वेळा नियमित असणे खूप महत्त्वाचे आहे. संशोधनातून आढळून आले आहे की, रात्री उशिरा खाल्ल्याने वजन वाढते, पचनसंस्था आणि भुकेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. आहारातील आणि जीवनशैलीतील बदल यांच्यासह सर्वसमावेशक धोरण वजन कमी करण्यात यश मिळवून देऊ शकते.

गैरसमज ४: वेगाने वजन कमी होणे चांगले असते.

वजन लवकरात लवकर कमी व्हावे असे प्रत्येक स्थूल व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे पण त्याचे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. दर महिन्याला एक ते दीड किलोपेक्षा जास्त वजन कमी होणे हे अपुरे पोषण, पित्ताशयातील खडे आणि केटोसिस यामुळे असू शकते. खूप जास्त स्थूलपणा असेल तर एका वर्षभरात १० ते १५ किलो वजन (अतिरिक्त वजनापैकी ३० ते ५०%) कमी करता येऊ शकते आणि ते वैद्यकीय दृष्टिकोनातून शाश्वत ठरू शकते व शरीरासाठी नुकसानकारक नसते.

गैरसमज ५: वजन कमी करणाऱ्या औषधांचा शॉर्टकट

रिबेलसस ओझेम्पिक आणि वेगोवी यासारखी जीएलपी-१ रिसेप्टर अगॉनिस्ट्स वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ही औषधे भुकेच्या हार्मोन्सना नियंत्रित करतात, वैद्यकीय मार्गदर्शनानुसार घेतल्यास ती बऱ्याच प्रमाणात प्रभावी ठरतात. पण त्यामुळे मळमळणे, अतिसार व काही दुर्मिळ केसेसमध्ये थायरॉईड व पॅनक्रियामध्ये बिघाड असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नयेत. ज्यांच्यावर सर्जरी करता येत नाही पण वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते अशा स्थूलपणाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीतील व्यक्तींना ही औषधे दिली जातात.

गैरसमज ६:  फक्त सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी वजन कमी असावे.

बऱ्याच व्यक्तींना सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी वजन कमी करायचे असते. खरेतर, वजन कमी करण्याचा प्राथमिक उद्देश हा संपूर्ण आरोग्य चांगले राहावे हा असला पाहिजे. स्थूलपणामुळे मधुमेह, हायपर टेन्शन, हृदयातील रक्तवाहिन्यांचे आजार आणि निद्रानाश असे आजार उद्भवतात. वजन कमी करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्यास ही पुढची गुंतागुंत टाळता येते. लग्न, मूल व्हावे अशा कारणांसाठी ५ ते १० किलो वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी आहार, व्यायाम औषधे आणि थोडा धीर या गोष्टी उपयोगी ठरू शकतात. पण जर तुमचा बीएमआय ३५ पेक्षा जास्त असेल तर सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल उपचार करून घेतले पाहिजेत. 

वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजांनुसार त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. व्यायाम, आहार, औषधे यापैकी एकही घटक जर एकटाच वापरला गेला तर तो अयशस्वी ठरण्याची दाट शक्यता असते. तसेच फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुनियोजित, सुसंतुलित दृष्टिकोन वापरून तुम्ही तुमचे वजन निरोगी राखू शकाल. स्थूलपणावर लवकरात लवकर उपचार करून तब्येतीमध्ये गंभीर गुंतागुंत होणे टाळता येते. सुंदर आणि सुडौल दिसण्याबरोबरीनेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त, आरोग्य दीर्घकाळपर्यंत चांगले राहावे यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स