शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मुलांना रोज ५०० मिलिग्रॅम 'सी' व्हिटॅमिन मिळाले, तरच त्यांची तब्येत राहील उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:35 IST

पावसाळ्यांतले आजार होतील दूर. मात्र कुठल्याही परिस्थितीत मुलांना रोज १००० मिलिग्रॅमपेक्षा जास्त सी व्हिटॅमिन देऊ नका..

ठळक मुद्देमुलांच्या आहारात रोज ५०० मिलिग्रॅम क जीवनसत्त्व हवेमात्र १००० मिलिग्रॅमपेक्षा ते कुठल्याही परिस्थितीत जास्त नको.रोगप्रतिकारक शक्ती वाढतेविविध आजारांना अटकाव

- मयूर पठाडेपावसाळ्यात केव्हाही पाहा, डॉक्टरांचे, विशेषत: लहान मुलांच्या डॉक्टरांचे दवाखाने खचाखच भरलेले असतात आणि मुलंही विविध दुखण्यांनी त्रस्त असतात. सर्दी, खोकला, थंडी, ताप, संसर्गजन्य आजार..पावसाळ्याच्या दिवसांतल्या गर्दीमुळे डॉकटरांचे खिसे भरले जात असले तरी लहान मुलांना मात्र त्यांच्या आजारांचा खूपच त्रास होतो. पावसाळ्याचा हा त्रास लहान मुलांनाच नव्हे, तर मोठ्या माणसांनाही होतो.अनेकदा आजार आपल्या शरीरात घर करतात, ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक उत्तम उपाय आहे, तो म्हणजे क जीवनसत्त्व. रोज तुमच्या आहारात क जिवनसत्त्वाचा समावेश असलाच पाहिजे.पण यासंदर्भातही काही नियम पाळले पाहिजेत. क जीवनसत्त्वांमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणून खात सुटा क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ असं नाही.सी व्हिटॅमिन रोज खाणं गरजेचं आहे, कारण ते तुमच्या शरीरात तयार होत नाही. तुम्हाला ते बाहेरुनच मिळवावं लागतं.मात्र यासंदर्भात डॉक्टरांनी आणि संशोधकांनी सावधानतेचा इशाराही दिला आहे.

लहान मुलांच्या शरीरात आहारातून रोज ५०० मिलिग्रॅम सी व्हिटॅमिन गेलं पाहिजे. मात्र कुठल्याही परिस्थितीत ते १००० मिलिग्रॅमच्या पुढे जाता कामा नये. नाहीतर त्याचा विपरित परिणाम होऊन लेने के देने पड सकते है असा इशराही संशोधकांनी दिला आहे.पावसाळ्याच्या दिवसांत अनेक संसर्गजन्य आजार आपल्याला होतात. वातावरण दमट असताना स्किनच्या आजारांनीही अनेक जण त्रस्त झालेले असतात. हात, पाय, नखं.. इत्यादि ठिकाणी फंगल इन्फेक्शन्स, बुरशीजन्य संसर्गही झालेले दिसतात.या आजारांवर मात करायची, त्यांना रोखायचं तर त्यासाठी व्हिटॅमीन सीचा फार उपयोग होतो. या व्हिटॅमिनमुळे बॅक्टेरियांना केवळ रोखताच येत नाही, तर बºयाचदा त्यांचा नाशही होतो. त्यामुळे व्हिटॅमिन सीचा आपल्या आहारात, विशेषत: मुलांच्या आहारात समावेश असलाच पाहिजे. त्याचा अतिरेक मात्र व्हायला नको.