शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कायम हडेलहप्पी केलीत, तर आयुष्य होईल वैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 15:54 IST

‘मी म्हणेल ती पूर्व, माझ्या मनासारखंच व्हायला हवं.. असा टोकाचा आग्रह करतो आयुष्याची धुळधाण..

ठळक मुद्देटोकाचे आग्रह थांबवा.मी म्हणेल तसंच व्हावं.. अशी वृत्ती आपल्याबरोबर इतरांनाही त्रासदायक.नकारात्मक विचारसरणी वाढीस लागते.

- मयूर पठाडेप्रत्येकानं आपल्या मनासारखं वागावं असं आपल्याला वाटतं. ‘आपल्या’ मनासारखं म्हणजे ‘माझ्या’ मनासारखं ! तसं ती व्यक्ती वागली नाही की मग आपल्याला राग येतो, संताप होतो, चिडचिड होते. अख्खा दिवस खराब जातो.. का होतं असं? कारण आपल्या म्हणून प्रत्येकाच्या काही धारणा असतात. सगळ्या गोष्टी त्याप्रमाणेच व्हाव्यात अशी साहजिकच प्रत्येकाची इच्छा असते. तशा त्या झाल्या नाहीत की मग आपलं सगळंच बिघडतं.. आणि मग सगळंच बिघडत जातं..संशोधकांनी सांगितलंय, आपल्या इच्छांचं जे भूत आपल्या मागे लागलेलं असतं ना, तेच सगळा घोळ करतं. त्या अपेक्षांच्या भूताला त्यामुळे आपल्यासोबत वागवू नका. आपल्यापासून त्याला थोडं दूरच ठेवा. कारण अपेक्षांचं हे भूत एकदा का आपल्या मानगुटीवर बसलं की मग ते कोणालाच सोडत नाही. आपल्याला तर नाहीच नाही, पण आपण ज्यांच्या संपर्कात अ्रसतो, त्यांनाही मग हे भूत छळतं.अमेरिकेतील काही मानसशास्त्रज्ञांनी यावर व्यापक अभ्यास केला.. त्याचं निरीक्षण असं.. जी लोकं टोकाची आग्रही असतात, त्यांच्याबाबतीत बºयाचदा हा प्रकार होतो. अमूक गोष्टी अशी म्हणजे अशीच हवी.. असं त्यांचं धोरण असतं. त्यामुळे त्यांना स्वत:ला तर त्याचा त्रास होतोच, कारण त्यांच्यासारखं, अगदी तसंच इतर कोणाला ते करता येत नाही. कसं येणार? कारण त्या दुसºया व्यक्तीनं ती गोष्ट कितीही चांगली केली, तरी त्यानं त्याचं समाधान होत नाही. त्यामुळे आपल्या मनासारखी एखादी गोष्ट करायची तर ती त्याला स्वत:लाच करावी लागते. एकटा माणूस किती गोष्टी स्वत:च करणार? काही गोष्टी त्याला इतरांवर सोपवाव्याच लागतात. पण या अतिरेकी अट्टहासामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो.मानसशास्त्रज्ञ सांगतात, अशा व्यक्तींमुळे सारं वातावरणच बिघडतं. साºया वातावरणातच एक प्रकारची निगेटिव्हिटी, नकारात्मकता निर्माण होते. ही निगेटिव्ह एनर्जी मग साºयाच गोष्टी खराब करून टाकते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा टोकाचा आग्रह सोडा आणि साकल्यानं तिचा विचार करा. या दुषित वातावरणात मग कोणतीच गोष्ट चांगली होत नाही आणि सकारात्मक विचार करणारेही या निगेटिव्ह एनर्जीकडे ओढले जातात. कोणतीही गोष्ट उत्तमच व्हायला हवी, असा आग्रह जरूर हवा, त्यासाठी प्रयत्नही आवश्य करायला हवेत, पण किती ताणावं, कुठल्या टोकाला जावं यालाही मर्यादा असावी. नाहीतर मग अशा लोकांचं आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या साºया लोकांचं आयुष्यच नकारात्मक होऊन जातं. अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल, तर टोकाचे आग्रह थांबवा.. इतरांवर विश्वास टाकायला आणि विश्वास द्यायला शिका.. अनेक गोष्टी मार्गी लागतील..बघा, शास्त्रज्ञांचा हा सल्ला आपल्याला मानवतो का?