शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कायम हडेलहप्पी केलीत, तर आयुष्य होईल वैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 15:54 IST

‘मी म्हणेल ती पूर्व, माझ्या मनासारखंच व्हायला हवं.. असा टोकाचा आग्रह करतो आयुष्याची धुळधाण..

ठळक मुद्देटोकाचे आग्रह थांबवा.मी म्हणेल तसंच व्हावं.. अशी वृत्ती आपल्याबरोबर इतरांनाही त्रासदायक.नकारात्मक विचारसरणी वाढीस लागते.

- मयूर पठाडेप्रत्येकानं आपल्या मनासारखं वागावं असं आपल्याला वाटतं. ‘आपल्या’ मनासारखं म्हणजे ‘माझ्या’ मनासारखं ! तसं ती व्यक्ती वागली नाही की मग आपल्याला राग येतो, संताप होतो, चिडचिड होते. अख्खा दिवस खराब जातो.. का होतं असं? कारण आपल्या म्हणून प्रत्येकाच्या काही धारणा असतात. सगळ्या गोष्टी त्याप्रमाणेच व्हाव्यात अशी साहजिकच प्रत्येकाची इच्छा असते. तशा त्या झाल्या नाहीत की मग आपलं सगळंच बिघडतं.. आणि मग सगळंच बिघडत जातं..संशोधकांनी सांगितलंय, आपल्या इच्छांचं जे भूत आपल्या मागे लागलेलं असतं ना, तेच सगळा घोळ करतं. त्या अपेक्षांच्या भूताला त्यामुळे आपल्यासोबत वागवू नका. आपल्यापासून त्याला थोडं दूरच ठेवा. कारण अपेक्षांचं हे भूत एकदा का आपल्या मानगुटीवर बसलं की मग ते कोणालाच सोडत नाही. आपल्याला तर नाहीच नाही, पण आपण ज्यांच्या संपर्कात अ्रसतो, त्यांनाही मग हे भूत छळतं.अमेरिकेतील काही मानसशास्त्रज्ञांनी यावर व्यापक अभ्यास केला.. त्याचं निरीक्षण असं.. जी लोकं टोकाची आग्रही असतात, त्यांच्याबाबतीत बºयाचदा हा प्रकार होतो. अमूक गोष्टी अशी म्हणजे अशीच हवी.. असं त्यांचं धोरण असतं. त्यामुळे त्यांना स्वत:ला तर त्याचा त्रास होतोच, कारण त्यांच्यासारखं, अगदी तसंच इतर कोणाला ते करता येत नाही. कसं येणार? कारण त्या दुसºया व्यक्तीनं ती गोष्ट कितीही चांगली केली, तरी त्यानं त्याचं समाधान होत नाही. त्यामुळे आपल्या मनासारखी एखादी गोष्ट करायची तर ती त्याला स्वत:लाच करावी लागते. एकटा माणूस किती गोष्टी स्वत:च करणार? काही गोष्टी त्याला इतरांवर सोपवाव्याच लागतात. पण या अतिरेकी अट्टहासामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो.मानसशास्त्रज्ञ सांगतात, अशा व्यक्तींमुळे सारं वातावरणच बिघडतं. साºया वातावरणातच एक प्रकारची निगेटिव्हिटी, नकारात्मकता निर्माण होते. ही निगेटिव्ह एनर्जी मग साºयाच गोष्टी खराब करून टाकते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा टोकाचा आग्रह सोडा आणि साकल्यानं तिचा विचार करा. या दुषित वातावरणात मग कोणतीच गोष्ट चांगली होत नाही आणि सकारात्मक विचार करणारेही या निगेटिव्ह एनर्जीकडे ओढले जातात. कोणतीही गोष्ट उत्तमच व्हायला हवी, असा आग्रह जरूर हवा, त्यासाठी प्रयत्नही आवश्य करायला हवेत, पण किती ताणावं, कुठल्या टोकाला जावं यालाही मर्यादा असावी. नाहीतर मग अशा लोकांचं आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या साºया लोकांचं आयुष्यच नकारात्मक होऊन जातं. अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल, तर टोकाचे आग्रह थांबवा.. इतरांवर विश्वास टाकायला आणि विश्वास द्यायला शिका.. अनेक गोष्टी मार्गी लागतील..बघा, शास्त्रज्ञांचा हा सल्ला आपल्याला मानवतो का?