शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

पावसाळ्यात पाय सांभाळा, नाहीतर...

By admin | Updated: May 30, 2017 17:41 IST

पावसाळ्यात पायांची काळजी घेतली नाही तर पायांचं दुखणं मागे लागू शकतं!

- नितांत महाजन‘आपके पांव देखे, बहौत हसीं है, इन्हे जमीं पर मत उतारना, मैले हो जाएंगे’ असं आपल्याला कुणी म्हणो ना म्हणो निदान असं तरी म्हणू नये की, आपके पांव देखे बहौत गंधे है, इन्हे कभी पानी तो लगाए..! असं होतं अनेकदा कारण आपण आपल्या पायांकडे फारसं लक्ष देत नाही, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही. आता पावसाळा जवळ येवून ठेपलेला असताना याची काळजी घ्यायला हवी की दरवर्षी आपण पावसाळ्यात ज्या चूका करतो निदान त्या तरी यंदा करू नयेत. कारण प्रत्येक पावसाळयात आपण त्याच चूका करत राहिलो तर पायांच्या व्याधी आपल्यामागे लागू शकतात. अनेकांची पायदुखी पावसाळ्यात डोकं वर काढते. पायाला इन्फेक्शन, बोटांत जखमा, टाचदुखी, पायांवर रॅश असे अनेक आजार या काळात होतात. याची कारणं जितकं बाह्य असतात तितकीच किंवा त्याहून अधिक आपला हलगर्जीपणा कारणीभूत असतो. यंदा चपला घेण्यापासूनच आपल्या चूका सुधारायला सुरुवात करू. म्हणजे पावसाळी पायदुखी टाळता येवू शकेल.त्यासाठी या काही गोष्टी करता येतील.

 

* पावसाळी रबरी चपला घेवू नका. तुम्ही दिवसभरात खूप चालत असाल तर त्यानं पायदुखी, टाचदुखी सुरु होवू शकते.

* चांगल्या दर्जाच्या वॉटरप्रूफ चपला विकत घ्या. तुम्ही जास्त फिरतीचं, चालण्याचं काम करत असाल तर चांगल्या चपला आणि बूट ही तुमची गरज आहे. किंवा खरंतर गुंतवणूकच आहे.

*  प्लॅट, सपाट चपला अजिबात घेवू नका. बायका ज्या रबरी सपाट चपला वापरतात त्या तर अजिबात वापरू नयेत.* आपण जी चप्पल घेवू तिला किमान एक ते दीड सेण्टीमिटरचं हील हवं. त्यानं टाचेला सपोर्ट मिळतो आणि शरीराचा तोल चांगला सांभाळला जातो.* पावसाळ्यात हील्स मात्र वापरू नका.

* अत्यंत तकलादू बेल्टची सॅण्डल कधीही वापरू नका. त्या तकलादू पट्टीवर आपल्या शरीराचा तोल अवलंबून असतो, त्यानं पाय घसरू शकतो. जाड बेल्ट किंवा अनेक बेल्ट असलेली चप्पल घ्या.

*  बाहेरुन आल्यावर आपण पाय धुतोच पण पावसाळ्यात गरम पाण्यात मीठ किंवा हॅण्डवॉश टाकून जरा वेळ पाय बुडवून ठेवावेत.*  रोज रात्री झोपताना पायांना, पाऊलांना, तळपायाला मॉइश्चरायझर आवश्य लावावं.*  टाचेकडे लक्ष द्या, टाच अती टणक होत असेल, किंवा भेगा पडत असतील तर डॉक्टरला दाखवा.*  खूप वेळ पाण्यात चालला असाल तर लगेच पाय धुवू नका. पाय कोरडे करा, शक्य तर शेका. त्वचा नॉर्मल झाली की पाण्यात पाय घाला, नाहीतर बॉडी टेम्परेचरवर त्याचा परिणाम होतो.* पावसाळ्यात पोटऱ्या, बोटं दुखत असतील, वाकडे होत असतील तर त्वरित डॉक्टरला दाखवा. अन्यथा वाताचा विकार वाढू शकतो.

(पावसाळी रबरी चपला घेताय? सावधान...)