शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात पाय सांभाळा, नाहीतर...

By admin | Updated: May 30, 2017 17:41 IST

पावसाळ्यात पायांची काळजी घेतली नाही तर पायांचं दुखणं मागे लागू शकतं!

- नितांत महाजन‘आपके पांव देखे, बहौत हसीं है, इन्हे जमीं पर मत उतारना, मैले हो जाएंगे’ असं आपल्याला कुणी म्हणो ना म्हणो निदान असं तरी म्हणू नये की, आपके पांव देखे बहौत गंधे है, इन्हे कभी पानी तो लगाए..! असं होतं अनेकदा कारण आपण आपल्या पायांकडे फारसं लक्ष देत नाही, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही. आता पावसाळा जवळ येवून ठेपलेला असताना याची काळजी घ्यायला हवी की दरवर्षी आपण पावसाळ्यात ज्या चूका करतो निदान त्या तरी यंदा करू नयेत. कारण प्रत्येक पावसाळयात आपण त्याच चूका करत राहिलो तर पायांच्या व्याधी आपल्यामागे लागू शकतात. अनेकांची पायदुखी पावसाळ्यात डोकं वर काढते. पायाला इन्फेक्शन, बोटांत जखमा, टाचदुखी, पायांवर रॅश असे अनेक आजार या काळात होतात. याची कारणं जितकं बाह्य असतात तितकीच किंवा त्याहून अधिक आपला हलगर्जीपणा कारणीभूत असतो. यंदा चपला घेण्यापासूनच आपल्या चूका सुधारायला सुरुवात करू. म्हणजे पावसाळी पायदुखी टाळता येवू शकेल.त्यासाठी या काही गोष्टी करता येतील.

 

* पावसाळी रबरी चपला घेवू नका. तुम्ही दिवसभरात खूप चालत असाल तर त्यानं पायदुखी, टाचदुखी सुरु होवू शकते.

* चांगल्या दर्जाच्या वॉटरप्रूफ चपला विकत घ्या. तुम्ही जास्त फिरतीचं, चालण्याचं काम करत असाल तर चांगल्या चपला आणि बूट ही तुमची गरज आहे. किंवा खरंतर गुंतवणूकच आहे.

*  प्लॅट, सपाट चपला अजिबात घेवू नका. बायका ज्या रबरी सपाट चपला वापरतात त्या तर अजिबात वापरू नयेत.* आपण जी चप्पल घेवू तिला किमान एक ते दीड सेण्टीमिटरचं हील हवं. त्यानं टाचेला सपोर्ट मिळतो आणि शरीराचा तोल चांगला सांभाळला जातो.* पावसाळ्यात हील्स मात्र वापरू नका.

* अत्यंत तकलादू बेल्टची सॅण्डल कधीही वापरू नका. त्या तकलादू पट्टीवर आपल्या शरीराचा तोल अवलंबून असतो, त्यानं पाय घसरू शकतो. जाड बेल्ट किंवा अनेक बेल्ट असलेली चप्पल घ्या.

*  बाहेरुन आल्यावर आपण पाय धुतोच पण पावसाळ्यात गरम पाण्यात मीठ किंवा हॅण्डवॉश टाकून जरा वेळ पाय बुडवून ठेवावेत.*  रोज रात्री झोपताना पायांना, पाऊलांना, तळपायाला मॉइश्चरायझर आवश्य लावावं.*  टाचेकडे लक्ष द्या, टाच अती टणक होत असेल, किंवा भेगा पडत असतील तर डॉक्टरला दाखवा.*  खूप वेळ पाण्यात चालला असाल तर लगेच पाय धुवू नका. पाय कोरडे करा, शक्य तर शेका. त्वचा नॉर्मल झाली की पाण्यात पाय घाला, नाहीतर बॉडी टेम्परेचरवर त्याचा परिणाम होतो.* पावसाळ्यात पोटऱ्या, बोटं दुखत असतील, वाकडे होत असतील तर त्वरित डॉक्टरला दाखवा. अन्यथा वाताचा विकार वाढू शकतो.

(पावसाळी रबरी चपला घेताय? सावधान...)