शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पायाच्या तळव्यांची अशी घ्या काळजी

By admin | Updated: July 13, 2017 02:20 IST

बदलती जीवनशैली, आहार, ताणतणाव यामुळे माणूस अक्षरश: घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावू लागला आहे

- रीना चव्हाणसुंदर दिसावे, ही प्रत्येकाची इच्छा असते; पण बदलती जीवनशैली, आहार, ताणतणाव यामुळे माणूस अक्षरश: घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावू लागला आहे. या धावपळीच्या आयुष्यामुळे त्याला स्वत:कडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. त्यातल्या त्यात वेळ काढून काही जणी ब्युटी पार्लरमध्ये जातात. चेहऱ्याची काळजी घेतात; पण पायांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. विशेषत: पावसाळ्यात पाण्यामुळे पायांना भेगा पडणे, खाज येणे, अशा समस्यांना समोरे जावे लागते. पायाच्या तळव्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत जाणून घेऊ या.बऱ्याच गृहिणी पायाच्या तळव्यांकडे दुर्लक्ष करतात. पायात चप्पल न वापरताच चालण्याने, सतत पाण्यात काम करण्याने तळवे खराब होऊन त्याला भेगा पडतात. बऱ्याचदा तर त्यातून रक्तसुद्धा येते. अशा वेळी उभे राहणे व चालणे अशक्य होते. त्यामुळे वेळीच पायाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. पायाचे तळवे स्वच्छ करून त्याची मालिश न केल्याने त्वचेला आवश्यक तेवढे आॅक्सिजन आणि रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील चमकसुद्धा कमी होते. तळवे स्वच्छ केल्याने त्याची निगा राखल्याने रक्तप्रवाह वाढून आॅक्सिजनचाही पुरवठाही चांगल्या प्रकारे होतो. दररोजच्या धावपळीमुळे वा कामाच्या दगदगीमुळे तळव्यांची विशेष काळजी घ्यायला जमत नसेल, तर निदान अंघोळीच्या वेळी तरी तळवे ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करा. अंघोळ झाल्यानंतर तळव्यांना खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा, जेणेकरून शरीरात रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होईल. घरगुती उपायांद्वारे पायांची योग्य ती काळजी घेता येईल.>पायाची स्वच्छता कशी करावीस्क्रबिंग करा : भेगा पडलेल्या तळाव्यांना स्क्रबिंग केल्याने तळव्यांची डेडस्कीन जाऊन ते मुलायम होतात. स्क्रब करण्यापूर्वी पाय थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावेत.खोबरेल तेल : घरगुती उपचार करायचे झाल्यास भेगा आणि रुक्ष तळव्यांना खोबऱ्याचे तेल लावावे. तळव्यांचा मुलायमपणा याने कायम राहतो. तसेच जंतूंच्या संक्रमणापासूनही तळवे सुरक्षित राहतात.ग्लिसरीन : भेगा पडलेल्या तळव्यांसाठी ग्लिसरीन कोणत्याही वरदानाशिवाय कमी नाही. दररोज रात्री झोपताना ग्लिसरीन लावल्याने भेगा लवकर ठीक होतात. लिंबूमुळेसुद्धा डेडस्कीन जाऊन त्वचा मुलायम होते.